शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर जिल्ह्यात ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:57 IST

sarpanch Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचयतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे. २

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज घोसरवाड, भामटे राहणार सरपंच विनाच : अनेक तालुक्यात सोडतीवेळी वाद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचयतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे.

२९५ सरपंचपद खुले राहिले तर १४० सरपंच हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग तर १४२ सरपंच अनूसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आहे. शिरोळ तालुक्यातील घोसरवाड व करवीर तालुक्यातील भामटे ही गावे सरपंच विनाच राहणार आहे. येथे अनुक्रमे अनूसूचित जमाती व अनूसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने त्रांगडे तयार झाले आहे.ग्रामपंचायत निवडणूकीपुर्वी सरपंच पदाची आरक्षण काढले जाते, मात्र या टप्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्यानंतर हे आरक्षण काढण्यात आले. निकाल लागल्यापासून सरपंच आरक्षण काय पडेल, याचे आडाखे बांधले जात होते. मागील दोन टर्मला कोणते आरक्षण होते, आता काय पडू शकेल, याचा ठोकताळा बांधूनच आरक्षण सोडतीच्या ठिकाणी इच्छूक गेले होते. पहिल्यांदा अनूसूचित जाती, जमाती, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग ही आरक्षण काढण्यात आली.

अनेक गावातील आरक्षणांवर हरकती घेण्यात आल्या, यातून काही अधिकाऱ्यांशी वादही घातले गेले. घोसरवाड, भामटेचे सरपंच पद रिक्त राहणार आहे, सरपंच निवडीनंतर संबधित निवडणूक अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करतील, त्यानंतर आरक्षणात बदल केला जाणार आहे.अनूसूचित जमातीचे पाच सरपंचजिल्ह्यात अनूसूचित जमाती या प्रवर्गातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), घोसरवाड व राजापूरवाडी(ता. शिरोळ), येळाणे (ता. शाहूवाडी), अरळगुंडी( ता. गडहिंग्लज) सरपंच आरक्षण पडले आहे. त्यापैकी घोसरवाड वगळता चार ठिकाणीच सरपंच होणार आहे. 

टॅग्स :sarpanchसरपंचkolhapurकोल्हापूर