शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घ्या, अन्यथा काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:27 IST

उत्तूर : पुनर्वसनाचे काम पूर्ण न करताच पोलीस बंदोबस्तात घळभरणीचे काम सुरू करून धरणग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम शासन ...

उत्तूर : पुनर्वसनाचे काम पूर्ण न करताच पोलीस बंदोबस्तात घळभरणीचे काम सुरू करून धरणग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम शासन आणि प्रशासनाने केले आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत योग्य निर्णय, अन्यथा धरणाचे काम बंद करण्यात येईल, असा इशारा कॉ. संपत देसाई यांनी आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या बैठकीत दिला.

कॉ. संपत देसाई म्हणाले, धरणग्रस्तांनी मागण्यासाठी आवाज उठवू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. आमचा धरणाला किंवा घळभरणीला विरोध नाही. विरोध कामाच्या पद्धतीला आहे. आधी पुनर्वसन मग धरण या कायद्याप्रमाणे पुनर्वसनाचे काम पूर्ण करूनच घळभरणी व्हायला हवी होती. पण, येथे धरणग्रस्तांना विचारात न घेता बेकायदा घळभरणी सुरू आहे.

कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, आंबेओहळ धरणग्रस्तांनी घाबरून जायची गरज नाही. आम्ही तालुक्यातील सर्व प्रकल्पग्रस्त तुमच्यासोबत राहू. तुम्ही नेटाने आणि एकजुटीने लढाईची तयारी करावी.

शिवाजी गुरव यांनी प्रास्ताविक केले. बजरंग पुंडपळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवाजी येजरे, सचिन पावले, संजय खाडे, महादेव खाडे, राजू देशपांडे, मधू पोटे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

---------------------

* काम बंद पाडण्याचा इशारा

जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसनाबाबत १७ तारखेपर्यंत बैठक न घेतल्यास १८ तारखेपासून काम बंद पाडण्यात येणार आहे. कायदा मोडून काम होणार असेल तर कायदा हवाच कशाला? असा प्रश्नही धरणग्रस्तांनी उपस्थित केला.

---------------------

* दलाल शोधून कारवाई करा आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून अधिकाऱ्यांचे दलाल बनले आहेत. अनेक प्रश्न अर्धवट आहेत. पाणीसाठ्यानंतर पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम राहणार आहे. प्रकल्पातील दलाल चुकीची माहिती अधिकारी व लोकप्रतिनिधीनींना देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा.

- शंकर पावले, धरणग्रस्त.

---------------------

फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या बैठकीत कॉ. संपत देसाई यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : ०८०३२०२१-गड-१०