शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यातील ८०७ विकास संस्था तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल ८०७ विकास संस्था तोट्यात गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या अपात्र कर्जमाफीसह ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल ८०७ विकास संस्था तोट्यात गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या अपात्र कर्जमाफीसह शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा धोरणाचा फटकाही या संस्थांना बसला आहे. या संस्थांना ८९ कोटी १६ लाख १० हजार तोटा झाला असून यातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या बूस्टरची गरज आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मिनी बँक म्हणून विकास संस्थांकडे पाहिले जाते. या संस्थांमुळेच ग्रामीण अर्थकारण सक्षम झाले, हे कोणीही नाकारू शकत नाही. नाबार्ड राज्य बँक व जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पव्याजाने पीक कर्ज देते. जिल्हा बँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. या साखळीमधून शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजाने पीक कर्ज मिळते. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला सरासरी १३०० कोटी पीक कर्जाचे वाटप विकास संस्थांच्या माध्यमातून होते. जिल्ह्यात ६ लाख ७ हजार ८९३ खातेदार सभासद असले तरी ४ लाख ९७ हजार ३०१ हे विकास संस्थांशी शेतकरी जोडले आहेत. त्यातील २ लाख ३९ हजार शेतकरी संस्थांच्या माध्यमातून नियमित कर्ज घेतात.

मात्र, २००९ ला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये ११२ कोटी रुपये अपात्र ठरले. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिल्यानंतर २०१२ मध्ये नाबार्डने जिल्हा बँकेकडून हे पैसे वसूल केले. जिल्हा बँकेने विकास संस्थांकडून पैसे घेतले, मात्र शेतकऱ्यांकडून वसुल झाले नाहीत. कर्जमुक्त झाल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा केला होत. त्यामुळे जुनी बाकी वसूल करता येईना. त्याचा फटका विकास संस्थांच्या आर्थिक स्थैर्यावर झाला. त्यातून सावरत असताना शासनाने एक लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यतचे दोन टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेकडून संस्थांच्या व्याजाचा परतावा मिळतो. मात्र १ - २ टक्क्यांवर व्यवसाय करणे अशक्य आहे. उत्पन्नावर मर्यादा आल्याने अनेक संस्था कर्मचाऱ्यांचे पगारही करू शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १८९१ विकास संस्थांपैकी ८०७ संस्था तोट्यात गेल्या आहेत. त्यांचा ८९ कोटी १६ लाख रुपये तोटा झाल्याने शासनाच्या बूस्टरशिवाय संस्था आर्थिक अरिष्टातून बाहेर पडू शकत नाहीत.

सक्षमीकरणाची नुसतीच चर्चा

विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने समिती नेमून त्यांच्याकडून उपाययोजना जाणून घेतल्या. मात्र, या समितीच्या अहवालावर काहीच झाले नाही, नुसती चर्चाच झाली.

दृष्टीक्षेपात जिल्ह्यातील विकास संस्था-

एकूण संस्था - १८९१

नफ्यातील संस्था - १०८४

नफा - ४३ कोटी ३५ लाख ४८ हजार

तोट्यातील संस्था - ८०७

तोटा - ८९ कोटी १६ लाख १० हजार

संस्था सभासद - ४ लाख ९७ हजार ३०१

कर्जदार सभासद - २ लाख ३९ हजार २८१

कोट-

विकास संस्थांचे मार्जिन कमी झाल्याने उत्पन्न घटले. पगारासह व्यवस्थापन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न संस्थांना आहे. यामध्ये सुधारणा झाली नाहीतर पुढील वर्षी तोट्यातील संस्थांची संख्या हजारावर जाईल. कर्जमर्यादाही ६० हजार करावी.

- संभाजीराव चाबूक (जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना)