शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘गोकुळ’चे व्यवस्थापन लबाड : दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:08 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने डिसेंबर १५ पासून आतापर्यंत केलेली दुधाच्या खरेदी दरातील वाढ पाहता ‘गोकुळ’ने गाय उत्पादकांच्या ३ रुपये ३० पैसे, तर म्हैस उत्पादकांच्या १ रुपया ३० पैशांवर डल्ला मारला आहे,

ठळक मुद्दे उत्पादकांच्या हक्काच्या दरावर डल्ला मारला : मतदार नाहीत म्हणूनच सीमाभागातील उत्पादकांवर अन्यायमुश्रीफ-बंटींना विचारूनच पोलखोल‘उत्पादकांना दरवाढ केली नाही तर तीव्र आंदोलन उभे केले

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने डिसेंबर १५ पासून आतापर्यंत केलेली दुधाच्या खरेदी दरातील वाढ पाहता ‘गोकुळ’ने गाय उत्पादकांच्या ३ रुपये ३० पैसे, तर म्हैस उत्पादकांच्या १ रुपया ३० पैशांवर डल्ला मारला आहे, असा आरोप करीत संघाचे व्यवस्थापन लबाड असून, सीमाभागातील संस्था व उत्पादक संचालकांचे मतदार नसल्यानेच दरकपात करून व्यवस्थापनाने त्यांच्यावर अन्याय केल्याची टीका ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील (शिरोळ) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

शासनाने डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत वारंवार केलेल्या दूध खरेदी दरवाढीपैकी ‘गोकुळ’ने गाईच्या दुधाचे ३.३० पैसे, तर म्हशीच्या दुधाचे १.३० पैसे अद्याप दिलेले नाहीत. एकीकडे दुधाचे पैसे कमी करायचेआणि दुसरीकडे पशुखाद्याच्यादरात भरमसाट वाढ करण्याचा उद्योग करून व्यवस्थापनाने शेतकºयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे.

‘गोकुळ’ दुधाची मागणी व जिल्ह्णातील उत्पादन पाहून सीमाभागासह शेजारील जिल्ह्णांतून दूधसंकलन सुरू केले. ‘संघाशी संलग्न दूध संस्थांप्रमाणे सोई-सुविधा देतो; पण दूध घाला,’ अशी विनवणी संचालकांनी केली. आता दरवाढ करताना त्यांच्यावर अन्याय केला जातो. अगोदरच कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर अन्याय होतोय आणि आता ही मंडळीही अन्याय करीत असतील तर ते सहन केले जाणार नाही. सर्वसाधारण सभेपूर्वी मागील फरकासह सीमाभागातील उत्पादकांना दरवाढ केली नाही तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.

पावडर व बटरचे दर घसरल्याने गाईच्या दुधाचे दर कमी केल्याचे सांगितले जाते; पण अशा काळातील नुकसान भरून काढण्यासाठी संघाकडे कोट्यवधी रुपयांचा चढउतार निधी आहे. हा निधी कोठे गेला? असा सवाल करीत मार्च २०१४ च्या ताळेबंदात पशुखाद्य विभाग नऊ कोटींनी नफ्यात होता, त्यावेळी पोत्यामागे ७५ रुपये कमी करण्यासाठी आपण आग्रही होतो; पण कारभाºयांनी त्याला विरोध केल्याचे पाटील यांनी सांगितले.आठ महिन्यांत साडेचार रुपये दरवाढआपण अध्यक्ष झाल्यानंतर आठ महिन्यांत तीन वेळा प्रतिलिटर साडेचार रुपयांची दूध दरवाढ केली. त्याचबरोबर प्रत्येक वेळी प्रतिलिटर ५० पैसे संघाकडे चढउतार निधी राखीव ठेवला. जोखीम घेऊन दरवाढीचा निर्णय घेतल्याने केवळ कोल्हापुरातील नव्हे तर राज्यातील दूध उत्पादकांना कोट्यवधी रुपये मिळाले; पण विद्यमान अध्यक्षांनी सूत्रे घेताच गाईच्या दुधाचा दर दोन रुपयांनी कमी केल्याचा आरोप पाटील यांनी केला. 

तुलना‘अमूल’शी करापंचवीस वर्षे सरकारच्या दरापेक्षा जादा दर दिला. मग आता मागे का? सरकारपेक्षा जादा दर देऊन पुरुषार्थ दाखवा. इतर कमकुवत संघांशी तुलना करण्यापेक्षा ‘अमूल’शी करा, असे आव्हान पाटील यांनी दिले.मुश्रीफ-बंटींना विचारूनच पोलखोल‘गोकुळ’च्या कारभाराबाबत अनेक मुद्दे माझ्याकडे आहेत. आताच सगळे खुले करणार नाही. आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा करूनच सर्वसाधारण सभेत सत्तारूढ मंडळींच्या कारभाराचा पोलखोल करू, असा इशाराही पाटील यांनी दिला.