शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील महिलांना महात्मा गांधी यांनी केले होते मार्गदर्शन तपोवन येथे भेट, विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:47 IST

संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती.

ठळक मुद्देसर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली.

- समीर देशपांडेकोल्हापूर : संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती. तसेच विद्यापीठ हायस्कूलमधील महिला मेळाव्यात या दोघांनीही भाषण केले होते. महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

विद्यापीठ हायस्कूलचे एक संस्थापक दीक्षित गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी कोल्हापुरात येणाºया सर्व मान्यवरांना शाळेमध्ये मार्गदर्शनासाठी बोलवायचे. कोल्हापुरात भरणाºया खादी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महात्मा गांधी येणार होते. ही संधी घेत तपोवनमध्ये राहणारे अनंतराव कटकोन, बाबू अण्णा कोठावळे, अनंतराव भुर्के, अनंतराव पार्टे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांना तपोवनवर आणण्याची जबाबदारी घेतली.

या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले. या ठिकाणी त्यांच्या हस्ते ‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली. यानंतर याच दिवशी अंबाबाई मंदिराजवळील विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा झाला. महात्मा गांधी यांच्या हस्ते प्रारंभ झालेला चरखाश्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक के. आर. कुलकर्णी तेथे सुतकताई करत असत. त्यांच्यानंतर दादा परांजपे, जयवंतराव सरनाईक यांनी सुतकताईचे काम केले. विद्यापीठ हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास सुतकताई शिकवली जात होती. महात्मा गांधींच्या या आठवणी आजही कोल्हापुरात सांगितल्या जातात. 

कोल्हापुरात येणाºया सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी तपोवनवर यावे, विद्यापीठ हायस्कूलमध्ये यावे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी दीक्षित गुरूजींची इच्छा असे. जयप्रकाश नारायण, मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, संत मेहेर बाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल असे अनेक मान्यवर आमच्या हायस्कूलमध्ये येऊन गेले आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची भेट ही अशीच संस्मरणीय ठरली आहे.प्रदीप गबाले -निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.