शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मनुवादी सरकाला उलथवून टका : स्मिता पानसरे ‘बातें अमन की’ या जथ्थ्याचे कोल्हापुरात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:25 IST

सध्या देशात सत्तेचा गैरवापर करून स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. देशात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे२०१९ च्या निवडणुकीत या मनुवादी सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन स्मिता पानसरे यांनी केले.महिला, मुस्लिम आणि दलितांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. शालेय अभ्यासक्रम बदलून नव्या पिढीला चुकीची माहिती दिली जात आहे

कोल्हापूर : सध्या देशात सत्तेचा गैरवापर करून स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. देशात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. ‘बेटी बचाव’चा नारा दिला जात असला तरी प्रत्यक्षात स्त्रियांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत या मनुवादी सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन स्मिता पानसरे यांनी केले.

देशात शांतता व लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी ‘बातें अमन की’ या देशव्यापी जथ्थ्याचे रविवारी कोल्हापुरात आगमन होताच शाहू स्मारक भवन येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उमा पानसरे होत्या.

पानसरे म्हणाल्या, महिला, मुस्लिम आणि दलितांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. शालेय अभ्यासक्रम बदलून नव्या पिढीला चुकीची माहिती दिली जात आहे. या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. त्यामुळे जात, धर्म, गट-तट बाजूला ठेवून ८ आॅक्टोबर रोजी ‘संविधान बचाव’ अशी घोषणा देत मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

भारतीय महिला फेडरेशनच्या निमंत्रक सुनीता अमृतसागर म्हणाल्या, महिलांचे हक्क मिळविण्यासाठी, त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी ‘बातें अमन की’ ही देशव्यापी मोहीम २२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. दिल्ली येथे १३ आॅक्टोबरला तिची सांगता होणार आहे. यामध्ये महिला संघटना व सामाजिक संघटनांनी थिरूवनंथपुरम, कन्याकुमारी, जम्मू-काश्मीरमधील तंगदर, आसाममधील गुवाहाटी, दिल्ली या पाच जथ्यांचे नियोजन केले आहे. हे सर्व जथ्थे देशातील विविध भागांत शांती, विवेक, मानवतावादी विचारांचे संदेश देत दिल्लीत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.

राजस्थानच्या राजकुमारी डोंगरा म्हणाल्या, स्त्रियांवरील अन्याय व अत्याचारांत वाढत होत आहे. आज स्त्रियांची घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मानहानी होत आहे. गर्दी जमवत त्या गर्दीचे रूपांतर झुंडशाहीत होत आहे. या विरोधात एकत्र येऊन लढा देण्यासाठी ही मोहीम आहे. गुजरातच्या नूरजहॉँ दिवाण म्हणाल्या, लोकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. संविधानाचे उल्लंघन होत आहे. या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.

याप्रसंगी ‘मुस्कान’ संस्थेच्या सुधा म्हणाल्या, आमच्यावर मानसिक व भावनिक या दोन्ही पद्धतींनी अत्याचार होत आहेत. आमचा कोणीच विचार करीत नाही. काही ठिकाणी सुरक्षा देणाऱ्या यंत्रणांकडूनच आमच्यावर अन्याय केला जात आहे. याविरोधात आता आम्ही एकत्र येऊन लढा देणार आहे.

वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या संगीता, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वर्षा लव्हटे, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या स्वाती क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेच्या प्रारंभी प्रबोधन गीत सादर करण्यात आले; तर ‘माझी शाळा’मधील विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले.

यावेळी सहनिमंत्रक स्नेहल कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सभेला सुमन पाटील, नाजमिन, स्नेहल कांबळे, कविता वाळवेकर, दीपाली कोळी, शुभांगी पाटील, रूपाली कदम यांच्यासह विविध महिला आघाड्यांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार