शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

‘२३ मे’च्या मुहूर्ताला लोकसभा निकालाचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:28 IST

रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता नागरिकांना निकालाची उत्सुकता ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता नागरिकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. निकालाबाबत अनेक ठिकाणी पैजा लागल्याचे पाहावयास मिळत आहे. गावागावातल्या पारावर, तर शहरातल्या चौकाचौकांमध्ये आणि पेठांमध्ये सुध्या याचीच चर्चा सुरू आहे. मात्र, निकालासाठी २३ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणली आहे, पण या २३ मे ला निकालानंतर उमेदवाराचा व कार्यकर्त्यांचा संभाव्य जल्लोष, तणावाचा विचार करून अनेकांनी २३ मे च्या लग्नमुहूर्ताकडे कानाडोळा करणे पसंत केले आहे.ज्यांची लग्ने ठरलेली आहेत अशा अनेक विवाह इच्छुकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी २३ मे या दिवशी असणाऱ्या लग्नाच्या मुहूर्ताकडे दुर्लक्ष केले असल्याचे वास्तव समोर आले आहे. निवडणुकीच्या निकालाचा, त्या दिवशी रस्त्यावर येणाºया प्रचंड वाहनांच्या गोंगाटाचा, ट्रॅफिक जामच्या अडथळ्याचा व या सर्व गोष्टींमुळे पै-पाहुण्यांना कार्यालयापर्यंत कदाचित वेळेत पोहोचण्यास विलंब होण्याच्या शक्यतेमुळे या दिवशीच्या लग्न मुहूर्ताकडे विवाह ठरलेल्या अनेक इच्छुकांनी पाठ फिरवली आहे. या दिवसाच्या मुहूर्ताला वगळून इतर दिवशी असलेल्या विवाह मुहूर्ताला काहींनी पसंती आहे.मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत लग्नाचा धुमधडाका असतो. एखाद्याच्या घरी लग्न ठरल्यानंतर सर्वात प्रथम लग्नाचा मुहूर्त बघितला जातो. तसेच त्यानंतर लगेचच आपल्या घरापासून जवळ असणारे, खिशाला परवडणारे व सर्व सोयींनीयुक्त असे मंगल कार्यालय बुक केले जाते. काही वेळा ठरलेल्या मुहूर्तावर कार्यालय उपलब्ध न झाल्याने मुहूर्ताची तारीख बदलली जाते. पण २३ मे या तारखेला लग्नाचे मुहूर्त असूनही केवळ निवडणुकीच्या निकालामुळे अनेकांनी या तारखेला पसंती दिलेली नाही.गुरुवारी, २३ मे रोजी, सकाळी ९.५७, १०.४२, दु.१२.३६, सायंकाळी ०४.०५, तर गोरज ०७.०९, ०७.२१ असे एकूण ७ मुहूर्त आहेत. पण, पर्यायच नसल्याने यातील काही मुहूर्तावर अगदी कमी प्रमाणात काहींचे विवाह होणार असल्याने या तारखेला काही मंगल कार्यालयाचे बुकिंग झाले आहे.या निवडणुकीच्या निकालामुळे उत्साही कार्यकर्त्यांच्या जल्लोषाचा व पराभूत उमेदवाराच्या नाराज कार्यकर्त्यांच्या नाराजीचाही आपल्या समारंभावर प्रभाव पडू नये अशी काहींची इच्छा आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून निकालामुळे मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशनवाले, भांडी साहित्य भाड्याने देणारे व्यावसायिक, लहान-मोठे बँडवाले, आदींच्या व्यवसायावर कमी-जास्त प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.