शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमधील अनेक गावांची पूरकाळात चोहोबाजूंनी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : दरवर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची पूरकोंडी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. नृसिंहवाडीजवळील ...

कोल्हापूर : दरवर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची पूरकोंडी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. नृसिंहवाडीजवळील पुलावर मोठे पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटत आहे. तर दुसरीकडे हुपरी, रेंदाळकडूनही रस्ते बंद होत असल्याने दक्षिणेकडील काही गावांना पाणी उतरल्याशिवाय जाता येत नाही. केवळ बोटी आणि हेलिकॉप्टर मार्गाने जाता येत असल्याने शासन, प्रशासन या गावांमध्ये पोहाेचण्यावर मर्यादा येत आहेत.

नृसिंहवाडीजवळ पाणी वाढले की, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, औरवाड या गावांचा संपर्क नेहमी तुटतो. तर दक्षिणेकडील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, जुने दानवाड या गावांनाही पाणी उतरल्याशिवाय जाता येत नाही.

परिणामी, राजकीय नेते आणि अधिकारी प्रामुख्याने शिरोळ आणि जवळच्याच पूरग्रस्त गावांना आणि शिरोळमधील पूरग्रस्तांच्या छावण्यांना भेट देतात, असे चित्र आहे. खिद्रापूरचे सरपंच हैदरखान मोकाशी म्हणाले, पाणी वाढण्याआधी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर येऊन गेले होते. आदल्या दिवशी अधिकारीही आले होते. परंतु, पाणी वाढल्यानंतर इकडे येण्यासाठी मार्गच नसल्याने कुणी येण्याचा प्रश्नच येत नाही.

जुने दानवाडमधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील म्हणाले, १०० टक्के गाव स्थलांतरित करण्यात आले आहे. गुरूवारी रात्रीनंतर पाणी वाढायला सुरूवात झाली. पाणी उतरल्यानंतर मंत्री यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने येऊन गेले आहेत. १०० टक्के गाव पूरबाधित झाल्याने सर्वांना अनुदान मिळण्याची गरज आहे.

राजापूरवाडीचे सरपंच विजय एकसंबे म्हणाले, शिरोळ आणि इचलकरंजी इकडून एकदा पाणी वाढल्यानंतर मार्ग बंद झाला की मग गावाकडे येता येत नाही. केवळ बोटीच्या माध्यमातून इकडे येता येते. त्यामुळे पूर ओसरल्याशिवाय शक्यतो इकडे सर्वांच्याच येण्यावर मर्यादा पडतात.

चौकट

दक्षतेमुळे जीवितहानी नाही

२००५, २०१९च्या पुरांचा फटका बसल्यानंतर ग्रामस्थ दक्ष झाले आहेत. प्रत्येक गावात कोयनेपासून राधानगरीच्या पाणी विसर्गावर आणि बंधाऱ्यांच्या पातळीवर लक्ष असते. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात येतात. त्यामुळे ग्रामस्थ जनावरांसह वेळेत बाहेर पडतात. या दक्षतेमुळेच जीवितहानी होण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. पूरकाळात स्थलांतर करावे लागणार, ही मानसिकता या परिसरातील ग्रामस्थांनी पक्की केली आहे.