शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

महामार्गावर गावांच्या फाट्यावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागलपर्यंतचा भाग सहा पदरीकरण होणार आहे. यामध्ये येणाऱ्या गावांची दळणवळणाची चांगली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागलपर्यंतचा भाग सहा पदरीकरण होणार आहे. यामध्ये येणाऱ्या गावांची दळणवळणाची चांगली सोय व्हावी, रस्ता ओलांडताना स्थानिकांची गैरसोय होवू नये, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

दौरा दरम्यान, कागल ते किणीपर्यंत ग्रामस्थांनी रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची मागणी केली. ठिकठिकाणी थांबून ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मागणीचे निवेदन स्वीकारले. महामार्ग सहापदरीकरणाचे प्रत्यक्षात काम करताना कोणताही अडथळा येवू नये, महामार्गालगतच्या गावांच्या दळण वळणात अडचणी येवू नये, यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आयोजन केले.

रविवारी दुपारी तीन वाजता कागलपासून दौऱ्याला सुरुवात केले. येथे मंत्री मुश्रीफ सहभागी झाले. नगराध्यक्ष माणिक माळी, सहापदरी कृती समितीचे अध्यक्ष भय्या माने, उपाध्यक्ष संजय ठाणेकर, बी. जे. नाईक यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यांनी निवेदनाद्वारे लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल उभारावे किंवा टू-वे भुयारी मार्ग करावा, कागल पंचायत समितीजवळील भुयारी मार्गाची रुंदी आणि उंची वाढवावी, मुरगूड नाका येथे उड्डाणपूल करावे, महामार्गावरून कागल शहरात प्रवेश करणाऱ्या जोडपुलाची रूंदी वाढवावी आदी दहा मागण्या करण्यात आल्या.

तेथून पथक लक्ष्मी टेकडी येथे आले. तिथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चेवेळी भुयारी आणि उड्डाणपुलांसंबंधी चर्चा केली. चर्चेच्या शेवटी पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक यांनी उद्योजकांच्या मागणीचा विचार प्राधान्याने करावा, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर कणेरी, विकासवाडी, गोकुळ शिरगाव फाट्यावर थांबून पाहणी करण्यात आली. या गावातील ग्रामस्थांनीही रस्ता ओलांडताना प्रचंड गैरसोय होत असल्याचे सांगितले. उजळाईवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी कोल्हापूर शहरातून गावात जाण्यासाठी असलेला भुयारी मार्ग रूंद करावा किंवा स्वतंत्र उड्डाणपूल उभारावे, अशी मागणी केली. येथे सध्या उड्डाणपूल असल्याने नवीन पूल बांधणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरनोबतवाडी, उचगाव, तावडे हॉटेल, शिरोलीफाटा, नागाव, टोप, अबंप, वाठार, किणी फाट्याचीही पाहणी करून या गावातील ग्रामस्थांचीही मागणी जाणून घेतली.

दौऱ्यात राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, सर्वेअर आर. डी. काटकर, तहसीलदार शीतल मुळे आदी अधिकारी उपस्थित होते.

चौकट

फटाक्यांची आतषबाजी आणि स्वागत

पाहणीवेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचे स्वागत करत होते. सरनोबतवाडी फाट्यावर तर चक्क फटाक्याची आतषबाजी करून स्वागत केले.

कोट

राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागलपर्यंत सहापदरीकरण होणार आहे. या दरम्यान अनेक गावे आहेत. या ग्रामस्थांची महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेती आहे. औद्योगिक वसाहती आहेत. या सर्वांची सोय होण्यासाठी स्थानिकांशी चर्चा केली. कागल ते किणी नाक्यापर्यंत येणाऱ्या सर्व गावांच्या फाट्यावर थांबून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

सतेज पाटील, पालकमंत्री