शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मधुरिमाराजे, नंदाताईनी पाठविले माघारीचे खलिते : -उमेदवारीला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:05 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोनवेळा कुपेकर वहिनींना भेटून गेले. अखेर आम्ही दोघी राजकारणातून बाजूला होत असल्याचे पत्र नंदाताई नी लिहिले आहे. अशा पद्धतीने या दोन्ही विषयांवर अखेर पडदा पडला आहे.

ठळक मुद्देनवा राजवाडा, कानडेवाडीच्या वाड्यांची भूमिका स्पष्ट

कोल्हापूर : गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वाडे चर्चेत आले होते. एक होता नवीन राजवाडा आणि दुसरा होता गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडीचा वाडा. मधुरिमाराजे आणि नंदाताई बाभूळकर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडून आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे तसे माघारीचे खलितेच त्यांनी धाडले आहेत.कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा एक आदरयुक्त दबदबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. स्वच्छ प्रतिमा, राजघराण्याचे वलय असूनही मालोजीराजे यांनी सन २००४ मध्ये विधानसभा लढवून बाजी मारली हा अपवादवगळता लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या एका निवडणुकीत या घराण्यातील सदस्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आताही विधानसभेसाठी मालोजीराजे यांच्या पत्नी आणि दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. खानविलकर समर्थकांनी मेळावाही घेतला होता. निवडणूक लढवाच, असा त्यांना आग्रह होता; परंतु लढण्याबाबत कोणतेच स्पष्टीकरण वाड्यावरून दिले जात नसल्याने संभ्रम वाढला होता. मात्र, बुधवारी मालोजीराजे यांनी फेसबुकवरून स्पष्टीकरण देत या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दुसरीकडे, असेच वातावरण गेले महिनाभर बाबासाहेब कुपेकर यांच्या कानडेवाडीतील वाड्यावर होते. संध्यादेवी कुपेकर लढणार नसल्याने यावेळी नंदाताई बाभूळकर रिंगणात असतील, अशीच अटकळ होती. मात्र, चंदगडची जागा नेमकी कुणाला सुटणार आणि भाजप आपल्याला कधी प्रवेश देणार हा अंदाज घेत खूप वेळ गेला आणि संध्यादेवी आणि नंदाताई यांना निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करावे लागले. त्यानंतरही कार्यकर्ते भावनिक झाले आणि वेळ पडल्यास पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा नंदाताई ना करावी लागली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोनवेळा कुपेकर वहिनींना भेटून गेले.

परंतु अखेर चंदगडची जागा शिवसेनेला सुटली. त्यातच चुलतभाऊ संग्रामसिंह यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अखेर आम्ही दोघी राजकारणातून बाजूला होत असल्याचे पत्र नंदाताई नी लिहिले आहे. अशा पद्धतीने या दोन्ही विषयांवर अखेर पडदा पडला आहे.जिल्हा नेतृत्वाची विरोधकांना ताकदबाभूळकर यांच्या या पत्रामध्ये जिल्हा नेतृत्वावरही रोष व्यक्त केला आहे. संघटना मजबूत स्थितीमध्ये असतानाही दुर्दैवाने जिल्हा नेतृत्वाने आपल्या विरोधकांना सातत्याने ताकद देऊन आपले मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

यावेळी निवडणूक लढविण्यासाठी अत्यंत पोषक आणि सकारात्मक वातावरण आहे, याची आम्हाला जाणीव आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी असावी हा जनमानसाचा कौल होता; परंतु व्यक्तिगत कारणांमुळे आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.- मालोजीराजे छत्रपती / मधुरिमाराजे छत्रपती

बदल हा निसर्गाचा नियम आहे. माझा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे. आजपर्यंतकै. दादा, आईसाहेब व मी स्वत: हा विकासाचा जगन्नाथाचा रथ आपल्या सर्वांसोबत पुढे नेला आहे. आता इथून पुढचा प्रवास नवीन नेतृत्वाखाली व्हावा. या वळणावर आपण सर्वांनी आम्हाला प्रेमाने निरोप द्यावा, ही विनंती.

- डॉ नंदिनी बाभूळकर

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक