शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

दोन्ही काँग्रेसविरोधात महायुती

By admin | Updated: June 8, 2015 00:52 IST

बाजार समिती निवडणूक : गोकुळ, केडीसीसीतील समझोता एक्स्प्रेस कायम

कोल्हापूर : बाजार समितीच्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडी व महायुती यांच्यातच सामना रंगणार हे जवळपास निश्चित आहे. ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेपाठोपाठ दोन्ही कॉँग्रेसची समझोता एक्स्प्रेस बाजार समितीतही धावण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र अर्ज दाखल केले असले तरी शेवटच्या क्षणी महायुती एकत्रच येणार. इतर पक्ष व नाराजांना सोबत घेऊन दोन्ही कॉँग्रेसना तगडे आव्हान देण्याची त्यांनी तयारी केली आहे. समितीच्या राजकारणात ज्या पक्षाचे विकास सेवा संस्था व ग्रामपंचायतींवर प्राबल्य, त्याच पक्षाचे समितीवर वर्चस्व असते. सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी झाली. ही निवडणूक विभाजनाच्या मुद्द्यावरून चांगलीच रंगली.निवडणूकच होऊ नये, यासाठी कॉँग्रेसने शर्थीचे प्रयत्न केले. त्यातून आठशे उमेदवार रिंगणात राहिले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली; पण दोन वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक आले. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यात ‘गोकुळ’च्या निवडणुकीपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सहकारी संस्था पातळीवर दोन्ही कॉँग्रेसमध्ये सामना व्हायचा; पण राज्य व केंद्रातील सत्ता गेल्याने दोन्ही कॉँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. प्रत्येकाने आपापली संस्थाने ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेत समझोता झाला. समिती निवडणुकीत हा समझोता कायम राहणार का, याबाबत कार्यकर्त्यात संभ्रमावस्था आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आली तरी आघाडीबाबत दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवर चर्चा नाही. त्यात राष्ट्रवादीने जनसुराज्यसोबतची आघाडी कायम ठेवत जोरदार तयारी केली आहे. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व निम्मा कागल असे समितीचे साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र येते. करवीर व राधानगरी सोडली तर उर्वरित ठिकाणी कॉँग्रेसची उमेदवार उभे करण्याइतपत ताकद नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आघाडीबाबत फारसा आग्रह धरलेला नाही. पन्हाळा, शाहूवाडीत जनसुराज्य पक्षाची पकड आहे. राधानगरी, भुदरगड व कागलमध्ये राष्ट्रवादीची ताकद असल्याने एवढ्या ताकदीवर समितीचे मैदान सहज मारता येऊ शकते, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.तरीही आघाडी धर्म कायम ठेवण्यासाठी कॉँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. करवीर व राधानगरीमधील काही जागा कॉँग्रेसला देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. आज, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवार (दि. १३) पर्यंत माघारीची मुदत असल्याने येत्या आठ दिवसांत पॅनेलच्या हालचाली गतिमान होणार आहेत. (प्रतिनिधी)‘शेकाप’ विरोधी आघाडीत ?जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुकांत राष्ट्रवादीचा पारंपरिक मित्रपक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीत काहीसा बाजूला पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी व शेकापमधील संबंध ताणले आहेत. जनसुराज्यबरोबर आघाडी करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेकापशी चर्चाही केलेली नाही. त्यामुळे शेकापच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत आपले अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीबरोबर कॉँग्रेस गेले तर शेकाप महायुतीबरोबर जाणार हे निश्चित आहे. कॉँग्रेससोबत आघाडीची चर्चा झालेली नाही; पण आम्ही सकारात्मक आहोत. आज, सोमवारनंतर याबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल. - आमदार हसन मुश्रीफराष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यास सांगितलेले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास विचार करण्यास हरकत नाही. - पी. एन. पाटील(जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस)५राष्ट्रवादीकडून आघाडीत येण्याबाबत कोणताच प्रस्ताव आलेला नसल्याने आम्ही पॅनेलची तयारी केली आहे. येत्या तीन-चार दिवसांत चित्र स्पष्ट करू.- संपतराव पवार(माजी आमदार)