शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : रविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:34 IST

स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

ठळक मुद्देरविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’राजू शेट्टी यांनी लावला बिल्ला : चूक झाल्याची कबुली

कोल्हापूर : स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

संघटना सोडणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असल्याचे तुपकर यांनी, तर कुटुंबप्रमुख म्हणून वडीलकीच्या नात्याने माफ करून परत घेतले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेंतर्गत असलेल्या वादामुळेच राजीनामा दिला होता, आता त्यावर पडदा पडला आहे, असे दोघांनीही स्पष्ट केले.गेल्या महिनाअखेरीस राजीनामा देऊन अनपेक्षित धक्का देणाऱ्या तुपकरांनी बुधवारी स्वाभिमानीत परत येऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. कोल्हापुरात दुपारी झालेल्या पत्रकार बैठकीत राजू शेट्टी यांनी घोषणा करताना, संघटनेंतर्गत कुरबुऱ्यांमुळे रागाच्या भरात हा निर्णय घेतला होता. आता त्यांची चूक त्यांना उमगली आहे.

शेतकरी चळवळीपेक्षा कोणी मोठा नाही, याचे भान त्यांना लवकर आले. आजच्या घडीला ही चळवळ टिकविणे महत्त्वाचे आहे. तुुपकर यांच्यासारख्या बिनीच्या शिलेदाराची गरज आहे. पुन्हा एकदा ताठ मानेने काम करतील, असे सांगितले.तुपकर यांनी आपली भूमिका मांडताना अंतर्गत वाद सोडविले नसल्यानेच रागातून बाहेर पडलो होतो. सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नसतात, हे शेट्टी यांच्या मुशीत राहून शिकलो असल्याने फार काही बोलणार नाही; पण संघटना सोडण्याची चूक उमगली आहे. त्याचा पश्चाताप होत असून, संघटनेत कोणतेही पद न घेता सामान्य कार्यकर्ता म्हणूनच महाराष्ट्रभर संघटना पोहोचविण्यासाठी काम करणार आहे, असे सांगितले. यावेळी स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राज्य प्रवक्ते अनिल पवार, पंढरीनाथ मांडरे, बापूसाहेब कारंडे, रमेश भोजकर, स्वस्तिक पाटील उपस्थित होते.तुपकर परत का आलेतुपकर संघटना सोडून का गेले, याचे उत्तर त्यांनी राजीनामा देतानाही कळले नव्हते, अंतर्गत वाद असल्याचे ते आता सांगत असले तरी खरे कारण उघड झालेलेच नाही. आता संघटनेत परत आल्यानंतरही ते परत का आले याचे उत्तरही कोणी द्यायला तयार नाही. पत्रकार बैठकीत देखील त्यांना खोदून खोदून विचारले तरी त्यांनी उत्तर देणे टाळले; त्यामुळे ते गेले का आणि परत आले का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.काटेही लवकरच परत येतीलमला सांगूनच तुपकर संघटनेतून बाहेर पडले, मला विचारूनच परत आले. भगवान काटे मला न विचारता गेले आहेत; पण त्यांना स्वत: मीच परत आणणार आहे. त्यांची लवकरच समजूत काढणार आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकाची चळवळीला गरज आहे. त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अजून स्वीकारलेला नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरRavikant Tupkarरविकांत तुपकर