शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात अनेक तरुण गुरफटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:58 IST

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कामगारांची लूट, हप्ता वसुली, खंडणी, जागेच्या खरेदी व्यवहारातील हस्तक्षेप त्यातून सुरू झालेली हाणामारी व खुनाचे प्रकार याला त्यावेळचे पोलीस व राज्यकर्तेही तितकेच जबाबदार आहेत. सुरूवातीला किरकोळ स्वरुपात सुरू झालेल्या या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम झाले असते, तर आज इचलकरंजी क्राईमनगरी बनली नसती. त्याचबरोबर राजकीय ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कामगारांची लूट, हप्ता वसुली, खंडणी, जागेच्या खरेदी व्यवहारातील हस्तक्षेप त्यातून सुरू झालेली हाणामारी व खुनाचे प्रकार याला त्यावेळचे पोलीस व राज्यकर्तेही तितकेच जबाबदार आहेत. सुरूवातीला किरकोळ स्वरुपात सुरू झालेल्या या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम झाले असते, तर आज इचलकरंजी क्राईमनगरी बनली नसती. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी पाठबळ दिले नसते, तर अशा कारनाम्यातून निर्माण झालेले दादा पुढे जावून नेते बनले नसते. असे नेते आता स्वत: गुन्हेगारी कृत्ये करत नसले तरी अनेक फासे आपल्या हातात ठेवून पडद्यामागचे सूत्रधार बनून आहेत.कमी श्रमात व कमी वेळेत जास्त पैसे मिळवून हवी तशी चैनी करणाऱ्या, तसेच रुबाब मिरविणाºया या गुन्हेगारांकडे बघून अन्य तरुणही त्यांच्याकडे आकर्षित होवू लागले. त्यामुळे गुन्हेगारांची व टोळ्यांची संख्या वाढू लागली. गुन्हेगार वाढल्यानंतर त्यांच्यात वर्चस्व वाद सुरू झाला. या वादातूनच खुनाचे सत्र सुरू झाले. खून का बदला खून, असे अनेक मुडदे पडले. हा दहशतवाद वाढत जावून कामगार व कारखानदार यांच्याकडून सुरू असलेली खंडणी व हप्ता वसुली मोठे उद्योजक व व्यापारी यांच्याकडे वळली. त्यांनाही धमकी देवून खंडणी गोळा करण्याचे काम सुरू झाले.अनेक खून, मारामाºया करूनही पोलिसांच्या व कायद्याच्या कचाट्यातून सुटून बिनधास्तपणे बाहेर वावरणाºया अशा गुंडांची मोठी दहशत निर्माण झाली. त्यामुळे भीतीने त्यांच्याविरोधात ब्र शब्द काढण्याचेही धाडस कोणी करेनासे झाले. या भीतीला बळी पडून अनेकांनी हप्ता ठरवून घेतला. हे हप्ते गोळा करण्यासाठीही मोठ्या गुन्हेगारांनी आपल्याकडे आकर्षित होवून आलेल्या तरुणांना नेमले. त्यांनाही दादांकडून आलोय, एवढे बोलले की, पैसे मिळतात. हा रूबाब वाटू लागला. त्यामुळे कोठेही, काहीही घडले, तर दादा सोडवितात, अशा वेड्या मानसिकतेत अडकलेल्या १७ ते २२ या वयोगटातील तरुणांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापर सुरू झाला. काही प्रकरणात तक्रारी नोंद झाल्याने असे तरुण गुन्हेगारची पाशात अडकले.गुन्हेगार कार्यकर्ते कारावासात; दादा नामानिराळेचफिल्मी स्टाईल, कमी श्रम, अधिक मिळकत याला भुलून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या आयुष्याची वाट लागली. टोळ्यांमध्ये व पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अडकल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले. अशा टोळीयुद्धातून अनेक तरुणांचे खून झाले, तर खून प्रकरणात अटक झालेल्या तरुणांना ऐन उमेदीची वर्षे कारावासात अडकून पडावे लागले आणि त्यांचे दादा मात्र या सर्वांपासून नामानिराळेच राहिले. मोठ्या गुन्हेगारांकडे आकर्षित होवून त्यांच्या पाठीमागून फिरणे, त्यानंतर त्यांची कामे करणे. त्यातून गुन्हेगारी क्षेत्रात अडकत जावून वाट लागलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची दयनीय अवस्था आहे. काही कुटुंबांत एकुलते असलेले तरुणही या विळख्यात सापडले आहेत.