शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शरद साखर कारखाना चांगल्या दराची परंपरा कायम राखणार

By admin | Updated: October 24, 2015 00:53 IST

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची ग्वाही : बॉयलरचा प्रदीपन समारंभ उत्साहात; कामगारांची दिवाळी समाधानात जाईल

खोची : साखर उद्योग अडचणीत असल्याने सर्वच घटकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. ज्यावेळी कारखान्याकडे साखर शिल्लकअसते, त्यावेळी बाजारात साखरेचे दर कमी असतात. कारखान्याने साखर विक्री केली आणि ती व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेली की साखरेचे दर वाढतात, अशी विचित्र स्थिती आहे. तरी सुद्धा कारखाना काटकसरीने चालवून एफआरपीप्रमाणे दर देत आहे. आता मात्र काटकसरीत-काटकसर हाच पर्याय आहे. त्यामुळे दर देणे शक्य होणार आहे. कामगारांची दिवाळी समाधानात जाईल, अशी तरतूद केली जाईल, असे प्रतिपादन शरदचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याचा १४वा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम राजेंद्र पाटील (यड्रावकर) व त्यांच्या पत्नी सौ. स्वरूपा पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब चौगुले होते. यावेळी ते बोलत होते.राजेंद्र पाटील म्हणाले, ‘चालू हंगामात साडेसहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कमी उत्पादन खर्चात जास्त गाळप करणे ही गरज बनली आहे. वाहतुकीचा तसेच अन्य खर्चही कमी करून काटकसरीतूनच पैसा बचत करण्यात येणार आहे. शेतकरी, सभासद, कामगारांची कारखान्याने सर्व बिले वेळेवर दिली आहेत. याची आठवण ठेवून यापुढेही सहकार्य करावे. उपाध्यक्ष थबा कांबळे, संचालक डी. बी. पिष्टे, संजय नांदणे, अविनाश खंजिरे, रावसाहेब भिलवडे, तात्यासाहेब भोकरे, बबन भंडारी, संजय बोरगावे, आप्पासोा चौगुले, लक्ष्मण चौगुले, गुंडा इरकर, रावसाहेब चौगुले, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष सुनील पाटील, इकबाल बैरागदार, सत्येंद्रराजे निंबाळकर, कार्यकारी संचालक बी. ए. आवटी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी स्वागत, सुभाषसिंग रजपूत यांनी आभार, तर बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)यशस्वी वाटचाल करूस्थापनेपासून शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर यांची बिले पहिल्यापासून हंगाम संपल्यानंतर पाच ते सहा दिवसांत देण्याची परंपरा बारा वर्षे जोपासली. परंतु, गेल्या वर्षी साखर उद्योगच अडचणीत आल्याने काही शेतकऱ्यांना दोन महिने उशिरा बिले मिळाली. यावेळी जो दर ठरेल तो देताना पैसा उपलब्ध करून सर्र्वांना न्याय देत यशस्वी वाटचाल करू, असे ते म्हणाले.