शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील अनेक संस्था जपताहेत वनसंवर्धनाचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST

शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढत्या मानवी गरजा, रेल्वे मार्ग, नवीन रस्ते महामार्ग, वनक्षेत्रावरील अतिक्रमणे, तसेच अन्य काही विकास प्रकल्पामुळे ...

शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढत्या मानवी गरजा, रेल्वे मार्ग, नवीन रस्ते महामार्ग, वनक्षेत्रावरील अतिक्रमणे, तसेच अन्य काही विकास प्रकल्पामुळे दिवसेंदिवस वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. याचे परिणाम समोर येत असून, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावत आहेत.

आजच्या काळात पर्यावरण समतोल राखायचा असेल, तर वृक्ष लागवड आणि वनसंवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. याची गरज ओळखून व्हिजन इचलकरंजी, ग्रीन इचलकरंजी, दोस्ती दिल से दिल तक, तेजोनिधी सेवा कार्य, नेचर फ्रेंड्स फाउंडेशन, कर्तव्यदक्ष सेना या पर्यावरण ग्रुपप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. स्वश्रमातून व स्वखर्चातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी धडपड सुरू आहे. वाढदिवस, वर्धापन दिन यासह अन्य कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले जात आहे.

चौकटी :

कोरोनामुळे वृक्षांचे महत्त्व अधोरेखित

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. ॲाक्सिजनची कमतरता अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पृथ्वीवर ऑक्सिजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे वृक्ष आहेत. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. त्यामुळे वृक्ष मनुष्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याची जाणीव कोरोनामुळे अधिक अधोरेखित झाली आहे.

वस्त्रनगरी होणार हिरवीगार

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व्हिजन इचलकरंजी या संघटनेतर्फे ग्रीन सिटीअंतर्गत थोरात चौक येथील मार्केटमध्ये ३५० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वृक्ष दत्तक देण्याची अनोखी मोहीम राबविली जात आहे. तसेच ग्रीन इचलकरंजी ग्रुपच्या तरुणांनी नगरपालिकेच्या शाळांच्या परिसरात मोकळ्या जागी वृक्षारोपण करणार आहेत. त्यामुळे शाळा परिसरात वृक्षांनी भरगच्च दिसणार आहे. दोस्ती दिल से दिल तक या ग्रुपने अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. नेचर फ्रेंड्स फाउंडेशनमार्फत एक गुंठ्यात ३०० झाडे लावली जणार आहेत. शहरातील अनेक संस्था व संघटनाकडून विविध भागात वृक्षारोपण सुरू आहे. त्यामुळे येत्या काही काळात इचलकरंजी शहराचे रूपडे पालटणार असून, वस्त्रनगरी हिरवीगार होणार आहे.