शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेट परीक्षेत सावळागोंधळ, दिलेल्या पसंती केंद्राऐवजी मिळाले दुसरेच, विद्यार्थ्यांना विनाकारण भुर्दंड 

By संदीप आडनाईक | Updated: March 7, 2023 11:34 IST

यूजीसी नेट ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते

संदीप आडनाईककोल्हापूर : राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) नोंदविलेल्या केंद्राऐवजी दुसरेच केंद्र प्रवेशपत्रावर मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवासाची दगदग सहन करावी लागली. शिवाय धावपळीचा सामना करावा लागलाच आणि भुर्दंड बसला तो वेगळाच. या सावळ्यागोंधळाचा फटका या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना बसला.राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ही यूजीसी नेट किंवा एनटीए- यूजीसी- नेट म्हणून ओळखले जाते. ही भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक किंवा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) मिळवण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठीची चाचणी आहे. यूजीसी नेट ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. विद्यापीठ आणि सरकारी महाविद्यालयांसाठी नेटची पात्रता अनिवार्य आहे.

जुलै २०१८ पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नेट परीक्षा घेत होते; परंतु, डिसेंबर २०१८पासून विद्यापीठ अनुदान आयोग ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेते. ही परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात अशी वर्षातून दोनदा घेण्यात येते.राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (एनटीए) माध्यमातून यंदा डिसेंबर २०२२ ची ही तिसऱ्या सत्रातील परीक्षा ३ ते ६ मार्च या दरम्यान सुरू आहे. आठ विषयांसाठीचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. भूगोल आणि मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमसाठी ३ मार्च रोजी, ४ मार्च रोजी वाणिज्य विषयातील तर ५ मार्च रोजी हिंदी, मराठी, कन्नड आणि तमिळ विषयांची परीक्षा पार पडली. आज, ६ मार्च रोजी राज्यशास्त्राची परीक्षा होणार आहे.या परीक्षांना बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना एजन्सीच्या कार्यपद्धतीचा फटका बसला आहे. कोल्हापुरातील अनेक विद्यार्थी या परीक्षांना बसलेले आहेत. कोल्हापूर हे केंद्र असताना काही विद्यार्थ्यांना दिलेली पसंतीची केंद्रे न मिळता दुसरीच परीक्षा केंद्र मिळाले आहे. याशिवाय संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळवितानाही अडचणी येत आहेत. संकेतस्थळावरील प्रवेशपत्रासाठी दिलेली लिंक ओपन व्हायलाच खूप वेळ लागत आहे. अनेकांना ऐनवेळी प्रवेशपत्र डाउनलोड न झाल्याने परीक्षेलाच मुकावे लागले.काहींना पुणे तर काहींना मिळाले सावंतवाडीचे केंद्रकोल्हापूरचे पसंती केंद्र मिळालेले असताना काहींना पुण्याचा तर काहींना सावंतवाडीचे परीक्षा केंद्र प्रवेशपत्रावर छापल्यामुळे अनेकांना त्या केंद्रापर्यंत प्रवास करण्याचा विनाकारण भुर्दंड बसला. विद्यार्थिंनीनाही याचा मोठा फटका बसला. अनेकींना उन्हाळ्यातील हा दगदगीचा प्रवास लहान मूल सोबत घेऊन या केंद्रावर पोहाेचण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा