शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरातील खासगी सावकारीमुळे अनेकजण कंगाल

By admin | Updated: May 25, 2015 00:37 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : बोलीभिशी, मलबारी भिशी, बचत गटाकडून महिला सावकारी तेजीत; २0 टक्के व्याज

अमर पाटील -कळंबा -शहरालगतच्या दक्षिणेस असणाऱ्या साळोखेनगर, सुर्वेनगर, तपोवन, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, कळंबा शासकीय कारागृह या उपनगरांत मध्यमवर्गीय वसाहती व झोपडपट्ट्यांचे, कष्टकरी वर्गाचे प्राबल्य आहे. त्यातील आर्थिक अडचणींचे सावज हेरून पिळवणूक करणारी खासगी सावकारांची टोळी फोफावली आहे. त्यांच्या व्याजामुळे अनेकजण कंगाल झाले आहेत.संभाजीनगर झोपडपट्टी, क्रशर चौक, वाल्मीकीनगर, बी. डी. कॉलनी, तामजाई कॉलनी, गंधर्वनगरी, राजलक्ष्मीनगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स, नृसिंह कॉलनी या उपनगरांतील कॉलन्यांत तर बेकायदेशीर सावकारांनी धुमाकूळ घातलाय, तर कळंबा, साळोखेनगरात बोलीभिशी बोकाळली आहे.उपनगरांत मध्यमवर्गीयांनी विश्वासाने गुंतवणूक केलेल्या ‘तपोवन’, ‘राजीव’, अन्य पतसंस्था, बऱ्याच सहकारी बँका बुडीत निघाल्याने आर्थिक कंबरडेच मोडले व ते सावकारांचे आपसूक सावज बनले. ‘शेठजी’, ‘मामा’, ‘सावकार’, ‘नाना’ या टोपण नावधारक बेकायदेशीर सावकारांनी अत्याचाराचा कहर केला आहे.दुर्मीळ सरकारी नोकरी, खासगी नोकरीतील तुटपुंजा पगार, मग लग्न, शिक्षण, आजारपण, दैनंदिन गरजा भागविण्यात अडचणी, राष्ट्रीय बँकांची नियमावली अशी की कर्ज मिळणे दुरापास्त, त्यामुळे या सावकारांना सुगीचे दिवस आले आहेत.पोलिसांचा ससेमिरा मागे नको म्हणून बऱ्याच जणांनी सहकार खात्यात नोंदणी करून या सावकारीचे अधिकृत बारसे करून घेतले आहे. त्यांना विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के, तर तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याज घेणे बंधनकारक; पण आता हाच दर महिन्यावर आणून दरमहा २० ते २५ टक्के सक्तीने व्याजआकारणी केली जाते.पैशाच्या वसुलीसाठी घरदार, सोने, गाडी, जमिनी जबरदस्तीने लिहून घेतल्या जातात. रात्री-अपरात्री महिलांना धमकावणे, शिव्या देणे, वाईट नजरेने पाहणे, छेडछाडीपर्यंत यांची मजल गेली आहे. बेकायदेशीर सावकारी पाशात कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जाचास कंटाळून आत्महत्येचे प्रयत्न, घरदारे विकून उपरेही बरेच झाले आहेत.हे सारे व्यवहार तोंडी; पण कोटींच्या घरात आहेत. या अनधिकृत सावकारांच्या मुसक्या वेळीच आवळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.बचत गटांआडून महिला सावकारी फॉर्मातकाही बचत गटांचे कार्य कौतुकास्पद आहे. उपनगरांतील बऱ्याच महिला बचत गटांच्या प्रमुखांची सावकारी, दादागिरी तेजीत आहे. जे शोधणे आव्हानात्मक आहे़ उपनगरांत स्वतंत्र पोलीस ठाणे गरजेचेसर्वच स्तरांतील गुन्हेगारीने उपनगरे अशांत बनली आहेत. सामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरतोय. उपनगरांत पोलीस ठाणे झाल्याखेरीज गुन्हेगारीवर अंकुश अशक्य; पण मुहूर्त लागणार कधी?पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्षएखाद्या व्यक्तीचे उत्पन्न व त्याचे राहणीमान यांची सांगड घातली की, गुन्हेगारी विश्वाचे कोडे उलगडते. पोलिसांसोबत असणारे हे बेकायदेशीर सावकार सामान्य माणसांना माहीत असून, पुराव्याविना अनभिज्ञ, सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.बेकायदेशीर खासगी सावकारीचे उपनगरांतील विश्व भयावह असून, समाजस्वास्थ्य बिघडत चालल्याचे प्रतीक आहे. पोलिसांनी हे चित्र बदलणे काळाची गरज आहे.- अजय सावेकर, माजी सरपंच, कळंबा