शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील महिलांना महात्मा गांधी यांनी केले होते मार्गदर्शन तपोवन येथे भेट, विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:47 IST

संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती.

ठळक मुद्देसर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली.

- समीर देशपांडेकोल्हापूर : संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती. तसेच विद्यापीठ हायस्कूलमधील महिला मेळाव्यात या दोघांनीही भाषण केले होते. महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

विद्यापीठ हायस्कूलचे एक संस्थापक दीक्षित गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी कोल्हापुरात येणाºया सर्व मान्यवरांना शाळेमध्ये मार्गदर्शनासाठी बोलवायचे. कोल्हापुरात भरणाºया खादी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महात्मा गांधी येणार होते. ही संधी घेत तपोवनमध्ये राहणारे अनंतराव कटकोन, बाबू अण्णा कोठावळे, अनंतराव भुर्के, अनंतराव पार्टे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांना तपोवनवर आणण्याची जबाबदारी घेतली.

या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले. या ठिकाणी त्यांच्या हस्ते ‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली. यानंतर याच दिवशी अंबाबाई मंदिराजवळील विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा झाला. महात्मा गांधी यांच्या हस्ते प्रारंभ झालेला चरखाश्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक के. आर. कुलकर्णी तेथे सुतकताई करत असत. त्यांच्यानंतर दादा परांजपे, जयवंतराव सरनाईक यांनी सुतकताईचे काम केले. विद्यापीठ हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास सुतकताई शिकवली जात होती. महात्मा गांधींच्या या आठवणी आजही कोल्हापुरात सांगितल्या जातात. 

कोल्हापुरात येणाºया सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी तपोवनवर यावे, विद्यापीठ हायस्कूलमध्ये यावे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी दीक्षित गुरूजींची इच्छा असे. जयप्रकाश नारायण, मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, संत मेहेर बाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल असे अनेक मान्यवर आमच्या हायस्कूलमध्ये येऊन गेले आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची भेट ही अशीच संस्मरणीय ठरली आहे.प्रदीप गबाले -निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.