शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

पैशांसाठी मालती पाटीलचा खून

By admin | Updated: December 7, 2015 00:53 IST

संशयित आरोपीची कबुली : रांगणागडच्या शंभर फूट दरीत दिले फेकून; मृतदेह ४८ तासांनंतर बाहेर

कोल्हापूर : नागाळा पार्क परिसरातून बेपत्ता झालेल्या मालती रामगौंडा पाटील (वय ५२) हिचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मालती ही आपली प्रेयसी होती. तिने मुलीच्या नावे बँकेत ठेवलेले ५७ लाख रुपये आपल्याला देण्यास नकार दिल्याने भुदरगड येथील रांगणागडाच्या शंभर फूट दरीत फेकून तिचा खून केल्याची कबुली संशयित आरोपी संतोष गंगाराम मर्गज (३५, रा. संभाजीनगर) याने दिली आहे. दरम्यान, मालती पाटील हिचा मृतदेह ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने दरीतून बाहेर काढण्यात आला. संशयित आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील कपडे जाळल्याचे घटनास्थळावर दिसून आले, अशी माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबतची अधिक माहिती अशी, मालती पाटील व संतोष मर्गज हे दोघेही नागाळा पार्क येथील उद्योगपती विलास आनंदराव ढोमके यांच्या बंगल्यात कामास होते. १४ नोव्हेंबरला दोघेही बेपत्ता झाले होते. याबाबत ढोमके यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मालती व संतोष बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने मालवण येथून संतोषला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मालतीबाबत चौकशी केली असता त्याने ती आपल्यासोबत पळाल्याचे मान्य करीत आपण भुदरगड येथील रांगणागडावर फोटो काढत असताना ती दरीत कोसळल्याची माहिती दिली. परंतु, संतोषने तिचा खून करून मृतदेह दरीत टाकल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. पोलीस निरीक्षक चौधरी यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने खुनाची कबुली दिली.आरोपीने प्लॅन करून केला गेमसंतोष मर्गज व मालती पाटील यांचे प्रेमसंबंध होते. मालती हिने मुलीच्या नावे बँकेत ५७ लाख रुपये ठेवले होते. त्यावरून संतोष हा तिच्याशी वारंवार भांडण करीत होता. ती आपल्याला पैसे देणार नाही, याची खात्री झाल्यानंतर त्याने दिवाळीच्या भाऊबिजेदिवशी तिला संपविण्याचा प्लॅन आखला. ‘भुदरगड येथील रांगणागडावर गुप्तधन आहे. ते काढून आपण एकमेकाला वाटून घेऊ’, असा बनाव करून भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिला दुचाकीवरून घेऊन तो त्या ठिकाणी आला. तिचा विश्वास बसण्यासाठी येथे एका ठिकाणी खुदाई केली. खुदाईसाठी मालतीनेही मदत केली. मात्र, गुप्तधन सापडत नाही, याची खात्री झाल्यानंतर मालतीने ‘तू मला खोटे का सांगितलेस’ म्हणून त्याला विचारणा केली. यावेळी ‘मुलीच्या नावे बँकेत ठेवलेले पैसे मला काढून दे’, असे त्याने म्हटल्यानंतर तिने ठामपणे नकार दिला. यावेळी त्याने तिच्या नाकावर ठोसा मारताच ती रक्तबंबाळ होऊन खाली बसल्यानंतर तिला ओढत शंभर फूट दरीमध्ये फेकून दिले. त्यानंतर दरीमध्ये उतरून तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून ते त्याच ठिकाणी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेथून तो दुचाकीवरून मालवण येथे आला. दरम्यान, त्याने पोलिसांना गुप्तधनासाठी खोदलेली जागा, तिला मारहाण केली ते ठिकाण व दरीत फेकून दिल्याचे घटनास्थळ स्वत: दाखविले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने मालतीचा मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह तिचाच आहे, हे तिच्या पतीने व नातेवाइकांनी ओळखले. या खून प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.लाखो रुपये आले कोठून? मालती पाटील ही उद्योगपतीच्या घरी कामाला होती. तिने मुलीच्या नावे बँकेत ५७ लाख रुपये ठेवल्याचे संतोष याने सांगितले, परंतु लाखो रुपये तिच्याकडे कोठून आले? याची पोलिसांनाही शंका आहे. ती रक्कम आहे की संतोष खोटे बोलत आहे, याबाबतची खात्री पोलीस करीत आहेत.