शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

जिल्ह्यातील ८०७ विकास संस्था तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल ८०७ विकास संस्था तोट्यात गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या अपात्र कर्जमाफीसह ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल ८०७ विकास संस्था तोट्यात गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या अपात्र कर्जमाफीसह शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा धोरणाचा फटकाही या संस्थांना बसला आहे. या संस्थांना ८९ कोटी १६ लाख १० हजार तोटा झाला असून यातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या बूस्टरची गरज आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मिनी बँक म्हणून विकास संस्थांकडे पाहिले जाते. या संस्थांमुळेच ग्रामीण अर्थकारण सक्षम झाले, हे कोणीही नाकारू शकत नाही. नाबार्ड राज्य बँक व जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पव्याजाने पीक कर्ज देते. जिल्हा बँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. या साखळीमधून शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजाने पीक कर्ज मिळते. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला सरासरी १३०० कोटी पीक कर्जाचे वाटप विकास संस्थांच्या माध्यमातून होते. जिल्ह्यात ६ लाख ७ हजार ८९३ खातेदार सभासद असले तरी ४ लाख ९७ हजार ३०१ हे विकास संस्थांशी शेतकरी जोडले आहेत. त्यातील २ लाख ३९ हजार शेतकरी संस्थांच्या माध्यमातून नियमित कर्ज घेतात.

मात्र, २००९ ला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये ११२ कोटी रुपये अपात्र ठरले. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिल्यानंतर २०१२ मध्ये नाबार्डने जिल्हा बँकेकडून हे पैसे वसूल केले. जिल्हा बँकेने विकास संस्थांकडून पैसे घेतले, मात्र शेतकऱ्यांकडून वसुल झाले नाहीत. कर्जमुक्त झाल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा केला होत. त्यामुळे जुनी बाकी वसूल करता येईना. त्याचा फटका विकास संस्थांच्या आर्थिक स्थैर्यावर झाला. त्यातून सावरत असताना शासनाने एक लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यतचे दोन टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेकडून संस्थांच्या व्याजाचा परतावा मिळतो. मात्र १ - २ टक्क्यांवर व्यवसाय करणे अशक्य आहे. उत्पन्नावर मर्यादा आल्याने अनेक संस्था कर्मचाऱ्यांचे पगारही करू शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १८९१ विकास संस्थांपैकी ८०७ संस्था तोट्यात गेल्या आहेत. त्यांचा ८९ कोटी १६ लाख रुपये तोटा झाल्याने शासनाच्या बूस्टरशिवाय संस्था आर्थिक अरिष्टातून बाहेर पडू शकत नाहीत.

सक्षमीकरणाची नुसतीच चर्चा

विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने समिती नेमून त्यांच्याकडून उपाययोजना जाणून घेतल्या. मात्र, या समितीच्या अहवालावर काहीच झाले नाही, नुसती चर्चाच झाली.

दृष्टीक्षेपात जिल्ह्यातील विकास संस्था-

एकूण संस्था - १८९१

नफ्यातील संस्था - १०८४

नफा - ४३ कोटी ३५ लाख ४८ हजार

तोट्यातील संस्था - ८०७

तोटा - ८९ कोटी १६ लाख १० हजार

संस्था सभासद - ४ लाख ९७ हजार ३०१

कर्जदार सभासद - २ लाख ३९ हजार २८१

कोट-

विकास संस्थांचे मार्जिन कमी झाल्याने उत्पन्न घटले. पगारासह व्यवस्थापन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न संस्थांना आहे. यामध्ये सुधारणा झाली नाहीतर पुढील वर्षी तोट्यातील संस्थांची संख्या हजारावर जाईल. कर्जमर्यादाही ६० हजार करावी.

- संभाजीराव चाबूक (जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना)