शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नेट परीक्षेत सावळागोंधळ, दिलेल्या पसंती केंद्राऐवजी मिळाले दुसरेच, विद्यार्थ्यांना विनाकारण भुर्दंड 

By संदीप आडनाईक | Updated: March 7, 2023 11:34 IST

यूजीसी नेट ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते

संदीप आडनाईककोल्हापूर : राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) नोंदविलेल्या केंद्राऐवजी दुसरेच केंद्र प्रवेशपत्रावर मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवासाची दगदग सहन करावी लागली. शिवाय धावपळीचा सामना करावा लागलाच आणि भुर्दंड बसला तो वेगळाच. या सावळ्यागोंधळाचा फटका या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना बसला.राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ही यूजीसी नेट किंवा एनटीए- यूजीसी- नेट म्हणून ओळखले जाते. ही भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक किंवा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) मिळवण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठीची चाचणी आहे. यूजीसी नेट ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. विद्यापीठ आणि सरकारी महाविद्यालयांसाठी नेटची पात्रता अनिवार्य आहे.

जुलै २०१८ पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नेट परीक्षा घेत होते; परंतु, डिसेंबर २०१८पासून विद्यापीठ अनुदान आयोग ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेते. ही परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात अशी वर्षातून दोनदा घेण्यात येते.राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (एनटीए) माध्यमातून यंदा डिसेंबर २०२२ ची ही तिसऱ्या सत्रातील परीक्षा ३ ते ६ मार्च या दरम्यान सुरू आहे. आठ विषयांसाठीचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. भूगोल आणि मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमसाठी ३ मार्च रोजी, ४ मार्च रोजी वाणिज्य विषयातील तर ५ मार्च रोजी हिंदी, मराठी, कन्नड आणि तमिळ विषयांची परीक्षा पार पडली. आज, ६ मार्च रोजी राज्यशास्त्राची परीक्षा होणार आहे.या परीक्षांना बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना एजन्सीच्या कार्यपद्धतीचा फटका बसला आहे. कोल्हापुरातील अनेक विद्यार्थी या परीक्षांना बसलेले आहेत. कोल्हापूर हे केंद्र असताना काही विद्यार्थ्यांना दिलेली पसंतीची केंद्रे न मिळता दुसरीच परीक्षा केंद्र मिळाले आहे. याशिवाय संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळवितानाही अडचणी येत आहेत. संकेतस्थळावरील प्रवेशपत्रासाठी दिलेली लिंक ओपन व्हायलाच खूप वेळ लागत आहे. अनेकांना ऐनवेळी प्रवेशपत्र डाउनलोड न झाल्याने परीक्षेलाच मुकावे लागले.काहींना पुणे तर काहींना मिळाले सावंतवाडीचे केंद्रकोल्हापूरचे पसंती केंद्र मिळालेले असताना काहींना पुण्याचा तर काहींना सावंतवाडीचे परीक्षा केंद्र प्रवेशपत्रावर छापल्यामुळे अनेकांना त्या केंद्रापर्यंत प्रवास करण्याचा विनाकारण भुर्दंड बसला. विद्यार्थिंनीनाही याचा मोठा फटका बसला. अनेकींना उन्हाळ्यातील हा दगदगीचा प्रवास लहान मूल सोबत घेऊन या केंद्रावर पोहाेचण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा