शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

महासंग्रामात ‘महासंभ्रम’

By admin | Updated: January 17, 2017 01:01 IST

ॅमतदारसंघानुसार राजकारणात बदल : महत्त्वाकांक्षी कार्यक र्त्यांना प्रभावी पर्याय

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरदिल्लीची आणि मुंबईची राजकीय गादी बदलल्याचा परिणाम गावपातळीवर कसा होऊ शकतो, याचे उत्तम प्रत्त्यंतर सध्या येत असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नव्हे तेवढी राजकीय महासंभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वीस वर्षांत कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण हे प्रामुख्याने दोन्ही काँग्रेसभोवती फिरत राहिले. त्यातही राष्ट्रवादी बऱ्यापैकी एकसंघ जाणवत होती. मात्र, ‘महाडिक फॅक्टर’मुळे प्रत्येकवेळी काही तरी वेगळेच चित्र निर्माण व्हायचे. गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने जिल्ह्यात बस्तान बसविले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहापैकी शिवसेनेच्या सहा उमेदवारांनी आमदारकी मिळवली.महाडिक यांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढत त्यांचा पराभव करत सतेज पाटील यांनी त्यांच्या स्थानाला धक्का लावला; परंतु महाडिकांनी जिल्ह्यातील बदललेल्या परिस्थितीचा अचूक लाभ उठवत ‘ताराराणी आघाडी’चे पुनरूज्जीवन केले. स्वत: अपक्ष, मुलगा अमल भाजपचे आमदार, दुसरे चिरंजीव स्वरूप ‘ताराराणी आघाडी’चे अध्यक्ष आणि पुतण्या धनंजय राष्ट्रवादीचे खासदार असे सर्वपक्षीय बहुरंगी चित्र महाडिक यांनी राजकारणात काढून ठेवले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांना महापालिकेची थोडक्यात हुकलेली सत्ता जिल्हा परिषदेत मिळवायची आहे. त्यासाठी ते ‘भाजता’चा प्रयोग राबवत आहेत. परंतु या सगळ्याचा परिणाम म्हणजे सर्व तालुक्यांतील महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांना प्रभावी पर्याय मिळाले आहेत. या सगळ्यामुळे ‘प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका’ असं चित्र मात्र निर्माण झालं आहे. भाजपसोबत जिल्ह्यात असणारा जनसुराज्य पुलाची शिरोली येथे महाडिक यांच्या सुनेच्याविरोधात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसोबत राहण्याची शक्यता आहे. काही तालुक्यांतील एका मतदारसंघात दोन्ही काँग्रेस एकत्र तर दुसरीकडे मैत्रीपूर्ण लढताना दिसणार आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप तर शाहूवाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. सत्तेत असणारा राजू शेट्टी यांचा ‘स्वाभिमानी पक्ष’ काही ठिकाणी भाजपच्या विरोधात शड्डू ठोकताना दिसणार आहे. त्यामुळे एक मतदारसंघ सोडल्यानंतर दुसऱ्या मतदारसंघातील सभेत बोलताना आपल्या व्यासपीठावर नेमके कोण आहेत हे बघूनच नेत्यांना भाषणाला सुरुवात करावी लागणार आहे. प्रत्येकाला हवे नेतृत्व : भविष्यातील जोडण्या !ंजिल्हा बँक, गोकुळ, साखर कारखाना आणि पुढची विधानसभा तसेच आगामी विधान परिषद असे सर्व संदर्भ डोळ्यांसमोर ठेवून जो-तो जोडणी लावायच्या प्रयत्नात आहे. चंद्रकांतदादांना भाजपप्रणित सत्ता जिल्हा परिषदेत आणायची आहे. कोरे, महाडिक यांना त्यांचे जिल्ह्यात राजकारण मजबूत करायचे आहे, महाडिकांना तर हुकलेली जि. प. अध्यक्षांची ‘लाल दिव्या’ची गाडी घरी आणायची आहे, सतेज पाटील यांना जिल्ह्याचे नेतृत्व हवे आहे, पुढची विधान परिषदेची जोडणीही घालायची आहे, शिवसेनेच्या पाच आमदारांना गणित साधायचं आहे, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी सत्तेत असतानाही जमलं तर भाजपला दणका द्यायचाय, मुश्रीफ यांना मतदारसंघ सेफ करायचाय, संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांना लोकसभा खुणावतेय, असे ज्याच्या-त्याच्या इंटरेस्टमुळे हा महासंभ्रम निकालापर्यंत कायमच राहणार आहे.महाडिकांच्या जाहिरातीत विनय कोरेंचा फोटोराजकारण कसं बदलत जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाची जाहिरात होय. ज्या विनय कोरे यांनी महाडिक यांच्या लोकसभेच्या उमेदवारी जिल्ह्यात पहिल्यांदा जाहीर विरोध केला होता त्याच महाडिक यांच्या पूर्ण पान जाहिरातीत नेत्यांच्या यादीत विनय कोरे यांचा फोटो होता. त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.