शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

लोकसभा निवडणुका यंदा डिसेंबरमध्येच -चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:14 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुका डिसेंबर २0१८ मध्ये, तर विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर २0१९ ला होतील, असे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कोल्हापूरला आलेल्या पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.पाटील म्हणाले, जरी एप्रिल २0१९ ला लोकसभेची मुदत संपणार असली तरी डिसेंबर २0१८ मध्ये या निवडणुका ...

ठळक मुद्देविधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षीच्या आॅक्टोबरपूर्वी नाहीत

कोल्हापूर : लोकसभा निवडणुका डिसेंबर २0१८ मध्ये, तर विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर २0१९ ला होतील, असे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कोल्हापूरला आलेल्या पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, जरी एप्रिल २0१९ ला लोकसभेची मुदत संपणार असली तरी डिसेंबर २0१८ मध्ये या निवडणुका होतील. त्या दृष्टीने आता सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. येणारा पावसाळा चांगला झाला की त्यानंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा सुरू होती; परंतु तसे होणार नाही. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर २0१९ च्या आधी होणार नाहीत.मुद्रांक शुल्कातून २५ हजार कोटी

आर्थिक वर्ष २0१७-१८ मध्ये मुद्रांकातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे २१ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट शासनाने ठेवले होते. मात्र यातून एकूण २५ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून, उद्दिष्टापेक्षा तब्बल चार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे. जीएसटी आणि नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर हे मोठे यश असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात नव्या कायद्यामुळे जीएसटीचे ग्राहक सहा लाखांनी वाढल्याचीही माहिती यावेळी पाटील यांनी दिली.शाहू महाराज शिक्षण शुल्कासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवलीमराठा समाजाच्या मोर्चानंतर शासनाने जे निर्णय घेतले त्यांतील आणखी एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजातील सहा लाखांपेक्षा उत्पन्न कमी असणाºया नागरिकाच्या मुलाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची ५0 टक्के फी शासन भरणार होते. आता या उत्पन्नमर्यादेत वाढ करून ती आठ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे ७0 हजार रुपये एखाद्याचे उत्पन्न असेल तर त्याच्याही मुलाला ६0५ अभ्यासक्रमांसाठीच्या फीमध्ये ५0 टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये १२00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांचा विचार करता, आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे. उर्वरित सर्व मागण्या या शासनाने मान्य केल्या असल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.‘आयआरबी’ला आणखी १00 कोटीकोल्हापूरच्या टोलमुक्तीसाठी ४५९ कोटी रुपये ‘आयआरबी’ कंपनीला देण्याचे ठरले होते. त्याचवेळी ५0 कोटी रुपये देण्यात आले. मात्र उर्वरित पैसे देण्यासाठी उशीर झाल्याने कंपनीने ८0 कोटी रुपये व्याजाची मागणी केली होती. मात्र ती आम्ही देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. आज, शनिवारी १00 कोटी रुपये अदा करण्यात आले आणि उर्वरित पैसे नव्या आर्थिक वर्षात दिले जाणार आहेत. यातील एकाही पैशाचा भुर्दंड आम्ही महापालिकेवर पडू दिला नाही, हे पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.