शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घ्या, अन्यथा काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:27 IST

उत्तूर : पुनर्वसनाचे काम पूर्ण न करताच पोलीस बंदोबस्तात घळभरणीचे काम सुरू करून धरणग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम शासन ...

उत्तूर : पुनर्वसनाचे काम पूर्ण न करताच पोलीस बंदोबस्तात घळभरणीचे काम सुरू करून धरणग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम शासन आणि प्रशासनाने केले आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत योग्य निर्णय, अन्यथा धरणाचे काम बंद करण्यात येईल, असा इशारा कॉ. संपत देसाई यांनी आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या बैठकीत दिला.

कॉ. संपत देसाई म्हणाले, धरणग्रस्तांनी मागण्यासाठी आवाज उठवू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. आमचा धरणाला किंवा घळभरणीला विरोध नाही. विरोध कामाच्या पद्धतीला आहे. आधी पुनर्वसन मग धरण या कायद्याप्रमाणे पुनर्वसनाचे काम पूर्ण करूनच घळभरणी व्हायला हवी होती. पण, येथे धरणग्रस्तांना विचारात न घेता बेकायदा घळभरणी सुरू आहे.

कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, आंबेओहळ धरणग्रस्तांनी घाबरून जायची गरज नाही. आम्ही तालुक्यातील सर्व प्रकल्पग्रस्त तुमच्यासोबत राहू. तुम्ही नेटाने आणि एकजुटीने लढाईची तयारी करावी.

शिवाजी गुरव यांनी प्रास्ताविक केले. बजरंग पुंडपळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवाजी येजरे, सचिन पावले, संजय खाडे, महादेव खाडे, राजू देशपांडे, मधू पोटे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

---------------------

* काम बंद पाडण्याचा इशारा

जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसनाबाबत १७ तारखेपर्यंत बैठक न घेतल्यास १८ तारखेपासून काम बंद पाडण्यात येणार आहे. कायदा मोडून काम होणार असेल तर कायदा हवाच कशाला? असा प्रश्नही धरणग्रस्तांनी उपस्थित केला.

---------------------

* दलाल शोधून कारवाई करा आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून अधिकाऱ्यांचे दलाल बनले आहेत. अनेक प्रश्न अर्धवट आहेत. पाणीसाठ्यानंतर पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम राहणार आहे. प्रकल्पातील दलाल चुकीची माहिती अधिकारी व लोकप्रतिनिधीनींना देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा.

- शंकर पावले, धरणग्रस्त.

---------------------

फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या बैठकीत कॉ. संपत देसाई यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : ०८०३२०२१-गड-१०