शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

गुळावरील नियमन कायम ठेवा

By admin | Updated: December 2, 2014 00:13 IST

अडत्यांची मागणी : शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार

कोल्हापूर : राज्य शासनाने गुळासह पाच वस्तूंवरील नियमन रद्द केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गुळावरील नियमन कायम ठेवण्याची मागणी बाजार समितीमधील अडते, व्यापारी, शेतकऱ्यांनी ‘पणन’चे उपसरव्यवस्थापक प्रकाश अष्टेकर यांच्याकडे केली. गुळावर नियमन कायम ठेवावे, हमीभाव द्यावा आदी मागण्या शेतकऱ्यांनी सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन पणन मंडळाने शेतकरी, अडते व बाजार समिती प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रकाश अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने बैठक घेऊन आढावा घेतला. शासनाने एप्रिल २०१४ पासून गूळ, रवा-मैदा, साखर, खाद्य तेल व ड्रायफु्रट यावरील नियमन रद्द केले आहे. त्यामुळे बाजार समितीचे नियंत्रण या मालाच्या विक्रीवर राहिलेले नाही. शेतकऱ्यांनी त्यांचा माल कुठेही विक्री करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी त्याला शेतकऱ्यांचाच विरोध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबणा सुरू असल्याचे कोल्हापूर जिल्हा गूळ उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. त्याला दुजोरा देत येथे लहान गूळ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गुऱ्हाळघरांवर एकाच प्रतीचा गूळ निघत नसल्याने त्याची विक्री होताना दर पाडण्याची शक्यता अधिक असल्याचे नियमन समितीचे सदस्य व शाहूपुरी व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनाडे यांनी निदर्शनास आणून दिले. गूळ नियमन रद्द केले तर दराबाबत व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा राहणार नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पैशांची हमी कोण घेणार, असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे बाजार समितीचे सचिव संपतराव पाटील यांनी सांगितले. सेवाशुल्क प्रत्येक बाजार समितीत वेगवेगळा आहे, तो एकसारखा ठेवण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. शेतकरी, अडते व बाजार समिती प्रशासनाची भूमिका पणन मंडळासमोर मांडून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन प्रकाश अष्टेकर यांनी दिले. दरम्यान, बैठकीच्या अगोदर समितीच्या सदस्यांना गुळाचे सौदे खुल्या पद्धतीने कसे काढले जातात, दरासाठी व्यापाऱ्यांमध्ये कशी चढाओढ लागते याची माहिती दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर, पणन मंडळाचे कोल्हापूर विभागीय उपव्यस्थापक सुभाष घुले, बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे, सांगली बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)