शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)
5
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
6
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
7
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
8
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
9
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
10
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
11
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
12
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
13
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
14
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
15
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
16
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
17
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
18
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
19
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
20
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?

उपनगरातील खासगी सावकारीमुळे अनेकजण कंगाल

By admin | Updated: May 25, 2015 00:37 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : बोलीभिशी, मलबारी भिशी, बचत गटाकडून महिला सावकारी तेजीत; २0 टक्के व्याज

अमर पाटील -कळंबा -शहरालगतच्या दक्षिणेस असणाऱ्या साळोखेनगर, सुर्वेनगर, तपोवन, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, कळंबा शासकीय कारागृह या उपनगरांत मध्यमवर्गीय वसाहती व झोपडपट्ट्यांचे, कष्टकरी वर्गाचे प्राबल्य आहे. त्यातील आर्थिक अडचणींचे सावज हेरून पिळवणूक करणारी खासगी सावकारांची टोळी फोफावली आहे. त्यांच्या व्याजामुळे अनेकजण कंगाल झाले आहेत.संभाजीनगर झोपडपट्टी, क्रशर चौक, वाल्मीकीनगर, बी. डी. कॉलनी, तामजाई कॉलनी, गंधर्वनगरी, राजलक्ष्मीनगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स, नृसिंह कॉलनी या उपनगरांतील कॉलन्यांत तर बेकायदेशीर सावकारांनी धुमाकूळ घातलाय, तर कळंबा, साळोखेनगरात बोलीभिशी बोकाळली आहे.उपनगरांत मध्यमवर्गीयांनी विश्वासाने गुंतवणूक केलेल्या ‘तपोवन’, ‘राजीव’, अन्य पतसंस्था, बऱ्याच सहकारी बँका बुडीत निघाल्याने आर्थिक कंबरडेच मोडले व ते सावकारांचे आपसूक सावज बनले. ‘शेठजी’, ‘मामा’, ‘सावकार’, ‘नाना’ या टोपण नावधारक बेकायदेशीर सावकारांनी अत्याचाराचा कहर केला आहे.दुर्मीळ सरकारी नोकरी, खासगी नोकरीतील तुटपुंजा पगार, मग लग्न, शिक्षण, आजारपण, दैनंदिन गरजा भागविण्यात अडचणी, राष्ट्रीय बँकांची नियमावली अशी की कर्ज मिळणे दुरापास्त, त्यामुळे या सावकारांना सुगीचे दिवस आले आहेत.पोलिसांचा ससेमिरा मागे नको म्हणून बऱ्याच जणांनी सहकार खात्यात नोंदणी करून या सावकारीचे अधिकृत बारसे करून घेतले आहे. त्यांना विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के, तर तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याज घेणे बंधनकारक; पण आता हाच दर महिन्यावर आणून दरमहा २० ते २५ टक्के सक्तीने व्याजआकारणी केली जाते.पैशाच्या वसुलीसाठी घरदार, सोने, गाडी, जमिनी जबरदस्तीने लिहून घेतल्या जातात. रात्री-अपरात्री महिलांना धमकावणे, शिव्या देणे, वाईट नजरेने पाहणे, छेडछाडीपर्यंत यांची मजल गेली आहे. बेकायदेशीर सावकारी पाशात कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जाचास कंटाळून आत्महत्येचे प्रयत्न, घरदारे विकून उपरेही बरेच झाले आहेत.हे सारे व्यवहार तोंडी; पण कोटींच्या घरात आहेत. या अनधिकृत सावकारांच्या मुसक्या वेळीच आवळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.बचत गटांआडून महिला सावकारी फॉर्मातकाही बचत गटांचे कार्य कौतुकास्पद आहे. उपनगरांतील बऱ्याच महिला बचत गटांच्या प्रमुखांची सावकारी, दादागिरी तेजीत आहे. जे शोधणे आव्हानात्मक आहे़ उपनगरांत स्वतंत्र पोलीस ठाणे गरजेचेसर्वच स्तरांतील गुन्हेगारीने उपनगरे अशांत बनली आहेत. सामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरतोय. उपनगरांत पोलीस ठाणे झाल्याखेरीज गुन्हेगारीवर अंकुश अशक्य; पण मुहूर्त लागणार कधी?पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्षएखाद्या व्यक्तीचे उत्पन्न व त्याचे राहणीमान यांची सांगड घातली की, गुन्हेगारी विश्वाचे कोडे उलगडते. पोलिसांसोबत असणारे हे बेकायदेशीर सावकार सामान्य माणसांना माहीत असून, पुराव्याविना अनभिज्ञ, सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.बेकायदेशीर खासगी सावकारीचे उपनगरांतील विश्व भयावह असून, समाजस्वास्थ्य बिघडत चालल्याचे प्रतीक आहे. पोलिसांनी हे चित्र बदलणे काळाची गरज आहे.- अजय सावेकर, माजी सरपंच, कळंबा