शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

काळम्मावाडी कालव्यांच्या गळतीने शेतीचे नुकसान

By admin | Updated: April 28, 2015 00:34 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार

निवास पाटील - सोळांकूर -काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतील सततची गळती व कालवे फुटीच्या प्रकारांमुळे कालव्यालगतच्या शेकडो एकर जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत, तर उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कालव्यांची अजूनही कामे अपूर्ण असताना केवळ राजकीय प्रेमापोटी पाणी सोडण्यात आले. सन १९९९ पासून दोन्ही कालव्यातून प्राथमिक अवस्थेत १०० ते ३०० क्युसेस दाबाने पाणी सोडले होते. सध्या सुमारे ८०० ते ९०० क्युसेस दाबाने पाणी सोडले जात आहे. एक ते आठ कि. मी.पर्यंत कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी केवळ दगड रचून, सिमेंट, वाळूचा मुलामा दिला आहे. याचबरोबर काही ठिकाणी कालव्यातील मुरुमाचा भराव काढण्यात आला आहे. काही लोक स्वार्थापोटी कालव्याला भगदाड पाडत आहेत, तर काही ठिकाणी कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत.कालव्यातील पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक नाही. जिओसिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयत्न सफल न झाल्याने कालव्यांना सततची गळती आहे. परिणामी कालव्यालगतच्या शेतामध्ये सतत दलदल झाली आहे. दलदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. काही ठिकाणी खारफुटी बाधीत शेती झाली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक येत नसल्याने शेतकरी हबकला आहे. गळतीमुळे काही गावांतील घरांमध्ये उमाळे फुटले आहेत. गळतीबाबत मात्र ठोस असा निर्णय अजून तरी अंमलात आला नाही. काही ठिकाणी आरसीसी भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. यांचाही फारसा फरक नसल्याने अत्याधुनिक यंत्रणा अंमलात आणून ही गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.कालव्याच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च होतात, याचा योग्य उपयोग आवश्यक.विचित्र भू-स्तरादरम्यान लोखंड अथवा सिमेंट पाईपचा वापर व्हावा. पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक आवश्यक.गळतीचे पाणी निचरा होण्यासाठी छोटे पाट करून ते पाणी ओढे-नाल्या'द्वारे नदीपात्रात सोडावेत.खारफुटी शेतीचा नुकसानभरपाईबाबत विचार व्हावा.