शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मराठा समाजाची शनिवारी गोलमेज परिषद शासनाच्या धोरणाविरोधात चर्चा : ३० संघटनांचे प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:14 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांत मराठा समाजासाठी दिशाभूल करणारे अध्यादेश काढून समाजाचा विश्वासघात केला आहे. या शासनाच्या फसव्या धोरणाविरोधात दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. ७) ऐतिहासिक गोलमेज परिषद आयोजित केली आहे. येथील रेसिडेन्सी क्लबवर दुपारी दोन वाजता ही परिषद होत असून, यामध्ये महाराष्टÑातील ३० संघटनांचे प्रतिनिधी, सर्व दैनिकांचे संपादक, ...

ठळक मुद्दे तज्ज्ञांतून विचारमंथन

कोल्हापूर : राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांत मराठा समाजासाठी दिशाभूल करणारे अध्यादेश काढून समाजाचा विश्वासघात केला आहे. या शासनाच्या फसव्या धोरणाविरोधात दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. ७) ऐतिहासिक गोलमेज परिषद आयोजित केली आहे. येथील रेसिडेन्सी क्लबवर दुपारी दोन वाजता ही परिषद होत असून, यामध्ये महाराष्टÑातील ३० संघटनांचे प्रतिनिधी, सर्व दैनिकांचे संपादक, इतिहासतज्ज्ञ, शैैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी बुधवारी दिली. मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षण मिळावे म्हणून २५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मोर्चे काढले तरीही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे; म्हणून सरकारने ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात, त्या सवलती मराठा समाजाला मिळाव्यात म्हणून काही योजना आखल्या आहेत; पण त्या दिशाभूल करणाऱ्या असून त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला आहे. यासाठी अनेक संघटनांनी एकत्र येऊन कोल्हापुरात शनिवारी गोलमेज परिषदेचे आयोजन केले. परिषदेनंतर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली.यावेळी मराठा विद्यार्थी सेनेचे प्रा. मधुकर पाटील, छावा मराठा संघटनेचे राजू सावंत, राजमाता जिजाऊ ब्रिगेडचे चंद्रकांत पाटील, मराठा समाज संघटनेचे बाळ घाटगे, बाबा महाडिक, संतोष कांदेकर, बाजीराव किल्लेदार, लता जगताप, विद्या पोवार, श्रीकांत भोसले, सुनीता पाटील, सुवर्णा मिठारी, रोहित मोरबाळे, आदी उपस्थित होते.शासनाच्या पुढील निर्णयावर परिषदेत होणार विचारमंथनमराठा समाजाच्या मुलां-मुलींना शिक्षणामध्ये शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत ५० टक्के फी भरण्याचे आश्वासन दिले, ते आम्हाला मान्य नाही.मराठा समाजातील युवकांना उद्योग उभारणीसाठी ‘(कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत कर्जे देऊन व्याजमाफीची केलेली योजना फसवी आहे.डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता सुरू करण्यासाठी योजना प्रस्तावित केली असून, यामध्ये विद्यार्थ्यांना वर्षाला १० हजार रुपये शहरातील आणि वर्षाला आठ हजार रुपये ग्रामीणसाठी देणार म्हणजे ही योजना मराठा समाजाची दिशाभूल करणारी आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ‘शाहू महाराज शिक्षण शुल्क’ ही योजना मराठा समाजाच्या कोणत्याही मुलां-मुलींच्या फायद्याची नाही. उच्च तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षणासाठी शासन ५० टक्के फी भरणार असले तरी त्यासाठी जाचक अटी आहेत.जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच्या तक्रारीबाबत व जात प्रमाणपत्र सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे.आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी १०० टक्के फी भरून घेण्याबाबत योजनेमध्ये सूचना केली आहे, ती चुकीची आहे.छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित केलेली अट शिथिल करण्याबाबत घेतलेला निर्णय मराठा समाजासाठी लाभदायक नाही.