शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शेतकऱ्यांसाठी मोठा प्रकल्प कोल्हापुरात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:03 IST

नेसरी : शेतकºयांच्या प्रत्येक जमिनीची पोत तपासणी, चांगले बी-बियाणे, खते द्यायचे नियोजन असून पशुधन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पादन वाढणार नाही. शेतकºयांचे टाकाऊ पिंजार, पालापाचोळा, उसाचा पाला असे काहीही वाया जाऊ नये यासाठी देशामध्ये ६ ठिकाणी मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. पैकी १ प्रकल्प कोल्हापुरात आणणार आहे, अशी माहिती ...

नेसरी : शेतकºयांच्या प्रत्येक जमिनीची पोत तपासणी, चांगले बी-बियाणे, खते द्यायचे नियोजन असून पशुधन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पादन वाढणार नाही. शेतकºयांचे टाकाऊ पिंजार, पालापाचोळा, उसाचा पाला असे काहीही वाया जाऊ नये यासाठी देशामध्ये ६ ठिकाणी मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. पैकी १ प्रकल्प कोल्हापुरात आणणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रमेशराव रेडेकर फौंडेशन अंतर्गत समृद्ध शेतकरी अभियानच्या ई-मोबाईल पशुचिकित्सालय लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष शेतकरी नेते पाशा पटेल, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतीपासून महानगरपालिका जिंकण्याचा सपाटा लावला आहे. लोक काँगे्रसला कंटाळलेले असून कर्नाटक भाजपने जिंकल्यात जमा आहे, असेही ते म्हणाले.पाटील म्हणाले, रेडेकर यांनी सुचविलेल्या ५० खाटांचा दवाखाना, हिरण्यकेशीतील पाणी नरेवाडी बंधाºयात व चंदगड पूर्व भागातील जनतेच्या पाण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.आमदार हाळवणकर म्हणाले, चंदगड मतदारसंघातील सगळे प्रकल्प मार्गी लावू. दौलत कारखान्यात मुश्रीफ यांनी राजकारण केले व कारखाना बंद पाडला. तेव्हा आता डिजीटल नेतृत्व नको आहे, असा टोला डॉ. नंदाताई बाभूळकर यांना मारून चंदगडचा आमदार भाजपचाच असेल, अशी ग्वाही दिली. यावेळी अमल महाडिक यांचेही भाषण झाले.रमेश रेडेकर म्हणाले, गरीब व गरजूंसाठी ५० खाटांचे रुग्णालय उभारावे आणि ३५८ गावांतील रस्ते, वीज व पाण्यासाठी ३०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. ई-मोबाईल व्हॅन प्रत्येक जि. प. मतदारसंघात देणार असल्याचेही रेडेकर यांनी सांगितले.प्रारंभी पालकमंत्र्याच्याहस्ते गाडी चालवून ई-मोबाईल पशुचिकित्सालय व्हॅनचा प्रारभ झाला. यावेळी अशोक चराटी, गोपाळराव पाटील, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जि. प. सदस्या सुनीता रेडेकर, आजरा अर्बन अध्यक्ष विलास नाईक, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. अनिल देशपांडे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, सभापती जयश्री तेली, बाबा देसाई, लक्ष्मणराव शिंगटे, प्रा. सुधीर मुंज, मलिक बुरूड, दयानंद चौगुले, बाबूराव पाटील आदी उपस्थित होते.त्यांना आठ हत्ती आणावे लागतीलकोल्हापूरला ४०० कोटी आणा, हत्तीवरून मिरवणूक काढतो म्हणणाºयांनी मी ४००० कोटींची विकासकामे केली आहेत. तेव्हा आता त्यांना ८ हत्ती आणावे लागतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी हाणला.