शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीला यंदा शत-प्रतिशत खो

By admin | Updated: July 17, 2015 00:07 IST

शतकोटी वृक्षलागवड योजना : जुलै संपत आला, तरी उद्दिष्टच नाही

संदीप खवळे- कोल्हापूर --‘हिरवाई’चा नारा देत मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली ‘शतकोटी वृक्षलागवड योजना’ या वर्षी शत-प्रतिशत गुंडाळण्यात आल्याचे चित्र आहे. या योजनेसाठीचे उद्दिष्ट जुलै संपत आला, तरी कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेले नाही. या योजनेतून मे २०१४ अखेर जिल्ह्यात विविध खात्यांकडून ५८ लाख रोपटी लावण्यात आली होती. महसूल व वनखात्यातर्फे सन २०११ मध्ये पाच वर्षांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतून ग्रामपंचायत, वनविभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, पालिका, आदी विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात येते. कोल्हापूर वनविभागाच्या माहितीनुसार या योजनेंतर्गत मे २०१४ अखेर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे ३४.११ लाख, कोल्हापूर वनविभागातर्फे ११.३८ लाख, तर सामाजिक वनीकरण खात्याकडून २.८०, कृषी विभागातर्फे ९.४१ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. तसेच पालिकांसह अन्य खात्यांकडून १.५७ लाख रोपांची लागवड केली होती. गतवर्षी वनविभाग आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला ३५.३८ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते; पण या वर्षी जुलै संपत आला, तरीही महसूल आणि वनविभागातर्फे या वर्षीचे उद्दिष्ट या यंत्रणांना आलेले नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील रोप लागवडीची संख्या अठ्ठावन्न लाखांहून दहा लाखांवर आली आहे. ही रोप लागवडही ‘शतकोटी’शिवाय अन्य योजनांमधून झाली आहे. त्यामुळे शतकोटी वृक्षलागवड योजना पाच वर्षांच्या आतच शत-प्रतिशत बंद झाल्याचे चित्र आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत मे २०१४ अखेर जिल्ह्यात वनविभागासह अन्य विभागांतर्फे सन २०१४-१५ मध्ये ५८ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. या वर्षी योजनेंतर्गत या वर्षीचे उद्दिष्ट आलेले नाही. वनविभागाच्या विविध योजनेंतर्गत या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सात लाख तेरा हजार रोपांची लावगड करण्यात आली आहे.- रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक, कोल्हापूर