शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

लघुपाटबंधाऱ्याची कामे रखडणार

By admin | Updated: April 18, 2016 01:08 IST

वरिष्ठांचा नाकर्तेपणा : वेळेत निधी उपलब्ध न झाल्याने नामुष्की

महेश आठल्ये- म्हासुर्ली --वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बी.डी.एस. प्रणालीद्वारे वेळेत निधी उपलब्ध न झाल्याने जलसंधारण विभागास मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी रद्द होण्याची नामुष्की ओढवली असून संपूर्ण राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लघुपाटबंधाऱ्यांची कामे निधीअभावी रखडणार आहेत. परिणामी पुढील काही वर्षे जिल्हा ‘कोरडा’ राहण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद या नावाने कार्यरत असणाऱ्या या महामंडळामार्फत छोटे-मोठे लघुपाटबंधारे तलाव बांधून पाणी साठवण करणे, तसेच क्षारपड जमीन विकास कार्यक्रम राबविणे व राजीव गांधी योजना राबविली जाते. मात्र, या महामंडळाची मुदत संपल्याने या महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळास मुदतवाढ देऊन दहा हजार कोटी रुपयांचा निधीही देण्याची घोषणा केली. यावर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मंजूर झालेला २५० कोटींचा निधी बुडीत होण्याची वेळ आली.वरिष्ठ पातळीवर बी. डी. एस. प्रणालीद्वारे निधी उपलब्ध केला जातो. या प्रणालीत प्रत्येक जिल्हा आपापल्या जिल्ह्यातील कामांची नोंदणी करून निधी वळवून घेतला जातो. ३१ मार्च हा निधी खर्च करण्याचा अंतिम दिवस होता. या दिवशी रात्री उशिरापर्यंत निधी वळविण्यात येईल या अपेक्षेने अधिकारी वाट पहात बसले. मात्र, शेवटपर्यंत निधी जमा झाला नाही. या महामंडळास मुदतवाढीचे कारण पुढे करून निधी देण्यास टाळाटाळ केली. परिणामी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही खर्च करण्याची संधी मिळाली नाही. जिल्ह्यातील २० कोटींच्या निधीवरही पाणी सोडण्याची वेळ आली असून अर्धवट अवस्थेत रखडलेल्या जिल्ह्यातील पणोरे, (ता. पन्हाळा), वासनोली (भुदरगड), झापाचीवाडी (राधानगरी), आयरेवाडी, शेंबवणे, रनवरेवाडी (शाहूवाडी) आदी प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बी. डी. एस. यंत्रणेतील घोळ : दरवर्षी बी. डी. एस. यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असते. मात्र, यावर्षी १० वाजताच बंद केल्याने केवळ दोन तासात निधी वळवणे अडचणीचे ठरले. महामंडळाच्या निधीबरोबरच राज्यस्तरीय योजनांचा निधीही केवळ दोनच तासात उपलब्ध केल्याने तो खर्च टाकताना कसरत करावी लागली. तोही निधी बुडीत झाला. राज्यात १८९ कोटी रुपये मंजूर होते. मात्र, दोन तासांच्या खेळात कसाबसा २ कोटी ७८ लाख निधी उपलब्ध झाला. यामुळे राजीव गांधी सिंचन व कृषी विकास कार्यक्रमाची ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरूनही त्यांना लाभ मिळणार नाही, तर क्षारपड जमीन सुधारण कार्यक्रमांतर्गत उदगाव, कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील कामे ठप्प झाली आहेत. निधी बुडीत झाल्याने जलसंधारणाची कामेही ठप्प झाली आहेत. बी.डी.एस. : अंतिम दिवशी होते कार्यवाही...बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही आॅनलाईन प्रक्रिया असून राज्यशासनामार्फत या प्रणालीद्वारे प्रत्येक विभागवार पैसे ट्रेझरीत पाठविले जातात. तिथे प्रत्येक विभागाच्या कोडनंबरसह कामाप्रमाणे-मंजुरीप्रमाणे रक्कम त्या-त्या खातेप्रमुखांकडे वर्ग केली जाते व गरजेप्रमाणे ती खर्च केली जाते. यावर्षी ३१ मार्च रोजी आठ वाजता ही प्रणाली सुरू करून पैसे राज्यशासना- मार्फत वर्ग केले गेले व तसे कळविले. मात्र, बी. डी. एस. प्रणाली ८वा. सुरू होऊन १२ ऐवजी १०लाच बंद केली गेली. त्यामुळे पैसे जमा होणे व खर्च करणे अडचणीचे झाले. एकीकडे पैसे अंतिम क्षणी द्यायचे आणि घेताना अडचणी आणायच्या, असाच प्रकार घडला आहे. पैसे द्यायचेच होते तर ३६५ दिवसांत केव्हाही देता आले असते. मात्र, अंतिम दिवशी पैसे देऊन व ते काढून घेऊन सरकारने नेमके काय साधले? जेवायला बोलावून पाट द्यायचा, पण ताट द्यायचे नाही, असा हा प्रकार आहे.