शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

महालक्ष्मीचा ‘गोंधळ’ काळभैरीच्या दारी ! : गडहिंग्लजमधील मंदिर बांधकामाचा वाद वेळ चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:35 IST

गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरी मंदिरात नुकतीच चोरी झाली. त्यानंतर येथील महालक्ष्मीयात्रा समितीच्या पुढाकाराने भाविकांच्या देणगीतून ‘श्रीं’च्या मूर्तीसाठी

ठळक मुद्देप्रशासनाने हस्तक्षेप करण्याची गरज हिशेब जाहीर करण्याबरोबरच मंदिर बांधकामाच्या पूर्ततेचा कालबद्ध कृती कार्यक्रम जनतेसमोर ठेवण्याची गरज

राम मगदूम।

गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरी मंदिरात नुकतीच चोरी झाली.त्यानंतर येथील महालक्ष्मीयात्रा समितीच्या पुढाकाराने भाविकांच्या देणगीतून ‘श्रीं’च्या मूर्तीसाठी नवीन दागिने आणि गाभाºयाच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने सुरू झाले. त्यामुळे भाविक सुखावले असतानाच मंदिराच्या बांधकामाचा वाद सुरू झाल्याने शांतताप्रिय गडहिंग्लजच्या सलोख्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रशासनानेच त्यात हस्तक्षेप करूनहा ‘गोंधळ’ वेळीच थांबविण्याची गरज आहे.

३० वर्षापूर्वी ‘श्रीं’चा दीड किलोचा सोन्याचा मुखवटा चोरीला गेला. त्यानंतर परवाच्या चोरीत जोगेश्वरी देवीच्या मंगळसूत्रासह देवाचे सगळेच दागिने चोरीला गेले. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना धक्का बसला; परंतु महालक्ष्मीयात्रा समितीच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेऊन भाविकांच्या देणगीतून ‘श्रीं’साठी नवीन दागिने बनविण्याचा संकल्प सोडला. त्यामुळे देणग्यांचा ओघही सुरू झाला; परंतु पहिल्याच बैठकीत काही मंडळींनी जीर्णोद्धार समितीवर ‘ताशेरे’ ओढले आणि मंगळवारच्या ग्रामसभेत त्यांच्यावर चक्क ‘हल्लाबोल’ केला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून गावातील वातावरण कलुषित होण्याची शक्यताअसल्याने पोलिसांनी व प्रशासनाने त्याची वेळीच नोंद घेणे गरजेचेआहे. तीन वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरळीत पार पडली. त्याचे नेटके नियोजन यात्रा समितीने केले. त्याला समस्त गावकºयांसह नगरपालिका आणि सर्वच शासकीय खात्यांनी सक्रीय साथ दिली. लोकवर्गणीतून झालेल्या यात्रेचा जमा-खर्चदेखील ‘समिती’ने तातडीने जाहीर करून सर्वांची वाहवा मिळविली. त्याबद्दल कुणाचेही दुमत नाही.दरम्यान, यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांच्याच पुढाकाराने येथील रिंगणे मळ्यात भक्तांच्या देणगीतूनच अवघ्या दोन वर्षांतसुमारे सव्वा कोटीचे भव्यदिव्य असेश्री बाळूमामा मंदिर साकारण्यात आले. त्यामुळेच त्यांनी हाकदेताच काळभैरीच्या दागिन्यांसाठीही देणग्यांचा ओघ सुरू झालाआहे; परंतु याच दरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या काळभैरीमंदिर ज[र्णोद्धाराचा आणि त्याच्या जमा-खर्चाच्या मुद्द्यावरून नवीन वाद सुरू झाला आहे.वेळ चुकीची !दीड तपापासून सुरू असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्याबद्दल मत-मतांतरे असू शकतात.लोकवर्गणीतून सुरू असलेल्या या कामाचाही जमा-खर्च मागायला हरकत नाही, तो आतापर्यंत कुणीही मागितलेला नव्हता.परंतु, मंदिरातील चोरीच्या निमित्ताने त्याचे ‘कवीत्व’ सुरू होणे गडहिंग्लजच्या संस्कृतीला धरून नाही. सध्याच्या भावनिक माहोलात हा वाद गावाला परवडणारा नाही.उपाय काय ?देवस्थान उपसमितीनेही जीर्णोद्धाराचा लेखा-जोखा वेळोवेळी जाहीर करणे क्रमप्राप्त आहे. तसे न झाल्यामुळेच ही वेळ आली आहे. त्यामुळे हिशेब जाहीर करण्याबरोबरच मंदिर बांधकामाच्या पूर्ततेचा कालबद्ध कृती कार्यक्रम जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे, हाच या वादावरील उपाय आहे.महालक्ष्मी मंदिराचा निधी का परत गेला ?आमदार मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने गडहिंग्लजमधील सहा धार्मिकस्थळांच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मिळाला होता.मात्र, महालक्ष्मी देवस्थान समिती, यात्रा समिती आणि नगरपालिका यांच्यातील वादामुळेच लक्ष्मी मंदिरासाठी मिळालेला एक कोटीचा निधी परत गेला.तो कुणामुळे गेला, त्याला जबाबदार कोण ? याचेउत्तर गडहिंग्लजकर अजून शोधत आहेत. अशावेळी काळभैरी मंदिर बांधकामाचा वाद उपस्थित होणे उचित नाही.