शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

मधुरिमाराजे, नंदाताईनी पाठविले माघारीचे खलिते : -उमेदवारीला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:05 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोनवेळा कुपेकर वहिनींना भेटून गेले. अखेर आम्ही दोघी राजकारणातून बाजूला होत असल्याचे पत्र नंदाताई नी लिहिले आहे. अशा पद्धतीने या दोन्ही विषयांवर अखेर पडदा पडला आहे.

ठळक मुद्देनवा राजवाडा, कानडेवाडीच्या वाड्यांची भूमिका स्पष्ट

कोल्हापूर : गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वाडे चर्चेत आले होते. एक होता नवीन राजवाडा आणि दुसरा होता गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडीचा वाडा. मधुरिमाराजे आणि नंदाताई बाभूळकर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडून आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे तसे माघारीचे खलितेच त्यांनी धाडले आहेत.कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा एक आदरयुक्त दबदबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. स्वच्छ प्रतिमा, राजघराण्याचे वलय असूनही मालोजीराजे यांनी सन २००४ मध्ये विधानसभा लढवून बाजी मारली हा अपवादवगळता लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या एका निवडणुकीत या घराण्यातील सदस्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आताही विधानसभेसाठी मालोजीराजे यांच्या पत्नी आणि दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. खानविलकर समर्थकांनी मेळावाही घेतला होता. निवडणूक लढवाच, असा त्यांना आग्रह होता; परंतु लढण्याबाबत कोणतेच स्पष्टीकरण वाड्यावरून दिले जात नसल्याने संभ्रम वाढला होता. मात्र, बुधवारी मालोजीराजे यांनी फेसबुकवरून स्पष्टीकरण देत या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दुसरीकडे, असेच वातावरण गेले महिनाभर बाबासाहेब कुपेकर यांच्या कानडेवाडीतील वाड्यावर होते. संध्यादेवी कुपेकर लढणार नसल्याने यावेळी नंदाताई बाभूळकर रिंगणात असतील, अशीच अटकळ होती. मात्र, चंदगडची जागा नेमकी कुणाला सुटणार आणि भाजप आपल्याला कधी प्रवेश देणार हा अंदाज घेत खूप वेळ गेला आणि संध्यादेवी आणि नंदाताई यांना निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करावे लागले. त्यानंतरही कार्यकर्ते भावनिक झाले आणि वेळ पडल्यास पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा नंदाताई ना करावी लागली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोनवेळा कुपेकर वहिनींना भेटून गेले.

परंतु अखेर चंदगडची जागा शिवसेनेला सुटली. त्यातच चुलतभाऊ संग्रामसिंह यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अखेर आम्ही दोघी राजकारणातून बाजूला होत असल्याचे पत्र नंदाताई नी लिहिले आहे. अशा पद्धतीने या दोन्ही विषयांवर अखेर पडदा पडला आहे.जिल्हा नेतृत्वाची विरोधकांना ताकदबाभूळकर यांच्या या पत्रामध्ये जिल्हा नेतृत्वावरही रोष व्यक्त केला आहे. संघटना मजबूत स्थितीमध्ये असतानाही दुर्दैवाने जिल्हा नेतृत्वाने आपल्या विरोधकांना सातत्याने ताकद देऊन आपले मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

यावेळी निवडणूक लढविण्यासाठी अत्यंत पोषक आणि सकारात्मक वातावरण आहे, याची आम्हाला जाणीव आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी असावी हा जनमानसाचा कौल होता; परंतु व्यक्तिगत कारणांमुळे आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.- मालोजीराजे छत्रपती / मधुरिमाराजे छत्रपती

बदल हा निसर्गाचा नियम आहे. माझा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे. आजपर्यंतकै. दादा, आईसाहेब व मी स्वत: हा विकासाचा जगन्नाथाचा रथ आपल्या सर्वांसोबत पुढे नेला आहे. आता इथून पुढचा प्रवास नवीन नेतृत्वाखाली व्हावा. या वळणावर आपण सर्वांनी आम्हाला प्रेमाने निरोप द्यावा, ही विनंती.

- डॉ नंदिनी बाभूळकर

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक