शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

Lok Sabha Election 2019 जागा मिळाली नाही तरी आघाडीसोबतच : राजू शेट्टी यांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 01:18 IST

काँग्रेस आघाडीसोबतच जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढूच; पण आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे, असे खासदार

ठळक मुद्देयुतीला मदत होईल अशी भूमिका घेणार नाही

इचलकरंजी : काँग्रेस आघाडीसोबतच जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढूच; पण आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

देशभरात फिरून शेतकरी हिताचे काम करणारे २१ पक्ष व संघटना एकत्रित आणून दिल्लीत आंदोलन केले व त्यातूनच भाजपविरोधात महाआघाडीचा जन्म झाला असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘आम्ही राज्यात १५ जागा लढायची तयारी केली होती परंतू आघाडी धर्म पाळण्यासाठी तेरा जागा माघार घेतली. बुलडाण्यात येथे अर्ज भरताना रविकांत तूपकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत होते. त्यामुळे काँग्रेस आघाडीने दोन जागा ‘स्वाभिमानी’ला द्याव्यात, अशी आमची मागणी होती. आम्ही त्यांना बुलढाणा, वर्धा किंवा सांगलीची जागा सुचविली. नंतर शिर्डीचाही पर्याय दिला; परंतु कोणती जागा द्यायची हा तिढा अजून सुटलेला नाही. सांगलीची जागा आम्ही सुचवली होती; परंतु त्यामागे वसंतदादा घराण्यावर अन्याय करावा, अशी आमची कधीच भावना नव्हती. कोणती जागा द्यावी हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही अजूनही आशावादी आहोत.

खासदार शेट्टी यांनी मंगळवारी त्यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट घेतली. आवाडे यांनी आघाडीच्या निर्णयानुसार शेट्टी यांना ताकदीने सहकार्य करू असा शब्द दिला. त्यानंतर शेट्टी यांनी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, राहुल आवाडे उपस्थित होते.

कोणतीही खळखळ न करता आणखी एक जागा द्या कोणत्याही प्रकारची खळखळ न करता सांगली किंवा शिर्डी येथील जागा ‘स्वाभिमानी’ला द्यावी, अशी अपेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, महाआघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी ‘स्वाभिमानी’ने राज्यात पंधरा जागा लढविण्याची तयारी केली होती; पण आघाडी धर्म पाळण्यासाठी आम्ही तेरा ठिकाणी माघार घेतली. अगदी बुलडाणा येथे उमेदवारी अर्ज भरताना रविकांत तूपकर हे कॉँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांच्याबरोबर होते. आता शिर्डी किंवा सांगली येथील एक जागा आघाडी धर्म पाळण्यासाठी कॉँग्रेसने निर्विवादपणे ‘स्वाभिमानी’ला दिली पाहिजे.मुख्यमंत्र्यांना टोला युतीच्या कोल्हापुरातील प्रचारावेळी माझ्यावर चोराच्या आळंदीत सहभागी झाल्याची टीका झाली; पण त्या व्यासपीठावर शेतकऱ्यांना बुडविणारे कोण-कोण बसले होते, हे त्यांनी नीटपणे पाहावे. लुच्च्या लोकांतून मी लवकर बाहेर पडलो हेच बरे झाले, अशा लोकांना शॉक ट्रीटमेंट द्यायला हवी, असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा