शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बुलंद आवाजाचे महाराष्ट्र शाहीर हरपले; कुंतीनाथ करके यांचं ह्दयविकारानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:14 IST

हेरले (ता. हातकणंगले) येथील गरीब शेतकरी कुटुंबात १० एप्रिल १९३६ रोजी हेरले येथे करके  यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक डॉ.बापूजी साळुंखे यांचा गुरूसहवास लाभला.

सुरज पाटील

कोल्हापूर हेरले:-  गणूचा गोंदा... सोडून धंदा. रिकामां गावात फिरतोय रं.. अनु आईकडे रूपाया मागतोय रं.." बदलत्या समाज व्यवस्थेतील वास्तवतेवर विनोदी रचनेतून प्रकाश टाकणारे महाराष्ट्र शाहीर कुंतीनाथ करके (वय 85) यांचे रात्री २ वाजता ह्रदयविकारने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेतील हिरा हरपला अशी भावना व्यक्त झाली..त्यांनी अनेक मराठी चित्रपटासाठी गीत लेखन केले होते.

हेरले (ता. हातकणंगले) येथील गरीब शेतकरी कुटुंबात १० एप्रिल १९३६ रोजी हेरले येथे करके  यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक डॉ.बापूजी साळुंखे यांचा गुरूसहवास लाभला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच ते स्वामीविवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रूजू झाले. ज्ञानदानाचे कार्य करत असताना संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य दिले. यातूनच त्यांना लाभलेल्या शाहिरी कलेचीही त्यांनी जोपासना केली, आजवर अनेक विषयांवर, व्यक्तीमत्वावर, इतिहासावर रचलेले आणि गायलेले पोवाडे अजरामर झाले आहेत,उमेदीच्या काळात त्यांनी शाहीरी झंकार, हे शाहीरी काव्य तर 'येडें पेरलं खुळे उगवल" हे विनोदी नाटक प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्या रचनेला आणि वाणीला वेगळीच धार असल्याने महाराष्ट्रातील श्रोत्यांना आजही मंत्रमुग्ध होण्याची भुरळ पडते. त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये गीतरचना केली आहे.

स्वत: शेतकरी कुटुंबात घडलेलं पिंड असल्याने करके सरांनी मातीशी कधी नाळ तोडली नाही,सेवानिवृत्तीनंतर सध्या उतम शेतीवर लक्ष दिले आहे. त्यातृनच जीवनातील अनुभवलेल्या प्रसंगाचं आत्मकथन साकारलं जात आहे. त्यांचे पाझर, चैत्रपालवी, कांचनकुंम, जलधाराइत्यादी काव्यसंग्रह आणि कथा ही महावीरांची हा चरित्र ग्रंथ लिहिला आहे. त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेटसू प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली.त्यांना शासनाचा दलितमित्र पुरस्कार,व डॉ डी वाय पाटील विद्यापीठ मार्फत डिलीट पदवी बहाल करण्यात आलीआहे.आज.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.