शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

Maharashtra Assembly Election 2019 : देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रूळावर येणार नाही : यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:51 IST

देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे, की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रूळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देदेशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रूळावर येणार नाही : यशवंत सिन्हाकोल्हापूर दौऱ्यात माध्यमांशी संवाद

कोल्हापूर : देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे, की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रूळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.सातारा दौऱ्यावर आलेले सिन्हा हे बुधवारी अल्पकाळासाठी कोल्हापुरात आले होते. पहिल्यांदा कोल्हापुरात आलेल्या सिन्हा यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. प्रचारासाठी आलो नाही, हे स्पष्ट करून अर्थशास्त्राचे नियम अतिशय कठोर आणि निष्ठूर असतात, ते कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाही, असा टोलाही लगावला.सिन्हा म्हणाले, ‘देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८ आणि २00८ असे तीनवेळा संकट आले, पण ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशांतर्गत असून, सरकारच्या वैयक्तिक धोरणामुळे ओढवली आहे.

नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंतांना फायदा झाला.

एक लाख ३0 हजार कोटींची रक्कम कृषी आणि रिअल इस्टेटकडे वळवली असती, तर आज जो विकासदर आणि बेरोजगारीने निचांक गाठला आहे, त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असती; पण पंतप्रधानपदी बसलेल्या मोदींना हे करायचेच नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत, त्यांची मते विचारात घेतली जात नाहीत; त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांना दोष देऊन उपयोग नाही. भीती असल्यामुळे आणि निर्णयाविषयी अज्ञान असल्यामुळे त्यांचे मंत्री काय वाटेल ते बरळत सुटले आहेत.म्हणून ३७0 कलमएक देश एक निवडणूक हा भाजपचा अजेंडा आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांतील निवडणुका ही त्याचीच चाचणी आहे. ३७0 कलमाचा काश्मीर वगळता इतर राज्यांशी काही संबंध नसतानाही मुद्दा पुढे आणण्यामागे हेच राजकारण आहे. संवेदनशील मुद्द्यांचे पूर्णपणे राजकारण केले आहे, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.विरोधकांचे खच्चीकरणलोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांचे खच्चीकरण झाले असून, त्यांची ताकदही विस्कळीत झाली आहे. विरोधकांचा आवाज बाहेर येऊच नये, आला तरी तो जनतेपर्यंत पोहोचू नये, याची पद्धतशीर व्यवस्था भाजपकडून केली जात आहे. अर्थव्यवस्थेचे खरे आकडे लपविले जात आहेत, असा आरोपही सिन्हा यांनी केला. 

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाkolhapurकोल्हापूर