शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

इचलकरंजीतील अनेक संस्था जपताहेत वनसंवर्धनाचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST

शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढत्या मानवी गरजा, रेल्वे मार्ग, नवीन रस्ते महामार्ग, वनक्षेत्रावरील अतिक्रमणे, तसेच अन्य काही विकास प्रकल्पामुळे ...

शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढत्या मानवी गरजा, रेल्वे मार्ग, नवीन रस्ते महामार्ग, वनक्षेत्रावरील अतिक्रमणे, तसेच अन्य काही विकास प्रकल्पामुळे दिवसेंदिवस वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. याचे परिणाम समोर येत असून, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावत आहेत.

आजच्या काळात पर्यावरण समतोल राखायचा असेल, तर वृक्ष लागवड आणि वनसंवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. याची गरज ओळखून व्हिजन इचलकरंजी, ग्रीन इचलकरंजी, दोस्ती दिल से दिल तक, तेजोनिधी सेवा कार्य, नेचर फ्रेंड्स फाउंडेशन, कर्तव्यदक्ष सेना या पर्यावरण ग्रुपप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. स्वश्रमातून व स्वखर्चातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी धडपड सुरू आहे. वाढदिवस, वर्धापन दिन यासह अन्य कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले जात आहे.

चौकटी :

कोरोनामुळे वृक्षांचे महत्त्व अधोरेखित

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. ॲाक्सिजनची कमतरता अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पृथ्वीवर ऑक्सिजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे वृक्ष आहेत. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. त्यामुळे वृक्ष मनुष्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याची जाणीव कोरोनामुळे अधिक अधोरेखित झाली आहे.

वस्त्रनगरी होणार हिरवीगार

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व्हिजन इचलकरंजी या संघटनेतर्फे ग्रीन सिटीअंतर्गत थोरात चौक येथील मार्केटमध्ये ३५० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वृक्ष दत्तक देण्याची अनोखी मोहीम राबविली जात आहे. तसेच ग्रीन इचलकरंजी ग्रुपच्या तरुणांनी नगरपालिकेच्या शाळांच्या परिसरात मोकळ्या जागी वृक्षारोपण करणार आहेत. त्यामुळे शाळा परिसरात वृक्षांनी भरगच्च दिसणार आहे. दोस्ती दिल से दिल तक या ग्रुपने अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. नेचर फ्रेंड्स फाउंडेशनमार्फत एक गुंठ्यात ३०० झाडे लावली जणार आहेत. शहरातील अनेक संस्था व संघटनाकडून विविध भागात वृक्षारोपण सुरू आहे. त्यामुळे येत्या काही काळात इचलकरंजी शहराचे रूपडे पालटणार असून, वस्त्रनगरी हिरवीगार होणार आहे.