शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८०७ विकास संस्था तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल ८०७ विकास संस्था तोट्यात गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या अपात्र कर्जमाफीसह ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल ८०७ विकास संस्था तोट्यात गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या अपात्र कर्जमाफीसह शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा धोरणाचा फटकाही या संस्थांना बसला आहे. या संस्थांना ८९ कोटी १६ लाख १० हजार तोटा झाला असून यातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या बूस्टरची गरज आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मिनी बँक म्हणून विकास संस्थांकडे पाहिले जाते. या संस्थांमुळेच ग्रामीण अर्थकारण सक्षम झाले, हे कोणीही नाकारू शकत नाही. नाबार्ड राज्य बँक व जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पव्याजाने पीक कर्ज देते. जिल्हा बँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. या साखळीमधून शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजाने पीक कर्ज मिळते. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला सरासरी १३०० कोटी पीक कर्जाचे वाटप विकास संस्थांच्या माध्यमातून होते. जिल्ह्यात ६ लाख ७ हजार ८९३ खातेदार सभासद असले तरी ४ लाख ९७ हजार ३०१ हे विकास संस्थांशी शेतकरी जोडले आहेत. त्यातील २ लाख ३९ हजार शेतकरी संस्थांच्या माध्यमातून नियमित कर्ज घेतात.

मात्र, २००९ ला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये ११२ कोटी रुपये अपात्र ठरले. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिल्यानंतर २०१२ मध्ये नाबार्डने जिल्हा बँकेकडून हे पैसे वसूल केले. जिल्हा बँकेने विकास संस्थांकडून पैसे घेतले, मात्र शेतकऱ्यांकडून वसुल झाले नाहीत. कर्जमुक्त झाल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा केला होत. त्यामुळे जुनी बाकी वसूल करता येईना. त्याचा फटका विकास संस्थांच्या आर्थिक स्थैर्यावर झाला. त्यातून सावरत असताना शासनाने एक लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यतचे दोन टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेकडून संस्थांच्या व्याजाचा परतावा मिळतो. मात्र १ - २ टक्क्यांवर व्यवसाय करणे अशक्य आहे. उत्पन्नावर मर्यादा आल्याने अनेक संस्था कर्मचाऱ्यांचे पगारही करू शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १८९१ विकास संस्थांपैकी ८०७ संस्था तोट्यात गेल्या आहेत. त्यांचा ८९ कोटी १६ लाख रुपये तोटा झाल्याने शासनाच्या बूस्टरशिवाय संस्था आर्थिक अरिष्टातून बाहेर पडू शकत नाहीत.

सक्षमीकरणाची नुसतीच चर्चा

विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने समिती नेमून त्यांच्याकडून उपाययोजना जाणून घेतल्या. मात्र, या समितीच्या अहवालावर काहीच झाले नाही, नुसती चर्चाच झाली.

दृष्टीक्षेपात जिल्ह्यातील विकास संस्था-

एकूण संस्था - १८९१

नफ्यातील संस्था - १०८४

नफा - ४३ कोटी ३५ लाख ४८ हजार

तोट्यातील संस्था - ८०७

तोटा - ८९ कोटी १६ लाख १० हजार

संस्था सभासद - ४ लाख ९७ हजार ३०१

कर्जदार सभासद - २ लाख ३९ हजार २८१

कोट-

विकास संस्थांचे मार्जिन कमी झाल्याने उत्पन्न घटले. पगारासह व्यवस्थापन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न संस्थांना आहे. यामध्ये सुधारणा झाली नाहीतर पुढील वर्षी तोट्यातील संस्थांची संख्या हजारावर जाईल. कर्जमर्यादाही ६० हजार करावी.

- संभाजीराव चाबूक (जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना)