शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोल्हापुरातील महिलांना महात्मा गांधी यांनी केले होते मार्गदर्शन तपोवन येथे भेट, विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:47 IST

संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती.

ठळक मुद्देसर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली.

- समीर देशपांडेकोल्हापूर : संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती. तसेच विद्यापीठ हायस्कूलमधील महिला मेळाव्यात या दोघांनीही भाषण केले होते. महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

विद्यापीठ हायस्कूलचे एक संस्थापक दीक्षित गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी कोल्हापुरात येणाºया सर्व मान्यवरांना शाळेमध्ये मार्गदर्शनासाठी बोलवायचे. कोल्हापुरात भरणाºया खादी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महात्मा गांधी येणार होते. ही संधी घेत तपोवनमध्ये राहणारे अनंतराव कटकोन, बाबू अण्णा कोठावळे, अनंतराव भुर्के, अनंतराव पार्टे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांना तपोवनवर आणण्याची जबाबदारी घेतली.

या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले. या ठिकाणी त्यांच्या हस्ते ‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली. यानंतर याच दिवशी अंबाबाई मंदिराजवळील विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा झाला. महात्मा गांधी यांच्या हस्ते प्रारंभ झालेला चरखाश्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक के. आर. कुलकर्णी तेथे सुतकताई करत असत. त्यांच्यानंतर दादा परांजपे, जयवंतराव सरनाईक यांनी सुतकताईचे काम केले. विद्यापीठ हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास सुतकताई शिकवली जात होती. महात्मा गांधींच्या या आठवणी आजही कोल्हापुरात सांगितल्या जातात. 

कोल्हापुरात येणाºया सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी तपोवनवर यावे, विद्यापीठ हायस्कूलमध्ये यावे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी दीक्षित गुरूजींची इच्छा असे. जयप्रकाश नारायण, मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, संत मेहेर बाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल असे अनेक मान्यवर आमच्या हायस्कूलमध्ये येऊन गेले आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची भेट ही अशीच संस्मरणीय ठरली आहे.प्रदीप गबाले -निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.