शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर १७ला पहिला मस्तकाभिषेक श्रवणबेळगोळला सोहळा : चारशेंवर मुनी, माताजींचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:34 IST

सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे.मस्तकाभिषेक महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी बुधवारी सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जगद््गुरू चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बाहुबली मस्तकाभिषेकाची तयारी पूर्ण झाली आहे. ७ फेब्रुवारीला भगवान आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण महोत्सवाने सोहळ्याला सुरुवात होईल. १६ फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण महोत्सव चालणार आहे. त्यानंतर पहिला मस्तकाभिषेक १७ ला होणार आहे.

या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसोबत ४०० हून अधिक पिंच्छिधारी मुनी व त्यागीगण सहभागी झाले आहेत. श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमानसागर महाराज, चंद्रप्रभूसागर, पंचकल्याणसागर, देवनंदी महाराज, पद्मनंदी महाराज व त्यांचे २० त्यागी, विशुद्धसागर महाराज व त्यांच्यासमवेत ३५ त्यागी, पुष्पदंत सागर महाराज यांच्यासमवेत १ त्यागी, याशिवाय जिनसेन महाराज, सच्छिदानंद महाराज, वासूपुज्य देवसेन महाराज, अमितसागर महाराज, आदर्शसागर महाराज, प्रसन्नश्रुषीजी महाराज, मुनीश्री चिन्मयसागर (जंगलवाले बाबा), गणिनी आर्यिका जिनमती माताजी, क्षमाश्री माताजी, विभाश्री माताजी यांचे आगमन झाले आहे.दररोज चार लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

भोजन व्यवस्थेची जबाबदारी कोलकाता येथील जैन समाजाने स्वीकारली आहे. संपूर्ण देशभरातून साखर, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, मसाले, केसर, काजू, चहा, कॉपी, फळे, भाजीपाला व इतर भोजन सामग्री दान स्वरूपात येत आहे. सांगली, बेळगाव, चिक्कोडी, अथणी, जमखंडी या परिसरातून ५०० टनांहून अधिक साहित्य पाठविण्यात आले आहे. महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन (चेन्नई), कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र कुमार (बंगलोर), सचिव सतीश जैन (दिल्ली), राकेश सेठी (कोलकाता) आदी, सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.सांगली, कोल्हापूरकरांसाठी २३ला अभिषेकसांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांतील जैन श्रावक-श्राविकांसाठी २३ फेब्रुवारीला भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभिषेकसाठी कलश नोंदणीचे काम सुरू आहे. तरी या तीन जिल्ह्यांतील भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.