शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या मेहरून नाकाडे ‘तंटामुक्त’मध्ये राज्यात प्रथम

By admin | Updated: December 29, 2016 23:02 IST

वृत्तांकनाची दखल : अडीच लाखांचा पुरस्कार

गारगोटी : एकतीस डिसेंबर रोजी भुदरगड किल्ल्यावर मद्यपींना मज्जाव करण्यासाठी किल्ले भुदरगड प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे मशाल गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक व कलनाकवाडीचे सरपंच रविराज निंबाळकर यांनी दिली. या अभियानात भुदरगड तहसील विभाग, पोलिस, वनविभाग, समस्त गडकरी व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सहभागी होणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भुदरगड भूमी व त्यामध्ये गडकिल्ल्यांचे वैभव लाभलेला भुदरगड किल्ला सर्वत्र परिचित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गडाच्या माथ्यावर चारचाकी वाहने जाऊ शकणारा एकमेव असा हा गड आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेला, भल्या मोठ्या प्रमाणावर तलावात पाणी उपलब्ध असणारा हा किल्ला आहे. इथल्या पाण्याला अवीट गोडी आहे. कारण हे पाणी संपूर्णत: प्रदूषणमुक्त आहे. अशा या गडावर नववर्षाचे स्वागत करण्याचे निमित्त करून अनेक हौशी पर्यटक येतात. भरपूर दारू पिऊन डीजे लावून रात्रभर धिंगाणा घालतात, पण गेल्या काही वर्षांपासून किल्ले भुदरगड प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री मशालीच्या उजेडात गस्त घालण्याचे ठरविले. त्याला पोलिस, वनविभागाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर गडावर गस्त सुरू झाली. शाकाहारी जेवण करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत; परंतु नशा करून मांसाहार करण्यावर कडक निर्बंध आहेत. सध्या या मोहिमेत आजूबाजूला गडावर राहणाऱ्या गडकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिवसेंदिवस लोकजागृती झाल्यामुळे मद्यपींनी गडाकडे पाठ फिरवली आहे.सध्या परिस्थिती पाहता हे गडकिल्ले म्हणजे मद्यपींना मेजवानी करण्याचे अड्डे बनत चालले आहेत. कोणतीही शासकीय सुटी असो किंवा ३१ डिसेंबर, या गडकिल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ माजविणाऱ्यांचे प्रस्थ वाढत चालले होते. यातून गडांची नासधूस होत असून दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, पेपर यांचा खच पडलेला असतो. यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. त्यामुळे किल्ल्यांचे वैभव नष्ट होत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी पोलिस व वनविभागाच्या कार्यालयातर्फे या मद्यपींवर तसेच गडांवर चालणाऱ्या पार्टीवर बंधन घालण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून असे गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गडकऱ्यांकडून अशा महाभागांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. (प्रतिनिधी)इतिहासाला काळिमा फासण्याचे कृत्य करू नयेइतिहास संशोधक रविराज निंबाळकर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून गडकोटांचे साम्राज्य उभे केले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही इतका देदीप्यमान इतिहास पहायला मिळत नाही. आपल्या गैरवर्तणुकीमुळे इतिहासाला काळिमा फासेल, असे गैरकृत्य कोणीही करू नये. कारण आपल्या इतिहासाचे पावित्र्य नष्ट होऊ नये. १८४४ साली स्वातंत्र्यसंग्रामातील पहिली तोफ याच गडावरून डागली होती, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.