शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मनुवादी सरकाला उलथवून टका : स्मिता पानसरे ‘बातें अमन की’ या जथ्थ्याचे कोल्हापुरात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:25 IST

सध्या देशात सत्तेचा गैरवापर करून स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. देशात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे२०१९ च्या निवडणुकीत या मनुवादी सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन स्मिता पानसरे यांनी केले.महिला, मुस्लिम आणि दलितांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. शालेय अभ्यासक्रम बदलून नव्या पिढीला चुकीची माहिती दिली जात आहे

कोल्हापूर : सध्या देशात सत्तेचा गैरवापर करून स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. देशात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. ‘बेटी बचाव’चा नारा दिला जात असला तरी प्रत्यक्षात स्त्रियांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत या मनुवादी सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन स्मिता पानसरे यांनी केले.

देशात शांतता व लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी ‘बातें अमन की’ या देशव्यापी जथ्थ्याचे रविवारी कोल्हापुरात आगमन होताच शाहू स्मारक भवन येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उमा पानसरे होत्या.

पानसरे म्हणाल्या, महिला, मुस्लिम आणि दलितांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. शालेय अभ्यासक्रम बदलून नव्या पिढीला चुकीची माहिती दिली जात आहे. या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. त्यामुळे जात, धर्म, गट-तट बाजूला ठेवून ८ आॅक्टोबर रोजी ‘संविधान बचाव’ अशी घोषणा देत मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

भारतीय महिला फेडरेशनच्या निमंत्रक सुनीता अमृतसागर म्हणाल्या, महिलांचे हक्क मिळविण्यासाठी, त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी ‘बातें अमन की’ ही देशव्यापी मोहीम २२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. दिल्ली येथे १३ आॅक्टोबरला तिची सांगता होणार आहे. यामध्ये महिला संघटना व सामाजिक संघटनांनी थिरूवनंथपुरम, कन्याकुमारी, जम्मू-काश्मीरमधील तंगदर, आसाममधील गुवाहाटी, दिल्ली या पाच जथ्यांचे नियोजन केले आहे. हे सर्व जथ्थे देशातील विविध भागांत शांती, विवेक, मानवतावादी विचारांचे संदेश देत दिल्लीत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.

राजस्थानच्या राजकुमारी डोंगरा म्हणाल्या, स्त्रियांवरील अन्याय व अत्याचारांत वाढत होत आहे. आज स्त्रियांची घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मानहानी होत आहे. गर्दी जमवत त्या गर्दीचे रूपांतर झुंडशाहीत होत आहे. या विरोधात एकत्र येऊन लढा देण्यासाठी ही मोहीम आहे. गुजरातच्या नूरजहॉँ दिवाण म्हणाल्या, लोकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. संविधानाचे उल्लंघन होत आहे. या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.

याप्रसंगी ‘मुस्कान’ संस्थेच्या सुधा म्हणाल्या, आमच्यावर मानसिक व भावनिक या दोन्ही पद्धतींनी अत्याचार होत आहेत. आमचा कोणीच विचार करीत नाही. काही ठिकाणी सुरक्षा देणाऱ्या यंत्रणांकडूनच आमच्यावर अन्याय केला जात आहे. याविरोधात आता आम्ही एकत्र येऊन लढा देणार आहे.

वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या संगीता, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वर्षा लव्हटे, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या स्वाती क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेच्या प्रारंभी प्रबोधन गीत सादर करण्यात आले; तर ‘माझी शाळा’मधील विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले.

यावेळी सहनिमंत्रक स्नेहल कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सभेला सुमन पाटील, नाजमिन, स्नेहल कांबळे, कविता वाळवेकर, दीपाली कोळी, शुभांगी पाटील, रूपाली कदम यांच्यासह विविध महिला आघाड्यांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार