शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काळम्मावाडी कालव्यांच्या गळतीने शेतीचे नुकसान

By admin | Updated: April 28, 2015 00:34 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार

निवास पाटील - सोळांकूर -काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतील सततची गळती व कालवे फुटीच्या प्रकारांमुळे कालव्यालगतच्या शेकडो एकर जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत, तर उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कालव्यांची अजूनही कामे अपूर्ण असताना केवळ राजकीय प्रेमापोटी पाणी सोडण्यात आले. सन १९९९ पासून दोन्ही कालव्यातून प्राथमिक अवस्थेत १०० ते ३०० क्युसेस दाबाने पाणी सोडले होते. सध्या सुमारे ८०० ते ९०० क्युसेस दाबाने पाणी सोडले जात आहे. एक ते आठ कि. मी.पर्यंत कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी केवळ दगड रचून, सिमेंट, वाळूचा मुलामा दिला आहे. याचबरोबर काही ठिकाणी कालव्यातील मुरुमाचा भराव काढण्यात आला आहे. काही लोक स्वार्थापोटी कालव्याला भगदाड पाडत आहेत, तर काही ठिकाणी कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत.कालव्यातील पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक नाही. जिओसिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयत्न सफल न झाल्याने कालव्यांना सततची गळती आहे. परिणामी कालव्यालगतच्या शेतामध्ये सतत दलदल झाली आहे. दलदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. काही ठिकाणी खारफुटी बाधीत शेती झाली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक येत नसल्याने शेतकरी हबकला आहे. गळतीमुळे काही गावांतील घरांमध्ये उमाळे फुटले आहेत. गळतीबाबत मात्र ठोस असा निर्णय अजून तरी अंमलात आला नाही. काही ठिकाणी आरसीसी भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. यांचाही फारसा फरक नसल्याने अत्याधुनिक यंत्रणा अंमलात आणून ही गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.कालव्याच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च होतात, याचा योग्य उपयोग आवश्यक.विचित्र भू-स्तरादरम्यान लोखंड अथवा सिमेंट पाईपचा वापर व्हावा. पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक आवश्यक.गळतीचे पाणी निचरा होण्यासाठी छोटे पाट करून ते पाणी ओढे-नाल्या'द्वारे नदीपात्रात सोडावेत.खारफुटी शेतीचा नुकसानभरपाईबाबत विचार व्हावा.