शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

Maharashtra Assembly Election 2019 : रविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:34 IST

स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

ठळक मुद्देरविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’राजू शेट्टी यांनी लावला बिल्ला : चूक झाल्याची कबुली

कोल्हापूर : स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

संघटना सोडणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असल्याचे तुपकर यांनी, तर कुटुंबप्रमुख म्हणून वडीलकीच्या नात्याने माफ करून परत घेतले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेंतर्गत असलेल्या वादामुळेच राजीनामा दिला होता, आता त्यावर पडदा पडला आहे, असे दोघांनीही स्पष्ट केले.गेल्या महिनाअखेरीस राजीनामा देऊन अनपेक्षित धक्का देणाऱ्या तुपकरांनी बुधवारी स्वाभिमानीत परत येऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. कोल्हापुरात दुपारी झालेल्या पत्रकार बैठकीत राजू शेट्टी यांनी घोषणा करताना, संघटनेंतर्गत कुरबुऱ्यांमुळे रागाच्या भरात हा निर्णय घेतला होता. आता त्यांची चूक त्यांना उमगली आहे.

शेतकरी चळवळीपेक्षा कोणी मोठा नाही, याचे भान त्यांना लवकर आले. आजच्या घडीला ही चळवळ टिकविणे महत्त्वाचे आहे. तुुपकर यांच्यासारख्या बिनीच्या शिलेदाराची गरज आहे. पुन्हा एकदा ताठ मानेने काम करतील, असे सांगितले.तुपकर यांनी आपली भूमिका मांडताना अंतर्गत वाद सोडविले नसल्यानेच रागातून बाहेर पडलो होतो. सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नसतात, हे शेट्टी यांच्या मुशीत राहून शिकलो असल्याने फार काही बोलणार नाही; पण संघटना सोडण्याची चूक उमगली आहे. त्याचा पश्चाताप होत असून, संघटनेत कोणतेही पद न घेता सामान्य कार्यकर्ता म्हणूनच महाराष्ट्रभर संघटना पोहोचविण्यासाठी काम करणार आहे, असे सांगितले. यावेळी स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राज्य प्रवक्ते अनिल पवार, पंढरीनाथ मांडरे, बापूसाहेब कारंडे, रमेश भोजकर, स्वस्तिक पाटील उपस्थित होते.तुपकर परत का आलेतुपकर संघटना सोडून का गेले, याचे उत्तर त्यांनी राजीनामा देतानाही कळले नव्हते, अंतर्गत वाद असल्याचे ते आता सांगत असले तरी खरे कारण उघड झालेलेच नाही. आता संघटनेत परत आल्यानंतरही ते परत का आले याचे उत्तरही कोणी द्यायला तयार नाही. पत्रकार बैठकीत देखील त्यांना खोदून खोदून विचारले तरी त्यांनी उत्तर देणे टाळले; त्यामुळे ते गेले का आणि परत आले का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.काटेही लवकरच परत येतीलमला सांगूनच तुपकर संघटनेतून बाहेर पडले, मला विचारूनच परत आले. भगवान काटे मला न विचारता गेले आहेत; पण त्यांना स्वत: मीच परत आणणार आहे. त्यांची लवकरच समजूत काढणार आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकाची चळवळीला गरज आहे. त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अजून स्वीकारलेला नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरRavikant Tupkarरविकांत तुपकर