शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

Radhanagari Vidhan Sabha Election 2024: राधानगरीत हॅट्ट्रिक साधत प्रकाश आबिटकर ठरले 'भारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:58 IST

शिवाजी सावंत गारगोटी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ...

शिवाजी सावंतगारगोटी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेचे उमेदवार माजी आमदार के.पी. पाटील यांचा ३८ हजार २५९ मतांनी दारूण पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. आमदार आबिटकर यांना १ लाख ४४ हजार ३५९ इतकी मते मिळाली तर माजी आमदार के.पी. पाटील यांना १ लाख ६ हजार १०९ इतकी मते मिळाली. आमदार आबिटकर यांना तिसऱ्यांदा विजयी करून मतदारांनी मतपेटीतून पुन्हा ‘प्रकाश’राज आणले. सलग तिसऱ्यांदा माजी आमदार के.पी. पाटील यांना मतदारांनी नाकारले.येथील मौनी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून आमदार आबिटकर यांचा मताधिक्याचा आलेख चढता राहिला. कोणत्याही फेरीत के.पी. पाटील यांना मताधिक्य मिळाले नाही. दहाव्या फेरीअखेर मताधिक्य वाढत राहिल्याने आमदारप्रेमी उत्साही कार्यकर्त्यांनी गावागावांत फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली.

महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची संख्या अधिक आहे. माजी आमदार के.पी. पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी भक्कम ताकद लावली होती. आमदार सतेज पाटील यांनी कडक प्रचार यंत्रणा लावली होती. त्यामुळे सुरूवातीपासूनच त्यांचे पारडे जड वाटत होते. त्यांच्या आव्हानाला आमदार आबिटकर हे महायुतीतील मित्रपक्ष आणि भाजपला सोबत घेऊन विकास कामांच्या जोरावर एकाकी झुंज देत होते.सर्व सहकारी, पक्षाच्या नेत्यांनी दिलेले कानमंत्र आणि अर्जुन आबिटकर यांनी लावलेल्या ‘जोडण्या’, मतदारांनी निरपेक्ष भावनेने दिलेले मतदान, लाडक्या बहिणींनी दिलेली ओवाळणी या चार सूत्रीमुळे आमदार आबिटकर यांनी विजयाची मोहर उमटवली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा अधिक ईर्षेने आणि चुरशीने ही निवडणूक लढली गेली.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण जनतेने नेत्यांच्या फॅक्टरपेक्षा मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करून आमदार आबिटकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. विकासकामांचा डोंगर उभा करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. गेल्या दहा वर्षांत ते चोवीस तास सर्वसामान्यांसाठी उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीसोबत थेट संपर्क, विकासाचा आश्वासक चेहरा या त्यांच्या जमेच्या बाजू राहिल्या. तर के.पी. पाटील यांचा मतदारसंघात लोकसंपर्काचा अभाव, विकासाचा कोणताही आराखडा न सांगता केवळ गद्दार आणि गाडण्याची भाषा लोकांना आवडली नाही. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात सत्तेत असतानाही कोणताही ठोस विकास केलेला नाही. त्यामुळे मतदारांनी ‘लई भारी बसा घरी !’ म्हणत पराभव केला.

  • झालेले मतदान ७८.३० टक्के
  • पुरुष- १४०३१५
  • स्त्री- १२९३६५
  • इतर- ९
  • एकूण- २,६९,६८९

पराभूत उमेदवार

  • उद्धवसेनेचे के.पी. पाटील १ लाख ६ हजार १००
  • अपक्ष- ए.वाय. पाटील १८ हजार ८९१
  • मनसे- युवराज येडूरे ६०४
  • बसपा- पांडुरंग गणपती कांबळे ५६९
  • अपक्ष- कृष्णात पाटील ११५७
  • कदरतूल्ला लतिफ १४९
  • नोटा- ९९६

२०१९ च्या निवडणुकीत आमदार आबिटकर यांना १८ हजार ४३० तर यंदा २० हजार मतांची वाढ होऊन ३८ हजार २५९ चे मताधिक्य मिळाले

 

  • आमदार आबिटकर- १,४२,१०५
  • के.पी. पाटील- १,०६,१००
  • मताधिक्य- ३८,२५९

विजयाची कारणे

  • मतदारसंघाच्या विकासाची खात्री आणि भरीव कामगिरी करणार असा जनतेला असलेला विश्वास
  • कार्यकाळात विकासकामांचा डोंगर उभा करून आरोग्य, शैक्षणिक, रस्ते, पर्यटन या क्षेत्रात नेत्रदीपक काम,
  • अतूट असा जबरदस्त लोकसंपर्क,
  • लाडक्या बहिणींनी दिलेली साथ

पराभवाची कारणे

  • मतदारसंघात दहा वर्षांत अत्यल्प जनसंपर्क
  • विकासाच्या दूरदृष्टीचा अभाव,
  • लोकांनी निवडणूक हातात घेतली.

लोकांसाठी केलेले काम, मतदारसंघाचा केलेला कायापालट यामुळे सर्व मतदार बंधू-भगिनींनी मताच्या रुपाने भरभरून प्रेम दिले. भविष्यात या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणार. रोजगार निर्मितीवर विशेष भर देणार. -आमदार प्रकाश आबिटकरजनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. यापुढेही राजकारण,सहकार आणि समाजकारणात आग्रही राहणार. -माजी आमदार के.पी. पाटील

नेते विरुद्ध सामान्य जनता अशी लढतयावेळी झालेली निवडणूक ही नेते विरुद्ध सामान्य जनता अशी झाली आहे. या लढाईत सामान्य माणूस असामान्य आणि किंगमेकर ठरला आहे.टपाली ते निकालीआमदार आबिटकर यांनी टपाली मतपासून घेतलेली मताधिक्याची आघाडी एकतीस फेऱ्यांच्या मताधिक्याने निकाली झाली.सेनेचा पराभव सेनेकडूनशिवसेना पक्षाच्या विभागणी नंतर दोन गटांत झालेल्या लढतीत शिंदेसेना विजयी झाली, तर उद्धव सेनेचा पराभव झाला. अशी लढत ही पहिल्यांदाच झाली आहे.गटातटाच्या राजकारणाला तिलांजली ..लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपल्या मतातून शिक्कामोर्तब केले. हा मतदारसंघ नेत्यांवर नाही तर कर्तृत्वावर भाळतो हे दाखवून दिले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024radhanagari-acराधानगरीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPrakash abitkarप्रकाश आबिटकरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024