शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

Lok Sabha Election 2019 कुळं काढणारे वारसा कशाचा सांगणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:03 IST

समीर देशपांडे/प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा असे रिंगण आखणारे आणि ...

समीर देशपांडे/प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा असे रिंगण आखणारे आणि कुळं काढणारे वारसा तो काय सांगणार ? असा खडा सवाल शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांना विचारला. बुधवारी त्यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी ‘लोकमत’ला त्यांनी रोखठोक मुलाखत दिली. या निवडणुकीत कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महाडिक प्रवृत्तीच्या विरोधात असल्यामुळे सर्व मतदारसंघात महाडिक नको असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा दावाही मंडलिक यांनी केला.केंद्र, राज्य सरकारच्याकामांचे श्रेय महाडिक घेतातनरेंद्र मोदी सरकारने शिवसेना-भाजपच्या राज्यातील सरकारसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे यांनी रेल्वे, विमानतळासह कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या. निधी आणला. याचे श्रेय विरोधी पक्षात असलेले महाडिक घेतातच कसे? त्यांना हे श्रेय घेण्याचा अधिकारच नाही, असे मंडलिक यांनी निक्षून सांगितले.महाडिकांसाठीच ‘बास्केट ब्रिज’खासदार बास्केट ब्रिज मंजूर झाल्याचे सांगतात. परंतु जनतेला तो कधीच दिसला नाही. तो अदृश्य असा पूल आहे. तो केवळ महाडिक आणि त्यांच्या घरातील मंडळींनाच दिसतो, असा टोला मंडलिक यांनी लगावला.प्रश्न : तीन वेळा ‘संसदरत्न’ झालेल्या उमेदवाराशी आपली लढत आहे. काय सांगाल ?उत्तर : एका खासगी एजन्सीने दिलेल्या संसदरत्न पुरस्काराचे कौतुक सांगत ते फिरत आहेत; परंतु आता जनतेला अनेक गोष्टी समजल्या आहेत. हे तर महाडिकांच्या घरातीलच ‘संसदरत्न’ आहेत. त्यामुळेच ते स्वत:चे कौतुक करून घेत आहेत.प्रश्न : त्यांनी केलेली विकासकामे, संपर्क याबद्दल काय म्हणाल ?उत्तर : ते मतदारसंघातील अनेक गावांत निवडून गेल्यानंतर फिरकलेही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. गावोगावी गेल्यानंतर लोक सांगतात; त्यामुळे निवडून गेल्यानंतर इव्हेंटमध्ये रमलेल्या खासदारांचे मतदारसंघाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.प्रश्न : तुमची उमेदवारी सर्वपक्षीय आहे असे म्हटले जाते. ते कसे ?उत्तर : मुळात मी शिवसेना-भाजप महायुतीचा उमेदवार आहे; परंतु गेली अनेक वर्षे ज्या पद्धतीने महाडिक कुटुंबाने वेगवेगळ्या पक्षांसह जनतेलाही वेठीस धरले, त्यामुळे जनता आता चिडली आहे. अनेक नेत्यांनाही वास्तव कळून चुकले आहे. केवळ ‘गोकुळ’ ताब्यात ठेवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करायच्या आणि जनतेला आपले गुलाम समजायचे, या वृत्तीला विरोध म्हणून आता काँग्रेससह राष्ट्रवादीची अनेक मंडळी आणि सर्वपक्षीय जनता उघडपणे माझ्या प्रचारामध्ये उतरली आहे.प्रश्न : ‘महाडिकांना घालवा’ अशी भूमिका घेण्यामागील कारण काय ?उत्तर : शिवाजी चौकातील गणपतीसमोर महादेवराव महाडिक यांनी धनंजय महाडिक यांचा अश्वमेध सोडला आहे. हिंमत असेल त्यांनी अडवून दाखवावा, असे आव्हान दिले होते. ही भाषा कोल्हापुरात चालत नाही. इथला एक स्वाभिमानी कार्यकर्ता असले १०० घोडे अडवून दाखवेल. त्यामुळेच बाहेरच्यांनी कोल्हापुरात येऊन दिलेले आव्हान जनतेने स्वीकारून निवडणूकच हातात घेतली आहे.प्रश्न : तुम्ही सायंकाळनंतर आणि सकाळी लवकर ‘नॉट रिचेबल असता’ असा आरोप तुमच्यावर होतो. त्याचे काय ?उत्तर : मला सकाळी आणि सायंकाळी महाडिकांनी कधी फोन केला होता; परंतु ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ ही महाडिकांची पद्धत आहे. मी प्राध्यापक म्हणून कॉलेजवर काम केले आहे. कोल्हापुरात दुपारी १२ नंतर कुठले कॉलेज सुरू होत नाही. ते असेल तर महाडिक त्याच कॉलेजमध्ये शिकले असतील.प्रश्न : तुम्ही जिल्हा परिषदेत केवळ ४६ दिवस उपस्थित होता, असा आरोप होतोय.उत्तर : मुळात जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांसाठी हजेरी पुस्तक नसते. मग यांनी ही नवी माहिती कुठून काढली..? रोज एक ना एक कार्यक्रम जिल्हा परिषदेत असतो. स्थायी, जलव्यवस्थापन, सर्वसाधारण सभांचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. त्यामुळे हा महाडिकांचा खोटारडेपणा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक