शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

फुप्फुस, इतर अवयवांनाही ‘टीबी’ची लागण शक्य -: डॉ. उषादेवी कुंभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:54 IST

इतरांना संसर्गातून होणारा असा हा आजार असल्याने टीबी झालेल्या रुग्णांनी ‘कफ एटिकेट्स’ पाळण्याची गरज आहे. खोकताना, शिंकताना, बोलताना तोंडावर रुमाल धरावा. ऊठसुट कुठेही थुंकू नये. कोणतेही व्यसन करू नये.

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद-

समीर देशपांडे ।देशात प्रत्येक तीन मिनिटांनी ‘टीबी’ (क्षयरोग)ने दोन रुग्णांचा मृत्यू होतो. टीबी ही भारतातील एक प्रमुख सामाजिक आरोग्य समस्या बनली असून सहा हजार व्यक्तींना नव्याने टीबी होतो. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे; तर केंद्र सरकारने २०२५ पर्यंत ‘टीबीमुक्त भारत’ अशी घोषणा केली आहे. १० ते २४ आॅक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष गृहभेटी देऊन ‘टीबी’ची तपासणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न : टीबीची लक्षणे कोणती ?उत्तर : दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीवाटे रक्त पडणे ही टीबीची लक्षणे आहेत. सातत्याने ताप येत असेल आणि खोकला सुरू असेल, वजन प्रमाणापेक्षा कमी होत असेल तर तो टीबी असू शकतो.

प्रश्न : ही लक्षणे आढळल्यास नागरिक, ग्रामस्थांनी काय करावे ?उत्तर : सर्व शासकीय दवाखाने किंवा त्यांच्या इच्छेनुसार खासगी दवाखान्यात बेडका तपासायला देणे आवश्यक आहे. शक्य तेथे एक्स-रे काढले जातील. सीबीनेट तपासणी हा एक भाग आहे. त्यासाठी शासनाने ४५ लाख रुपयांचे एक अशी चार मशीन्स बसवली आहेत. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, इचलकरंजी येथील आयजीएम, सीपीआर हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे ही मशीन्स आहेत. तेथे टीबी झाला आहे की नाही , कोणत्या टप्प्यातील आहे, याचे निदान करता येते.

प्रश्न : टीबी रुग्णशोध मोहिमेचे स्वरूप काय ?उत्तर : जिल्ह्यात १० ते २४ आॅक्टोबर २०१९ या दरम्यान टीबी रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. झोपडपट्टी, स्थलांतरित वस्त्या, औद्योगिक कामगार, असंघटित कामगार, दगड फोडणारे, खाणीमधील कामगार वस्त्या अशा ठिकाणी जाऊन हे काम केले जाणार आहे. जिल्ह्णातील ७५९४०२ इतक्या घरांमधील ३४ लाख १७ हजार ३०६ जणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ५३१० कर्मचारी काम करणार आहेत.आहाराला कितपत महत्त्व आहे?टीबीच्या रुग्णांसाठी आहार महत्त्वाचा आहे. हिरव्या भाज्या, कडधान्ये, अंडी हा आहार घेणे आवश्यक आहे. चांगली प्रथिने मिळतील असा आहार या रुग्णांनी घेण्याची गरज आहे. आपला आजार आणि त्याविषयीची घ्यावयाची काळजी यांचा अभ्यास करावा.

अशा रुग्णांनी काय करू नये?इतरांना संसर्गातून होणारा असा हा आजार असल्याने टीबी झालेल्या रुग्णांनी ‘कफ एटिकेट्स’ पाळण्याची गरज आहे. खोकताना, शिंकताना, बोलताना तोंडावर रुमाल धरावा. ऊठसुट कुठेही थुंकू नये. कोणतेही व्यसन करू नये.जिल्ह्यातील टीबी रुग्णांची संख्याजिल्ह्णात २०१५ साली २६२१, २०१६ साली २४१६, २०१७ साली २३७१, २०१८ साली २१३३ आणि २०१९ च्या सहा महिन्यांमध्ये १०९७ इतके टीबीचे रुग्ण आढळले आहेत. शाहूवाडी तालुक्यात हे प्रमाण अधिक आढळते. ज्या टीबी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

टीबी (क्षयरोग) म्हटले की तो केवळ फुप्फुसालाच होतो असा गैरसमज आहे. केस , नख सोडून सर्व अवयवांना ‘टीबी’ची लागण होऊ शकते. चांगले उपचार उपलब्ध करून दिले असले तरी याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे : डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर