शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

शिरोळमधील अनेक गावांची पूरकाळात चोहोबाजूंनी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : दरवर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची पूरकोंडी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. नृसिंहवाडीजवळील ...

कोल्हापूर : दरवर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची पूरकोंडी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. नृसिंहवाडीजवळील पुलावर मोठे पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटत आहे. तर दुसरीकडे हुपरी, रेंदाळकडूनही रस्ते बंद होत असल्याने दक्षिणेकडील काही गावांना पाणी उतरल्याशिवाय जाता येत नाही. केवळ बोटी आणि हेलिकॉप्टर मार्गाने जाता येत असल्याने शासन, प्रशासन या गावांमध्ये पोहाेचण्यावर मर्यादा येत आहेत.

नृसिंहवाडीजवळ पाणी वाढले की, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, औरवाड या गावांचा संपर्क नेहमी तुटतो. तर दक्षिणेकडील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, जुने दानवाड या गावांनाही पाणी उतरल्याशिवाय जाता येत नाही.

परिणामी, राजकीय नेते आणि अधिकारी प्रामुख्याने शिरोळ आणि जवळच्याच पूरग्रस्त गावांना आणि शिरोळमधील पूरग्रस्तांच्या छावण्यांना भेट देतात, असे चित्र आहे. खिद्रापूरचे सरपंच हैदरखान मोकाशी म्हणाले, पाणी वाढण्याआधी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर येऊन गेले होते. आदल्या दिवशी अधिकारीही आले होते. परंतु, पाणी वाढल्यानंतर इकडे येण्यासाठी मार्गच नसल्याने कुणी येण्याचा प्रश्नच येत नाही.

जुने दानवाडमधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील म्हणाले, १०० टक्के गाव स्थलांतरित करण्यात आले आहे. गुरूवारी रात्रीनंतर पाणी वाढायला सुरूवात झाली. पाणी उतरल्यानंतर मंत्री यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने येऊन गेले आहेत. १०० टक्के गाव पूरबाधित झाल्याने सर्वांना अनुदान मिळण्याची गरज आहे.

राजापूरवाडीचे सरपंच विजय एकसंबे म्हणाले, शिरोळ आणि इचलकरंजी इकडून एकदा पाणी वाढल्यानंतर मार्ग बंद झाला की मग गावाकडे येता येत नाही. केवळ बोटीच्या माध्यमातून इकडे येता येते. त्यामुळे पूर ओसरल्याशिवाय शक्यतो इकडे सर्वांच्याच येण्यावर मर्यादा पडतात.

चौकट

दक्षतेमुळे जीवितहानी नाही

२००५, २०१९च्या पुरांचा फटका बसल्यानंतर ग्रामस्थ दक्ष झाले आहेत. प्रत्येक गावात कोयनेपासून राधानगरीच्या पाणी विसर्गावर आणि बंधाऱ्यांच्या पातळीवर लक्ष असते. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात येतात. त्यामुळे ग्रामस्थ जनावरांसह वेळेत बाहेर पडतात. या दक्षतेमुळेच जीवितहानी होण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. पूरकाळात स्थलांतर करावे लागणार, ही मानसिकता या परिसरातील ग्रामस्थांनी पक्की केली आहे.