शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनापूर्वीच आंबेओहोळची घळभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

आजरा : आधी पुनर्वसन, मगच धरण हा कायदा धाब्यावर बसवून पोलीस बंदोबस्तात आंबेओहळ धरणाचे घळभरणीचे काम सुरू करणाऱ्या शासनाचा ...

आजरा : आधी पुनर्वसन, मगच धरण हा कायदा धाब्यावर बसवून पोलीस बंदोबस्तात आंबेओहळ धरणाचे घळभरणीचे काम सुरू करणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आजऱ्यात झालेल्या धरणग्रस्तांच्या बैठकीत हा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्रातील धरणग्रस्त स्त्री-पुरुषांनी लढून शासनाला पुनर्वसनाचा कायदा करायला भाग पाडले. ज्यांची घरे, जमिनी, गावे, उद्‌ध्वस्त झाली आहेत अशा लोकांना विकासामध्ये न्याय्य वाटा मिळाला पाहिजे, ही न्याय भूमिका यामागे होती. पुढे आधी पुनर्वसन, मग धरण हा कायदा लढ्यातून अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात असताना पुनर्वसनाचे काम तसेच ठेवून धरणाच्या घळभरणीचे काम चालू करणे हे धरणग्रस्तांवर अन्याय करणारे आहे.

महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य आहे की बेबंदशाही आहे, असा आमचा प्रश्न आहे. कोणातरी व्यक्तीच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी धरणग्रस्तांचा बळी दिला जात असेल तर आम्ही त्याचा संवैधानिक मार्गाने सनदशीरपणे विरोध करू.

महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेला दडपून तिचा आवाज बंद करून प्रकल्प उभे केले जातील. या भ्रमात पाटबंधारे खाते शासन-प्रशासनासह कोणीही राहू नये. कष्टकरी जनता योग्य वेळी त्यांचा भ्रमनिरास केल्याशिवाय राहणार नाही, यावर आमचा विश्वास आहे.

बैठकीस कॉ. संपत देसाई, दशरथ घुरे, प्रकाश मोरस्कर, शंकर पावले, नारायण भडांगे, विजय पाटील, भीमराव माधव, भिकाजी पाटील, हरी सावंत, श्रावण पवार, नारायण राणे, विष्णू मांजरेकर उपस्थित होते.