शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

‘लोकमत’च्या मेहरून नाकाडे ‘तंटामुक्त’मध्ये राज्यात प्रथम

By admin | Updated: December 29, 2016 23:02 IST

वृत्तांकनाची दखल : अडीच लाखांचा पुरस्कार

गारगोटी : एकतीस डिसेंबर रोजी भुदरगड किल्ल्यावर मद्यपींना मज्जाव करण्यासाठी किल्ले भुदरगड प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे मशाल गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक व कलनाकवाडीचे सरपंच रविराज निंबाळकर यांनी दिली. या अभियानात भुदरगड तहसील विभाग, पोलिस, वनविभाग, समस्त गडकरी व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सहभागी होणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भुदरगड भूमी व त्यामध्ये गडकिल्ल्यांचे वैभव लाभलेला भुदरगड किल्ला सर्वत्र परिचित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गडाच्या माथ्यावर चारचाकी वाहने जाऊ शकणारा एकमेव असा हा गड आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेला, भल्या मोठ्या प्रमाणावर तलावात पाणी उपलब्ध असणारा हा किल्ला आहे. इथल्या पाण्याला अवीट गोडी आहे. कारण हे पाणी संपूर्णत: प्रदूषणमुक्त आहे. अशा या गडावर नववर्षाचे स्वागत करण्याचे निमित्त करून अनेक हौशी पर्यटक येतात. भरपूर दारू पिऊन डीजे लावून रात्रभर धिंगाणा घालतात, पण गेल्या काही वर्षांपासून किल्ले भुदरगड प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री मशालीच्या उजेडात गस्त घालण्याचे ठरविले. त्याला पोलिस, वनविभागाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर गडावर गस्त सुरू झाली. शाकाहारी जेवण करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत; परंतु नशा करून मांसाहार करण्यावर कडक निर्बंध आहेत. सध्या या मोहिमेत आजूबाजूला गडावर राहणाऱ्या गडकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिवसेंदिवस लोकजागृती झाल्यामुळे मद्यपींनी गडाकडे पाठ फिरवली आहे.सध्या परिस्थिती पाहता हे गडकिल्ले म्हणजे मद्यपींना मेजवानी करण्याचे अड्डे बनत चालले आहेत. कोणतीही शासकीय सुटी असो किंवा ३१ डिसेंबर, या गडकिल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ माजविणाऱ्यांचे प्रस्थ वाढत चालले होते. यातून गडांची नासधूस होत असून दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, पेपर यांचा खच पडलेला असतो. यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. त्यामुळे किल्ल्यांचे वैभव नष्ट होत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी पोलिस व वनविभागाच्या कार्यालयातर्फे या मद्यपींवर तसेच गडांवर चालणाऱ्या पार्टीवर बंधन घालण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून असे गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गडकऱ्यांकडून अशा महाभागांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. (प्रतिनिधी)इतिहासाला काळिमा फासण्याचे कृत्य करू नयेइतिहास संशोधक रविराज निंबाळकर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून गडकोटांचे साम्राज्य उभे केले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही इतका देदीप्यमान इतिहास पहायला मिळत नाही. आपल्या गैरवर्तणुकीमुळे इतिहासाला काळिमा फासेल, असे गैरकृत्य कोणीही करू नये. कारण आपल्या इतिहासाचे पावित्र्य नष्ट होऊ नये. १८४४ साली स्वातंत्र्यसंग्रामातील पहिली तोफ याच गडावरून डागली होती, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.