शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

शरद साखर कारखाना चांगल्या दराची परंपरा कायम राखणार

By admin | Updated: October 24, 2015 00:53 IST

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची ग्वाही : बॉयलरचा प्रदीपन समारंभ उत्साहात; कामगारांची दिवाळी समाधानात जाईल

खोची : साखर उद्योग अडचणीत असल्याने सर्वच घटकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. ज्यावेळी कारखान्याकडे साखर शिल्लकअसते, त्यावेळी बाजारात साखरेचे दर कमी असतात. कारखान्याने साखर विक्री केली आणि ती व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेली की साखरेचे दर वाढतात, अशी विचित्र स्थिती आहे. तरी सुद्धा कारखाना काटकसरीने चालवून एफआरपीप्रमाणे दर देत आहे. आता मात्र काटकसरीत-काटकसर हाच पर्याय आहे. त्यामुळे दर देणे शक्य होणार आहे. कामगारांची दिवाळी समाधानात जाईल, अशी तरतूद केली जाईल, असे प्रतिपादन शरदचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याचा १४वा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम राजेंद्र पाटील (यड्रावकर) व त्यांच्या पत्नी सौ. स्वरूपा पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब चौगुले होते. यावेळी ते बोलत होते.राजेंद्र पाटील म्हणाले, ‘चालू हंगामात साडेसहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कमी उत्पादन खर्चात जास्त गाळप करणे ही गरज बनली आहे. वाहतुकीचा तसेच अन्य खर्चही कमी करून काटकसरीतूनच पैसा बचत करण्यात येणार आहे. शेतकरी, सभासद, कामगारांची कारखान्याने सर्व बिले वेळेवर दिली आहेत. याची आठवण ठेवून यापुढेही सहकार्य करावे. उपाध्यक्ष थबा कांबळे, संचालक डी. बी. पिष्टे, संजय नांदणे, अविनाश खंजिरे, रावसाहेब भिलवडे, तात्यासाहेब भोकरे, बबन भंडारी, संजय बोरगावे, आप्पासोा चौगुले, लक्ष्मण चौगुले, गुंडा इरकर, रावसाहेब चौगुले, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष सुनील पाटील, इकबाल बैरागदार, सत्येंद्रराजे निंबाळकर, कार्यकारी संचालक बी. ए. आवटी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी स्वागत, सुभाषसिंग रजपूत यांनी आभार, तर बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)यशस्वी वाटचाल करूस्थापनेपासून शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर यांची बिले पहिल्यापासून हंगाम संपल्यानंतर पाच ते सहा दिवसांत देण्याची परंपरा बारा वर्षे जोपासली. परंतु, गेल्या वर्षी साखर उद्योगच अडचणीत आल्याने काही शेतकऱ्यांना दोन महिने उशिरा बिले मिळाली. यावेळी जो दर ठरेल तो देताना पैसा उपलब्ध करून सर्र्वांना न्याय देत यशस्वी वाटचाल करू, असे ते म्हणाले.