शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बाजार समितीत शेतकरी, व्यापाऱ्यांनी गिरवले ‘ई-नाम’चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:07 IST

शेतमालाला योग्य भाव, त्याचे वर्गीकरण, योग्य हाताळणी, मालाचे वजन, विक्री झालेल्या मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे, आदी उद्देश समोर ठेवून देशभर ई-नाम प्रणालीचा अवलंब केला जात आहे. ज्या बाजार समित्या याचा अवलंब करणार नाहीत, त्या

ठळक मुद्दे या इशा-यामुळे ई-नाम प्रणाली अधिक काटेकोरपणे राबविण्याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कोल्हापूर : आॅनलाईन शेतमाल विक्रीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या केंद्र शासनाच्या ‘ई-नाम’ योजनेचे धडे कोल्हापुरातील शेतकरी, व्यापारी, अडत्यांनी गिरविले. कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी दुपारी झालेल्या या प्रशिक्षणात बाजार आवारात शेतमाल आल्यापासून त्याची निर्गत होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती देण्यात आली.

शेतमालाला योग्य भाव, त्याचे वर्गीकरण, योग्य हाताळणी, मालाचे वजन, विक्री झालेल्या मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे, आदी उद्देश समोर ठेवून देशभर ई-नाम प्रणालीचा अवलंब केला जात आहे. ज्या बाजार समित्या याचा अवलंब करणार नाहीत, त्या कायमस्वरूपी बंद करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, असे खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मागील आठवड्यातच जाहीर केले आहे. या इशा-यामुळे ई-नाम प्रणाली अधिक काटेकोरपणे राबविण्याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कोल्हापुरातही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात अश्विन नलगेवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ‘ई-नाम’चे फायदे सांगताना याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार असल्याचे सांगितले. यातून रोजचे व्यवहारही सुरळीत होणार आहेत, असेही सांगितले.

सभापती बाबासो लाड, उपसभापती संगीता पाटील यांच्यासह संचालक कृष्णात पाटील, सर्जेराव पाटील, परशराम खुडे, विलास साठे, उदय पाटील, दशरथ माने, शारदा पाटील, आशालता पाटील, अमित कांबळे, उत्तम धुमाळ, शेखर येडगे, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, सदानंद कोरगावकर, नंदकुमार वळंजू, भगवान काटे, बाबूराव खोत, नेताजी पाटील, संजय साने, नाथाजी पाटील, किरण पाटील, पणन मंडळाचे उपसव्यवस्थापक सुभाष घुले, अनिल पोवार, सचिन मोहन सालपे, ‘रामेती’चे उपसंचालक एन. एस. परीट, उपसचिव तानाजी मोरे उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणkolhapurकोल्हापूर