शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शिवकालीन तलावास पर्यटनाचा लूक

By admin | Updated: February 6, 2016 00:03 IST

जोतिबा येथील कामास प्रशासकीय मंजुरी : आराखडा तयार; राज्य सरोवर संवर्धन योजनेतून निधी

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर --पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी (जोतिबा) येथील शिवकालीन कर्पूरेश्वर तलावास पर्यटनाचा ‘लूक’ मिळणार आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेतून या तलावासाठी २ कोटी ३८ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत. कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील यांनी मंत्रालयीन स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या तलावास शासनाकडून निधी मिळाला आहे. अन्य दोन तलावांचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रसिद्ध आराध्य दैवत म्हणून पुराणकाळापासून श्री जोतिबा प्रसिद्ध आहे. डोंगरावरील वाडी रत्नागिरीची लोकसंख्या ४,७०० इतकी आहे. यात्राकाळासह इतर वेळीही जोतिबा डोंगरावर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. ग्रामस्थ व बाहेरून येणारे भाविक यांना पाणी व अन्य मूलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीवर ताण पडतो.सध्या केर्ली (ता. करवीर) येथून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरून कासारी नदीतून पिण्यासाठी डोंगरावर पाणी नेले आहे. ४५० मीटर उंचीवर पाणी जात असल्यामुळे तीन ठिकाणी ते विद्युतपंपाने उपसावे लागते.जोतिबा येथे केवळ पाण्यासाठीच्या वीजबिलापोटी वर्षाला १६ ते १७ लाख रुपये खर्च करावे लागतात. ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे ठोस मार्ग नसल्यामुळे विजेचे बिल भरणे अवघड होत आहे. यामुळे डोंगरावर असलेल्या शिवकालीन तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.डोंगरावर कर्र्पूरेश्वर, गायमुख, चव्हाण, मुरलीधर, यमाई असे तलाव आहेत. अनेक वर्षांपासून या तलावाच्या देखभाल-दुरुस्तीकडे, नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पाणी दूषित झाले आहे. तसेच तलावात जलपर्णी वाढली आहे.दरम्यान, शिवकालीन कर्पूरेश्वर, मुरलीधर, गायमुख तलावातून पिण्यासाठी पाणी वापरणे शक्य आहे. याशिवाय तलावाचे सुशोभीकरण, दुरुस्ती, बगीचा तयार केल्यास पर्यटकही रेंगाळतील. त्यामुळे या तीन तलावांना पर्यटनाचा लूक असणारा एन. एस. इंजिनिअरिंग अ‍ॅँड एन्व्हायर्न्मेंटल सोल्युशन संस्थेने ेआराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. संवर्धन योजनेच्या निकषांनुसार दहा टक्के लोकवर्गणी आणि उर्वरित शासनाचा निधी मिळणार आहे. तलावासाठी निधी देताना जैवविविधता, पर्यावरण अशा अनेक अंगांनी विचार होतो. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. काय कामे होणार? तलावातील गाळ काढणे, परिसराची स्वच्छता करणे, तलावाच्या भिंतीचे बांधकाम करणे, पदपथ तयार करणे, संरक्षक भिंत बांधणे, वृक्षारोपण करणे, सौरऊर्जेद्वारे पाणीवापर सुविधा उपलब्ध करणे, सांडपाणी व्यवस्थापन व बाग तयार करणे, अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.कर्पूरेश्वर तलावासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण करून महिन्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.- जी. डी. काटकर, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा