शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

देशात कुपोषणमुक्तीत महाराष्ट्र दुसरा

By admin | Updated: July 16, 2015 23:53 IST

वंदना कृष्णा यांची माहिती : राज्यात २२ टक्के कुपोषित मुले; २०१२ च्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष

सावंतवाडी : भारतात कुपोषणमुक्तीत महाराष्ट्र लवकरच दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे. सध्या महाराष्ट्राबरोबरच तमिळनाडू राज्यही दुसऱ्या क्रमाकांच्या स्पर्धेत आहे, तर पहिल्या क्रमांकावर केरळ राज्य आहे. हा सर्व्हे केंद्र शासनाच्या माध्यमातून झाला आहे. महाराष्ट्रात सध्या कुपोषित बालकांचे प्रमाण २२ टक्क्यावर आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ बाल आरोग्य पोषण अभियानाच्या महासंचालिका वंदना कृष्णा यांनी दिली. हा सर्व्हे अंगणवाडीच्या माध्यमातून २०१२ मध्ये झाल्याचेही त्यांनी सांगितले.श्रीमती कृष्णा या दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी सावंतवाडीत कुषोषणमुक्तीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, गटविकास अधिकारी शरद महाजन, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, आदी उपस्थित होते.यावेळी वंदना कृष्णा म्हणाल्या, महाराष्ट्रात कुपोषणमुक्तीचे प्रमाण आता वाढत असून नंदुरबार, मेळघाट, पालघर व नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये प्रमाण अधिक आहे. यामुळेच महाराष्ट्र भारतात कुपोषणमुक्तीत कमी पडत आहे. मात्र, आता नव्याने या चार जिल्ह्यांसाठी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मोठमोठ्या कंपन्या तसेच लोकप्रतिनिधी, संस्था या कुपोषित गावांना दत्तक घेऊ लागले आहेत. अशा कंपन्या आणखी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या, तर हे कुपोषण लवकरच कमी होईल, अशी आम्हाला आशा आहे.केरळ राज्य कुपोषण मुक्तीत देशात १ नंबरवर आहे, तर लहान राज्यांचा विचार केला, तर गोवाही देशात पुढे आहे. मात्र, मोठ्या राज्यांची तुलना केली तर तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये स्पर्धा सुरू आहेत, (पान ८ वर) सांगली नंबर १, तर सिंधुदुर्ग सातवासिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित मुले नसून, वजन कमी असलेली मुले ६९९ आहेत. मात्र, हा आकडा कमी होईल, अशी आशा वंदना कृष्णा यांनी व्यक्त केली. मी दोन दिवस सर्व्हे केला असून ही आकडेवारी कमी व्हावी यासाठी कसे प्रयत्न केले जावेत, याचे मार्गदर्शन केले असून, सिंधुदुर्गही राज्यात पहिल्या क्रमाकांत बसेल. सध्या सांगली, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले. ही आकडेवारी आम्ही सीएनएस या संस्थेने केलेल्या सर्व्हेतून उघड केली असून ही संस्था पारदर्शक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कुपोषण शब्द मुक्तीसाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून आमचे मिशन या मुक्तीसाठीच प्रयत्न करेल. नंदुरबार, मेळघाट, पालघर, नाशिक या जिल्ह्यांत कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने आम्ही मागे पडत आहोत.- वंदना कृष्णा, महासंचालिका, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य पोषण अभियान