शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रूळावर येणार नाही : यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:51 IST

देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे, की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रूळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देदेशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रूळावर येणार नाही : यशवंत सिन्हाकोल्हापूर दौऱ्यात माध्यमांशी संवाद

कोल्हापूर : देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे, की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रूळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.सातारा दौऱ्यावर आलेले सिन्हा हे बुधवारी अल्पकाळासाठी कोल्हापुरात आले होते. पहिल्यांदा कोल्हापुरात आलेल्या सिन्हा यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. प्रचारासाठी आलो नाही, हे स्पष्ट करून अर्थशास्त्राचे नियम अतिशय कठोर आणि निष्ठूर असतात, ते कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाही, असा टोलाही लगावला.सिन्हा म्हणाले, ‘देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८ आणि २00८ असे तीनवेळा संकट आले, पण ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशांतर्गत असून, सरकारच्या वैयक्तिक धोरणामुळे ओढवली आहे.

नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंतांना फायदा झाला.

एक लाख ३0 हजार कोटींची रक्कम कृषी आणि रिअल इस्टेटकडे वळवली असती, तर आज जो विकासदर आणि बेरोजगारीने निचांक गाठला आहे, त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असती; पण पंतप्रधानपदी बसलेल्या मोदींना हे करायचेच नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत, त्यांची मते विचारात घेतली जात नाहीत; त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांना दोष देऊन उपयोग नाही. भीती असल्यामुळे आणि निर्णयाविषयी अज्ञान असल्यामुळे त्यांचे मंत्री काय वाटेल ते बरळत सुटले आहेत.म्हणून ३७0 कलमएक देश एक निवडणूक हा भाजपचा अजेंडा आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांतील निवडणुका ही त्याचीच चाचणी आहे. ३७0 कलमाचा काश्मीर वगळता इतर राज्यांशी काही संबंध नसतानाही मुद्दा पुढे आणण्यामागे हेच राजकारण आहे. संवेदनशील मुद्द्यांचे पूर्णपणे राजकारण केले आहे, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.विरोधकांचे खच्चीकरणलोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांचे खच्चीकरण झाले असून, त्यांची ताकदही विस्कळीत झाली आहे. विरोधकांचा आवाज बाहेर येऊच नये, आला तरी तो जनतेपर्यंत पोहोचू नये, याची पद्धतशीर व्यवस्था भाजपकडून केली जात आहे. अर्थव्यवस्थेचे खरे आकडे लपविले जात आहेत, असा आरोपही सिन्हा यांनी केला. 

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाkolhapurकोल्हापूर