शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फोडाफोडीने विजयाची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न; पदयात्रा, गाठीभेटीवर भर

By राजाराम लोंढे | Updated: November 7, 2024 15:35 IST

तिरंगी, पंचरंगी लढतीच्या ठिकाणी घमासान

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत माघारीनंतर एकीकडे थंडीची चाहूल लागली असतानाच प्रचार मात्र तापू लागला आहे. मतदानासाठी अजून तेरा दिवस शिल्लक असले तरी फोडाफोडी, विविध पक्ष, संघटना, समाजाचा पाठिंबा घेऊन विजयाची हवा निर्माण करायची आणि ही हवा विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न दहाही मतदारसंघांत दिसत आहे.विधानसभेच्या दहा मतदारसंघांत २०१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८० जणांनी सोमवारी माघार घेतल्यानंतर दहा जागांसाठी १२१ जण नशीब आजमावत आहेत. बहुतांशी ठिकाणी बंडोबांना थंड करताना राजकीय नेत्यांसह उमेदवारांची दमछाक झाल्याचे दिसले. कोल्हापूर उत्तरमध्ये तर नाट्यमयरीत्या काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेतल्याने लढतीचे चित्रच बदलून गेले. महायुती व महाविकास आघाडीने प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.दहा मतदारसंघांतील लढतीचे चित्र पाहिले तर एकाही ठिकाणी छातीठोकपणे कोणीही विजयाची खात्री देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेला जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीला समान संधी मिळाली. मात्र, लोकसभेला असणारे वातावरण आणि आताच्या वातावरणात कमालीचा फरक जाणवत आहे. प्रचारातील मुद्दे वेगळे आहेतच, त्याचबरोबर या निवडणुकीला स्थानिक प्रश्नांची किनार असल्याने विजयाची शंभर टक्के खात्री देणारे कमी उमेदवार आहेत.फोडाफोडीचे राजकारणाने वेग घेतला आहे. विविध प्रकारची आमिष दाखवून छोटे-मोठे गट आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच मतदारसंघात चढाओढ पाहावयास मिळत आहे. राजकीय पक्ष, विविध संघटना आणि समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी वेगळी यंत्रणा सक्रिय झाली असून रोज एक पक्षप्रवेश अथवा पाठिंबा मिळवून निवडणुकीत आपल्या बाजूने हवा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्यात होणारी हवा मतदानापर्यंत कायम राखून विजयावर स्वार होण्याची रणनीती प्रत्येकाची आहे.तिरंगी, पंचरंगी लढतीच्या ठिकाणी घमासानदहापैकी पाच ठिकाणी तुल्यबळ उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. त्याचबरोबर राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये तिरंगी तर ‘चंदगड’मध्ये पंचरंगी लढत होत आहे. तिरंगी व पंचरंगी लढतीच्या ठिकाणी घमासान सुरू झाले असून धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जात आहे.पदयात्रा, गाठीभेटीवरच भरप्रचार प्रारंभाच्या सभा वगळता पदयात्रा, गाठीभेटी व बैठकांवरच सर्वच उमेदवारांचा भर आहे. उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गाव, वाड्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

परजिल्ह्यातील मतदारांचे नियोजनकामानिमित्त परजिल्ह्यात मतदारांची मोठी संख्या आहे. पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील मतदार आहेत. विशेषता ‘शाहूवाडी’, ‘चंदगड’, ‘कागल’ या मतदारसंघात परजिल्ह्यात असलेल्या मतदारांची संख्या तुलनेत अधिक आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024