शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

हेवेदावे बाजूला ठेवून हेल्पर्सला अजून मोठी करा; समजूतदारपणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:10 IST

व्यक्ती, कुटुंब, समाज असो अथवा संस्था; तिथे मतभेद निर्माण होतातच; परंतु म्हणून त्यातून काही चुकीचे घडून कोणत्याही चांगल्या चाललेल्या संस्थेच्या हिताला गालबोट लागू नये, अशीच भावना हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड संस्थेच्या वादावर समाजातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे हेवेदावे बाजूला ठेवून हेल्पर्सला अजून मोठी करा; समजूतदारपणाची गरज अपंगांच्या जीवनातील माय टिकली पाहिजे

विश्वास पाटीलकोल्हापूर : व्यक्ती, कुटुंब, समाज असो अथवा संस्था; तिथे मतभेद निर्माण होतातच; परंतु म्हणून त्यातून काही चुकीचे घडून कोणत्याही चांगल्या चाललेल्या संस्थेच्या हिताला गालबोट लागू नये, अशीच भावना हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड संस्थेच्या वादावर समाजातून व्यक्त होत आहे. या संस्थेतून अध्यक्षा नसिमा हुरजूक यांनी राजीनामा दिला आहे. तिथे आता नवे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

अपंग कल्याणाच्या क्षेत्रात आईच्या मायेने काम करणारी ही संस्था आहे. आजपर्यंतची तिची वाटचाल अत्यंत पारदर्शी आणि अपंगांचे अश्रू पुसणारी झाली आहे. याच कामाचे महत्त्व मोठे आहे आणि ते कोणत्याही वादापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, याचे भान संस्थेतील सर्वच जाणत्या मंडळींनी ठेवायला हवे.हल्ली मानवाधिकारांपासून ते अंध, अपंग, निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी, किंवा उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकजण अशा संस्था काढत आहेत. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांची वानवा आहे. म्हणूनच हेल्पर्ससारख्या संस्थांचे मोठेपण नजरेत भरणारे आहे. त्या मोठेपणाला तडा लागू नये. हुरजूक असोत की पी. डी. देशपांडे; ही हेल्पर्सची दोन चाके आहेत.

बँकेतील उत्तम पगाराची व पदाची अजून १५ वर्षे शिल्लक असलेली नोकरी पी. डी. देशपांडे यांनी संस्थेसाठी सोडून दिली. कारण त्यांना व्यक्तिगत आयुष्यापेक्षा संस्थेचे आयुष्य मोठे वाटले. सख्ख्या बहीण-भावांमध्येही जेवढे आपुलकीचे नाते नसेल असे नाते गेली ३५ वर्षे दीदी आणि पी.डी. यांच्या जीवनात तयार झाले आहे.

असे असताना प्रगल्भतेने एकमेकांना सांभाळून, सावरून पुढे घेऊन जाण्याच्या काळात त्यांच्यात कटुता तयार व्हावी, हेच संस्थेची आतापर्यंतची वाटचाल पाहणाऱ्यांसाठी वेदनादायी ठरत आहे. समाज भरभरून तुमच्या पाठीशी राहिला आहे; म्हणूनच ह्यहेल्पर्सह्णची आतापर्यंतची वाटचाल देदीप्यमान झाली आहे. यापुढेही ही वाटचाल अशीच व्हायची असेल तर सर्वांनीच अधिक समूजदारपणा दाखविण्याची गरज आहे.देशपातळीवर दखलपात्र कामसंस्थेला उचगाव (ता. करवीर) येथील हद्दीत राज्य शासनाकडून दोन एकर जागा मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी मदत झाली आहे. संस्था फक्त अपंगांसाठी वसतिगृह चालवीत नाही. पराकोटीचे अपंगत्व आलेल्या मुलांना जगण्यासाठी लायक बनविण्याचे अत्यंत मोलाचे काम संस्था आतापर्यंत निरपेक्षपणे करीत आली आहे.

आतापर्यंत १६ हजार अपंगांचे जीवन संस्थेने फुलविले आहे. भारतात आज अपंग कल्याणाच्या क्षेत्रातील पहिल्या पाच संस्थांची नावे कुणी काढली तरी त्यांमध्ये हेल्पर्सचा समावेश होतो, एवढे चांगले काम या संस्थेने उभे केले आहे.हे आहे विश्वस्त मंडळ

  • नसिमा हुरजूक- अध्यक्ष (१६ जून २०२० ला राजीनामा)
  • पी. डी. देशपांडे : उपाध्यक्ष व संघटक
  • मनोहर देशभ्रतार-सचिव
  • श्रीकांत केकडे - सहसचिव
  • अभिजित गारे - खजानिस (कोल्हापूर अर्बन बँकेत नोकरी)
  • तेजश्री शिंदे- विश्वस्त (महापालिकेत अधिकारी)
  • डॉ. छाया देसाई- विश्वस्त (महापालिकेत वैद्यकीय अधिकारी)
  • सुचेत्रा मोर्डेकर : विश्वस्त (संगीत क्षेत्रातील जाणकार)
  • सुशील नाशिककर- विश्वस्त (इंजिनिअर)
  • नंदकुमार मोरे - विश्वस्त (इंजिनिअर)
  • सुबोध मुंगळे- विश्वस्त-कार्यकर्ता व पेंटिंग कंत्राटदार

ही सर्व मंडळी हेल्पर्सच्या कामाशी गेली २५ वर्षे जोडलेली असून त्यांतील पाचजण अपंग आहेत.हेल्पर्सचे अर्थकारण

जनरल बॉडी सदस्य : ५०

  • राज्य सरकारकडून अनुदान : ०५ टक्के (एकूण २५ पैकी आठ शिक्षकांच्या पगाराची रक्कम)
  • विदेशी निधी देणगी स्वरूपात : ०६ टक्के
  • संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या उद्योगांतून : २९ टक्के
  • देशांतर्गत देणग्या : ६० टक्के
  • संस्थेची वार्षिक उलाढाल - ३.५ कोटी
  • हेल्पर्सचा स्टाफ - १६०
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोरे-वाडोस (ता. कुडाळ) येथे देणगीतून मिळालेल्या १२ एकर जागेवर काजू प्रक्रिया प्रकल्प

हुरजूक यांना त्रास व्हावा यासाठीच आमच्यावर आरोपउचगाव (ता. करवीर) येथील संस्थेच्या समर्थ मंदिर शाळेच्या समोरच आम्ही जून २०१६ ला १३ लाख ६४ हजार रुपये खर्चून सव्वापाच गुंठे जमीन खरेदी केली. त्यावर बांधकाम पूर्ण झाले आहे. ही सगळी रक्कम माझ्या म्हाकवे (ता. कागल) येथील वडिलोपार्जित शेतातून मिळाळेल्या उत्पन्नातून दिली आहे. माझ्या नावे सव्वाचार गुंठे व मधुताई पाटील यांच्या नावे एक गुंठा जमीन असल्याचे स्पष्टीकरण हेल्पर्सच्या काजू प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापक साताराम पाटील यांनी केले आहे.

मी व मधुताई पाटील हे दीदींचे डावे-उजवे हात आहोत, आम्हांवर आरोप करून दीदींना खिळखिळे करण्याचा काहींचा डाव असल्याचे साताराम पाटील यांचे म्हणणे आहे. आम्ही केलेल्या व्यवहाराचे सर्व पुरावे ७ ऑक्टोबर २०१८ ला विश्वस्त मंडळाला दिले आहेत; परंतु त्यांना ते न पाहता माघारी आरोप करण्यात जास्त रस आहे, असे त्यांंनी म्हटले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर