शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘जय भवानी’वर महालक्ष्मी आघाडीचे वर्चस्व

By admin | Updated: October 4, 2015 23:54 IST

सर्व जागा जिंकल्या : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत दहा वर्षांची सत्ता उलथवली

आमजाई व्हरवडे : संपूर्ण भोगावती परिसराचे लक्ष लागून राहिलेल्या आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील जय भवानी विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ जयभवानी आघाडीने सर्व बारा जागा जिंकत दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. संस्थेच्या प्रगतीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येवून सत्तारूढ गटाला हादरा देण्याचा निर्णय घेतला. या नेत्यांच्या समझोता एक्स्प्रेसला सर्वसामान्य मतदारांनीही पाठबळ दिले. सत्तारूढ गटाने गावाच्या बाहेरील व्यक्तींना संस्थेचे सभासदत्व करून घेतल्याने गावात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. बाहेरील सभासदांचाच या निवडणुकीत कळीचा मुद्दा झाला होता. सत्तारूढ गटाने जवळपास दोनशेपेक्षा अधिक मतदार वाढवल्याने निवडणूक रंगतदार झाली. संस्थेच्या कारभाराबाबतही विरोधकांनी सत्तारूढ गटावर टीकास्त्र सोडले होते. शनिवारी झालेल्या निवडणुकीत बारा जागांसाठी चार अपक्षांसह दोन्ही पॅनेलचे अठ्ठावीस उमेदवार रिंंगणात होते. महालक्ष्मी विकास आघाडीचे शंभरच्या आसपास मताधिक्क्य घेऊन सर्व बारा जागा जिंकल्या व दहा वर्षांनंतर सत्ता हस्तगत केली. विरोधी आघाडीच्या समर्थकांनी फटाक्यांची व गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. बी. पाटील यांनी काम पाहिले. राधानगरीचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस पाटील अशोक पाटील उपस्थित होते. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व विष्णुपंत चौगले, यशवंत चव्हाण, बापूसो लिंगडे, शंकर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील, राजेंद्र चौगले, डॉ. सुभाष पाटील, मुकुंद पाटील, बी. डी. पाटील, अरूण पाटील, विलास चौगले, हिंदुराव कांबळे, आदींनी तर सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व मधुकर वरूटे, पंडित चव्हाण, अशोक लिंगडे, बाजीराव चौगले यांनी केले. गावाने दिले गावाने घेतले गेल्या तीन वर्षांपूर्वी आमजाई व्हरवडे गावाने ग्रा. पं. निवडणूक बिनविरोध करून मधुकर वरूटे दांपत्याला सरपंच व उपसरपंचपदे देऊन जिल्ह्यात एक इतिहास केला होता. मात्र वरूटेंनी विकासकामच केले नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी विकास संस्थेतून वरूटेंना हद्दपार करून सत्ता भोगण्यास लायक नसल्याचेच दाखवून देत आगामी ग्रा. पं. च्या निवडणुकीला वरूटेंना धोक्याची घंटा दिली आहे. त्यामुळे गावाने दिले तसे गावाने घेतले, असे म्हणण्याची वेळ आली. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट - विलास आनंदराव चौगले (३६९), मुकुंद पांडुरंग पाटील (३६९), अरूण शिवाजी चौगले (३६२), दत्तात्रय बंडोपंत पाटील (३४३), बाबूराव दादू पाटील (३२७), अंकुश संभू पाटील (३३१), कोंडीबा बाळू पाटील (३२४), आनंदा महिपती रणदिवे (३२०), महिला प्रतिनिधी द्रोपदी विष्णू पाटील (३६३), संगीता बाळासो पाटील (३२१) मागासवर्गीय प्रतिनिधी राजाराम सखाराम कांबळे (३४१), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी रघुनाथ केरबा टिपुगडे (३२७).