शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

निधी वर्ग करा; अन्यथा पालकमंत्र्यांना जाब विचारू

By admin | Updated: March 5, 2017 00:34 IST

स्थायी समिती सभेत इशारा ; रस्त्यांच्या निधीबाबत आडमुठी भूमिका

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्र्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्हा नियोजनमधून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी मिळणारे तब्बल ११ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे अद्यापही वर्ग झालेले नाहीत. पालकमंत्र्यांनी १० मार्चपर्यंत वरील सर्व निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा अन्यथा ११ मार्च रोजी पालकमंत्री दीपक केसरकर असतील त्याठिकाणी जाऊन जिल्हा परिषद सदस्य जाब विचारतील, असा निर्णय शनिवारी स्थायी समिती सभेत घेण्यात आला. या मुद्यावरून सभागृहाच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या होत्या.जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा सभाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, विषय समिती सभापती आत्माराम पालेकर, अंकुश जाधव, रत्नप्रभा वळंजू, सदस्य सतीश सावंत, रणजित देसाई, प्रमोद कामत, मधुसूदन बांदिवडेकर, रेवती राणे, पुष्पलता नेरूरकर, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. बहुतांशी रस्त्यांवर खड्डेच पडलेले आहेत. या रस्त्यांच्या डागडुजीसाठी जिल्हा नियोजनमधून ११ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. कित्येक महिन्यांचा कालावधी गेला तरी ते पैसे जिल्हा परिषदेकडे वर्ग झालेले नाहीत. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच हा निधी अद्याप जिल्हा परिषदेला मिळालेला नसल्याचा आरोप सदस्य सतीश सावंत, रणजित देसाई यांनी केला. आर्थिक वर्ष संपायला २५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. असे असताना ११ कोटींचा निधी अद्याप मिळालेला नाही. हा निधी १० मार्चपर्यंत मिळावा अन्यथा त्यानंतर सर्व जिल्हा परिषद सदस्य पालकमंत्री असतील त्या ठिकाणी जाऊन या प्रकरणाचा जाब विचारतील असा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)चौकटमृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्याजिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या माकडतापाच्या रोगाबाबत शासन मात्र पूर्णपणे गाफील असल्याचे जाणवत आहे. या साथीच्या आजाराने या मोसमात पाचजणांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्री सुदैवाने आपल्या जिल्ह्याचेच आहेत. मात्र, त्यांचेही याकडे लक्ष नाही. या मंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मृत्यूशय्येवर ठेवली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत हे २२ रोजी सिंधुदुर्गात केवळ कुणकेश्वराच्या यात्रेसाठीच आले होते. सोपस्कार म्हणून बांदा येथे माकडतापाच्या साथीबाबत विचारणा करून परत गोव्यातून त्यांनी मुंबई गाठली, असा आरोप मधुसूदन बांदिवडेकर यांनी केला. या साथीच्या आजारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना शासनाने प्रत्येकी ५ लाख रुपये मदत करावी, अशी सूचना बांदिवडेकर यांनी मांडत तसा ठरावही घेण्यात आला.चौकट८१ गावांचे सर्वेक्षण करणारगेल्यावर्षी माकडताप हा केवळ दोडामार्ग तालुक्यापुरताच मर्यादित होता. यावर्षी मात्र ही साथ बांद्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या गावातील पाच किलोमीटर परिसरातील सुमारे ८१ गावांमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हे करण्यात येणार असून जनजागृती करण्यात येणार आहे.माकडतापासाठी कोल्हापूरहून पथक येणारजिल्ह्यात जानेवारीपासून माकडतापाचे ३३ रुग्ण सापडले असून, त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरपासूनच आरोग्य विभाग अलर्ट असून सुमारे ३ हजार जणांना लसीकरण केले आहे. यावेळी आॅगस्टपासूनच माकडताप प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या २० हजार लसीकरणाचे डोस देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. रविवारी कोल्हापुरातून एक वैद्यकीय पथक बांद्यात येत असून, याठिकाणी वास्तव्यास राहणार आहे, असेही साळे म्हणाले. ३८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचितसन २०१२-१३ च्या दरम्यान जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षण विभागात शिष्यवृत्ती घोटाळा उघड झाला होता. यात तब्बल ३८१ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकून पडली होती. या प्रकरणाला चार वर्षे झाली तरी या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. माध्यमिक शिक्षण विभागातील कळस म्हणजे या विभागाने शिष्यवृत्तीची रक्कम मिळावी म्हणून १८ नोव्हेंबर २०१६ रोजी शिक्षण संचालकांजवळ मागणी केली आहे. यापूर्वी ही मागणी करणे गरजेचे होते. या मुद्यावर मधुसूदन बांदिवडेकर, सतीश सावंत यांनी चर्चा घडविली.