शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

निधींच्या माध्यमातून ऊस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाग विकास निधी ५० रुपये, मुख्यमंत्री साहाय्यता निधी ४ रुपये घेण्याला मान्यता दिली असून, याशिवाय साखर संघ १ रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट १ रुपये निधी प्रतिटन अथवा प्रतिक्विंटल घेतला जातो. राज्याचे एकूण ऊस गाळप साखर उत्पादन पाहता हा कोट्यवधी रुपयांचा निधी होत असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाग विकास निधी ५० रुपये, मुख्यमंत्री साहाय्यता निधी ४ रुपये घेण्याला मान्यता दिली असून, याशिवाय साखर संघ १ रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट १ रुपये निधी प्रतिटन अथवा प्रतिक्विंटल घेतला जातो. राज्याचे एकूण ऊस गाळप साखर उत्पादन पाहता हा कोट्यवधी रुपयांचा निधी होत असून, विविध करांतून कोट्यवधी रुपये केंद्र व राज्य शासन वसुली करत असताना पुन्हा हा निधी कपात करणे बरोबर नाही, अशा प्रतिक्रिया ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.मंत्री समितीची बैठक बुधवारी झाली. यामध्ये गाळप हंगाम सुरू करण्याचे धोरण जाहीर करण्या- बरोबरच विविध योजना व धोरणांच्या अंमलबजावणीबाबतही निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी ऊस निर्यात बंदीबरोबर कारखाने व शासन यांना विविध निधींच्या माध्यमातून कोट्यवधी निधी गोळा करून देण्याचा जणू परवानाच दिला जात आहे. साखर कारखाने व ऊस उत्पादक विविध करांतून पाच हजार कोटी रुपये केंद्र व राज्य शासनाला देत असताना हे वेगळे निधी घेऊन ऊस उत्पादकांची लूट का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.भाग विकास निधी म्हणून वर्षानुवर्षे कारखानदार घेताना दिसतात. यापूर्वी तो पाच किंवा दहा रुपये प्रतिटन घेतला जात होता. मात्र, बुधवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत तो ऊसदराच्या तीन टक्के अथवा कमाल ५० रुपये घेण्याची परवानगी दिली आहे. राज्याचा हंगाम २०१७/१८ चा उपलब्ध उसाचा आकडा पाहता यावर ३८० कोटी रुपये शेतकºयांना कारखानदारांना भाग विकास निधीसाठी द्यावे लागणार आहेत. हा निधी कारखानदाराच्या हातात जाणार असल्याने त्याचा अपव्यय होत असल्याचीच उदाहरणे अधिक आहेत. तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी प्रतिटन ४ रुपये कपात होणार असून, यातून ३० कोटी ८० लाखांची भर शासनाच्या तिजोरीत पडेल. याशिवाय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व राज्य सहकारी साखर संघासाठी प्रतिटन १ रुपये प्रत्येकी कपात होईल. हा निधी १५ कोटी ४० लाख होतो. या सर्व निधींच्या माध्यमातून ऊस उत्पादकांची किमान ५०० कोटींची लूट होणार आहे.कपात न करण्याचे निर्देशऊस उत्पादकांना देण्यात येणाºया ऊसदरातून शेतकºयांच्या संमतीशिवाय कुठल्याही निधीद्वारे कपात करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही ते न जुमानता अशा विविध निधींचे कारण पुढे करून शेतकºयांचे पैसे हडप केले जातात, असा आरोप धनाजी चुडमुंड यांनी केला.