शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जत पूर्वच्या ४२ गावांना पाण्यासाठी ३२ कोटी

By admin | Updated: July 9, 2015 01:00 IST

मुंबईतील बैठकीत आश्वासन : ‘म्हैसाळ’च्या पाण्याने तलाव भरणार

आंदोलन मागे : जगतापसांगली : जत तालुक्यातील पूर्व भागातील ४२ गावांना तलावाद्वारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी देण्यासाठी राज्य शासनाने ३२ कोटींचा निधी देण्याचे निश्चित केले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी मुंबईतील बैठकीत पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती जतचे आमदार विलासराव जगताप यांनी दिली.म्हैसाळ योजनेमध्ये समावेश करण्यासाठी जत तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि. ६) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आ. जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, जलसंपदा विभागाचे उपसचिव उपासे, ‘कृष्णा खोरे’चे कार्यकारी संचालक गोटे, मुख्य सचिव शहा, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, संजय तेली, रामण्णा जिवाणावर, आदी उपस्थित होते.४२ गावांतील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पिके वाळू लागली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीप्रश्नावर येथील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. यामुळे या गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा, अशी मागणी खासदार पाटील व जगताप यांनी केली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, तातडीने गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करता येणार नाही; पण जत पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी संख, दोड्डनालासह जत तालुक्यातील २२ पाझर तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून दिले जातील. या पाण्याचा जत पूर्व भागातील ४२ गावांना लाभ देण्यात येईल. येथील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून २०१५-१६ या वर्षामध्ये ३२ कोटींचा निधी देण्यात येईल. या निधीतून अधिकाऱ्यांनी मुख्य कालव्यांची कामे शंभर टक्के पूर्ण करावीत, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे. या निधीशिवाय, चार जेसीबी यंत्रे (डिझेलसह) शासन देणार आहे. या जेसीबींच्या माध्यमातून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. तसेच म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यासाठी ४.७९ टीएमसी पाणी देण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)अंकले, खलाटीच्या पंप हाऊसचे काम नोव्हेंबरमध्येजत तालुक्यातील अंकले आणि खलाटी येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंप हाऊस तयार करून पूर्व भागातील गावांना पाणी देण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण पंप हाऊसच्या कामांना बुधवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. येथील काम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिल्याचे जगताप यांनी सांगितले.