शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मानसिंगराव-संजयकाका आमने-सामने

By admin | Updated: June 1, 2015 00:21 IST

जिल्हा बँक : राज्य सहकारी बँकेवरील प्रतिनिधीत्वासाठी सत्ताधारी पॅनेलमध्ये पुन्हा छुपा संघर्ष

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीतून सुरू झालेली सत्ताधारी पॅनेलमधील संघर्षाची कहाणी अजूनही सुरूच आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्य बँकेसाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याचा ठराव होणार असल्याने, त्यासाठीही आता चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी खासदार संजय पाटील आणि मानसिंगराव नाईक यांची नावे चर्चेत असून, रविवारी दिवसभर दोन्ही गटाकडून एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्याचे काम सुरू होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलची सत्ता आहे. सत्ता आली असली तरी, अंतर्गत संघर्ष व रुसवाफुगवीच्या कहाण्याही आता बाहेर पडत आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीवेळीच या गोष्टी समोर आल्या होत्या. अध्यक्षपदासाठी शिराळ्याचे मानसिंगराव नाईक आणि वाळव्याचे दिलीपतात्या पाटील यांच्यात चुरस होती. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी मानसिंगरावांच्या नावाला विरोध दर्शविला होता. मानसिंगरावांचे आणि पतंगरावांचे नातेसंबंध पुढे करून राजकीय खेळी करण्यात आली. कदम गटाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बळ दिले जाऊ नये, अशी विनंती करून मानसिंगरावांचा पत्ता अध्यक्षपदाच्या शर्यतीतून कट करण्यात आला होता. निवडीनंतरही नाराजी कायम राहिली. त्यावेळी मानसिंगरावांनी लगेचच सभागृह सोडले होते. अध्यक्षपदापासून पेटलेले अंतर्गत राजकारण आता राज्य बँकेच्या प्रतिनिधीत्वापर्यंत कायम राहणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पहिली सभा सोमवारी १ जून रोजी होत आहे. या बैठकीत राज्य बँकेवरील प्रतिनिधी नियुक्त करणे, संचालकांची कार्यकारी समिती निवड, मोठ्या संस्थांसाठी प्रतिनिधी नियुक्ती असे विषय घेण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय राज्य बँकेवरील प्रतिनिधीत्वाचा आहे. या पदासाठी मानसिंगराव नाईक आणि संजय पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मानसिंगरावांचा पत्ता कट करण्यासाठी पुन्हा दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. दुसरीकडे मानसिंगरावांच्या समर्थकांनीही नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांपैकी कोणाला या पदावर संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य बँकेचे प्रतिनिधीत्व आता प्रतिष्ठेचे बनले आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना त्यासाठी लक्ष घालावे लागत आहे. सत्ताधारी गटाचे १५ आणि विरोधी काँग्रेसचे ६ संचालक आहेत. सत्ताधाऱ्यांच्या संघर्षामध्ये आता विरोधकही आपली पोळी भाजण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य बँक प्रतिनिधीत्वासह अन्य निवडींबाबत सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. (प्रतिनिधी)मानसिंगरावांची दावेदारी मजबूत मानसिंगराव नाईक हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते, मात्र राज्य बँकेच्या प्रतिनिधीत्वाचे कारण पुढे करून त्यांना डावलण्यात आले होते. आता या प्रतिनिधीत्वापासून त्यांना डावलण्याचे कोणतेही कारण सत्ताधारी गटाला देता येणार नाही. त्यामुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. राजकीय घडामोडींना रविवारी रात्रीपासून वेग आल्याने, निवड कोणाची होणार याबाबत आता संचालकांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. दावेदारीमागे दडलंय काय..? तासगाव कारखान्याचा ताबा सध्या राज्य बँकेकडे आहे. या वादात राज्य बँकेची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते. अशावेळी राज्य बँकेचे प्रतिनिधीत्व मिळवून काही गोष्टींचा मार्ग मोकळा करता येणे संजयकाकांसाठी शक्य आहे. त्यामुळे या पदावरील दावेदारीमागे तासगाव कारखाना हे मुख्य कारण असू शकते. संजयकाकांच्या नावासाठी दुष्काळी फोरमचे नेते ताकद लावत आहेत. भाजपला बँकेत उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. राज्य बँकेचे प्रतिनिधीत्व मिळाले, तर त्यांचा कोटा पूर्ण होऊ शकतो. अन्य कोणत्याही पदाची अपेक्षा करण्याचे कारण त्यांच्याकडे राहणार नाही.