शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शिनोळीत झळकला ‘मराठी टायगर्स’

By admin | Updated: February 6, 2016 00:20 IST

शिवसैनिक, सीमाबांधवांची मोठी उपस्थिती : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून रोज एका खेळाची परवानगी

चंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आधारित व येळ्ळूरसह संपूर्ण विभागातील वास्तव चित्रण मांडण्यात आलेला ‘मराठी टायगर्स’ या चित्रपटाचे प्रदर्शन बेळगाव जिल्हाधिकारी यांनी सूडबुद्धीने उत्तर कर्नाटकात थांबविले. शिनोळी (ता. चंदगड) येथेही या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे या हेतूने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली होती. पण, सीमावासीय व शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखेर परवानगी दिली. मोठ्या शिवमय वातावरणात डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवारी शिनोळीत करण्यात आले.बेळगावमधील येळ्ळूर येथील जनतेवर कर्नाटक सरकारने केलेला अत्याचार, निष्पाप तरुणांवर खोट्या केसेस दाखल करून त्यांना कोर्टवाऱ्या करायला लावल्या. याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपटात केलेल्या चित्रणाद्वारे कर्नाटक पोलिसांचा अत्याचार जनतेसमोर येईल, या भीतीपोटी कर्नाटक शासनाने या चित्रपट प्रदर्शनावर बंदी आणली. पण, सीमाभागातील मराठी माणसांवरील अन्याय जनतेसमोर यावा, या हेतूने शिवसेनेने हा चित्रपट शिनोळी येथे प्रदर्शित केला. शिनोळी येथील ग्रामपंचायतीने हा चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य केले.दरम्यान, गुरुवारी (दि.४) चंदगडचे तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांनी शिनोळीपासून बेळगाव हद्द जवळ असल्याने शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे या चित्रपटाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे चंदगड तालुक्यासह सीमाभागात त्याचे तीव्र पडसाद पसरले.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर, आदींनी प्रशासनाने परवानगी नाकारली तरी शिवसेना या चित्रपटाचे प्रदर्शन करणार या मुद्द्यावर ठाम होती. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यास भाग पाडले. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १.३० वाजता या चित्रपटाचे प्रदर्शन झाले.चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोल्हे म्हणाले, कर्नाटक सरकारने आजपर्यंत मराठी बांधवांची मुस्कटदाबी केली आहे. कर्नाटकात चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून सरकारने प्रयत्न केले. पण, मराठी बांधव व शिवसैनिक यांच्या जनरेट्यामुळे हा चित्रपट शिनोळीत प्रदर्शित झालाच. भाषिक वाद मिटवा, अशी भूमिका या चित्रपटात मांडली आहे.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची यावेळी भाषणे झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांनी कर्नाटक सरकारने गेली ६० वर्षे मराठी बांधवांवर अत्यावर चालविला आहे. मराठी बांधवांची ही व्यथा डॉ. कोल्हे यांनी या चित्रपटातून मांडली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने या चित्रपटावर बंदी आणली आहे. मराठी बांधवांची गळचेपी केली आहे, पण महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी शिनोळी येथे हा चित्रपट प्रदर्शित करून आम्हाला मोठा दिलासा दिला आहे. समस्या मराठी बांधवांसह आमदार-खासदारांनी हा चित्रपट पहावा आणि सीमावासीयांचा आवाज विधानसभा व लोकसभेत आणखी बुलंद करावा, अशी प्रतिक्रिया दिली.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, सचिन गोरूले, दिलीप बेळूरकर, महादेव गावडे, सरपंच नम्रता पाटील, आदींसह शिवसैनिक, सीमाबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)तीन हजार प्रेक्षकांची उपस्थितीचित्रपट कक्षात (टुरिंग टॉकीची) ५०० प्रेक्षकांची क्षमता आहे. पण, आजच्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी ३ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे अनेकांना आसने न मिळाल्याने तब्बल अडीच तास उभा राहून हा चित्रपट पाहिला.घोषणाबाजीने परिसर दणाणला‘बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो,’ ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला,’ ‘कर्नाटक शासनाचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र राज्य सीमेपासून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.प्रवाशांचे हालमराठी टायगर्स चित्रपट शिनोळीत प्रदर्शित झाला. त्यामुळे अधिक वाद उफाळून येईल या शक्यतेने महाराष्ट्र राज्य परिवहन राज्य मंडळाची बससेवा शिनोळीपर्यंत, तर कर्नाटकातील बससेवा बाचीपर्यंत सुरू होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.