शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राजकीय क्षेत्रात मराठा नेते जास्त असूनही तोटा

By admin | Updated: October 10, 2016 00:54 IST

समाजाला कर्तव्याची जाण : अ‍ॅड. विवेक घाटगे

कोल्हापूर : १८२७ सालापासून विस्कळीत झालेला मराठा १९० वर्षांनी एकत्र येऊ लागला आहे. मराठा समाज हक्कांसाठी लढताना कर्तव्याची जाण ठेवणारा आहे. राजकीय क्षेत्रात मराठा नेते बहुसंख्येने असल्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झाला. मराठा समाजाकडे कुटुंबप्रमुखासारखे पाहिले जाऊ लागले. पर्यायाने समाजावरील जबाबदारी वाढली. तुमचे नुकसान झाले तरी चालेल; पण इतर कोणावर अन्याय होऊ देऊ नका, या परंपरागत शिकवणीमुळे मराठा समाजाचे नेतेदेखील आरक्षण व सवलती इतर समाजास देण्यास पुढाकार घेऊ लागले. इतर जातींना दिलेल्या आरक्षणाबाबत हरकत नाही; पण ज्या सवलती दिल्या, त्या ‘सवलती’ म्हणून न मानता त्यांचा अर्थ ‘हक्क’ असा घेऊन त्यांचा गैरवापर सुरू झाला. त्यामधून स्वप्रगतीशिवाय बाकी जबाबदाऱ्या दुर्लक्षित होऊ लागल्याचे मत जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ते म्हणाले, १९५० मध्ये राज्यघटनेने जातीच्या कारणावरून आरक्षणाची सुरुवात केली, ती आजअखेर सुरू राहिली. आरक्षणामुळे पात्रता असूनही नाकारले गेल्याची भावना हळूहळू पसरू झाली. सर्वसामान्य जागेसाठी कोणत्याही जातीतील पात्र व्यक्ती भाग घेऊ शकते. आरक्षित जागेसाठी मात्र त्याच जातीतील व्यक्तीस परवानगी असते. त्यामुळे इतर जातींना आरक्षण दिले असे म्हणण्यापेक्षा मराठ्यांना किंवा खुल्या वर्गांना प्रतिबंध केला असे म्हणणे योग्य होईल. हा अन्याय, पात्रता असूनही नाकारल्याची भावना, विशिष्ट जातीचा म्हणून हुकलेली संधी, फक्त मराठा आहे म्हणूनच. या परिस्थितीस आम्ही मराठेदेखील काहीअंशी कारणीभूत आहोत. कोणताही सारासार विचार न करता एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा राबवायचा हा खेळ मराठ्यांना महागात पडला. मराठा नेत्यांचेच अनेक पक्ष झाले व त्यांमध्ये मराठा समाज विभागला गेला. एकमेकांवर कुरघोडी करीत राहिला. अशा पक्षांत काही अल्पसंख्याक समाजाचे लोक आले व पक्षात राहूनही स्वतंत्र जातीमुळे अस्तित्व ठेवून त्याच पक्षामार्फत आपल्या जातीच्या लोकांचा विचार करू लागले. मराठा नेते मात्र मराठा आहोत, मोठ्या भावाची जबाबदारी जास्त असते. आधी समाजाला दिले पाहिजे, असे गोंडस उत्तर देऊन मराठ्यांच्या जिवावर राजकीय कारकिर्द चालू ठेवत राहिले. या सर्व बाबी हळूहळू बाहेर येत त्यांचे रूपांतर असंतोषामध्ये झाले. मराठ्यांच्या पूर्वेतिहासानुसार सर्व समाजाची जबाबदारी आपल्यावरच आहे, असा विचार करून मोर्चाने बाहेर पडत आहे. यापुढे जातीपातींचे राजकारण होणार नाही मोर्चामध्ये सामील होत असलेले मराठे व त्यांना पाठिंबा देणारे इतर समाज या सर्वांचे एकमत झाले आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीचे पाठबळ नको, मोर्चात राजकीय अस्तित्व नको, कोणत्याही पक्षाचा अजेंडा नको, हा प्रस्थापित मराठा नेत्यांना खूप मोठा इशारा आहे. यापुढे जातीपातीचे राजकारण होऊ शकणार नाही. मराठा समाजास प्रत्येक वेळी सबुरीने घ्या, असा सल्लादेखील चालणार नाही. मराठ्यांची मागणी योग्य व इतर जातींच्या विरुद्ध नाही.