शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

बुलंद आवाजाचे महाराष्ट्र शाहीर हरपले; कुंतीनाथ करके यांचं ह्दयविकारानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:14 IST

हेरले (ता. हातकणंगले) येथील गरीब शेतकरी कुटुंबात १० एप्रिल १९३६ रोजी हेरले येथे करके  यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक डॉ.बापूजी साळुंखे यांचा गुरूसहवास लाभला.

सुरज पाटील

कोल्हापूर हेरले:-  गणूचा गोंदा... सोडून धंदा. रिकामां गावात फिरतोय रं.. अनु आईकडे रूपाया मागतोय रं.." बदलत्या समाज व्यवस्थेतील वास्तवतेवर विनोदी रचनेतून प्रकाश टाकणारे महाराष्ट्र शाहीर कुंतीनाथ करके (वय 85) यांचे रात्री २ वाजता ह्रदयविकारने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेतील हिरा हरपला अशी भावना व्यक्त झाली..त्यांनी अनेक मराठी चित्रपटासाठी गीत लेखन केले होते.

हेरले (ता. हातकणंगले) येथील गरीब शेतकरी कुटुंबात १० एप्रिल १९३६ रोजी हेरले येथे करके  यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक डॉ.बापूजी साळुंखे यांचा गुरूसहवास लाभला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच ते स्वामीविवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रूजू झाले. ज्ञानदानाचे कार्य करत असताना संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य दिले. यातूनच त्यांना लाभलेल्या शाहिरी कलेचीही त्यांनी जोपासना केली, आजवर अनेक विषयांवर, व्यक्तीमत्वावर, इतिहासावर रचलेले आणि गायलेले पोवाडे अजरामर झाले आहेत,उमेदीच्या काळात त्यांनी शाहीरी झंकार, हे शाहीरी काव्य तर 'येडें पेरलं खुळे उगवल" हे विनोदी नाटक प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्या रचनेला आणि वाणीला वेगळीच धार असल्याने महाराष्ट्रातील श्रोत्यांना आजही मंत्रमुग्ध होण्याची भुरळ पडते. त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये गीतरचना केली आहे.

स्वत: शेतकरी कुटुंबात घडलेलं पिंड असल्याने करके सरांनी मातीशी कधी नाळ तोडली नाही,सेवानिवृत्तीनंतर सध्या उतम शेतीवर लक्ष दिले आहे. त्यातृनच जीवनातील अनुभवलेल्या प्रसंगाचं आत्मकथन साकारलं जात आहे. त्यांचे पाझर, चैत्रपालवी, कांचनकुंम, जलधाराइत्यादी काव्यसंग्रह आणि कथा ही महावीरांची हा चरित्र ग्रंथ लिहिला आहे. त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेटसू प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली.त्यांना शासनाचा दलितमित्र पुरस्कार,व डॉ डी वाय पाटील विद्यापीठ मार्फत डिलीट पदवी बहाल करण्यात आलीआहे.आज.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.