शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

Lok Sabha Election 2019 गर्दी चांगली; परंतु विजयी आत्मविश्वासाचे काय..? : तब्बल १७ भाषणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 20:03 IST

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेली प्रचारसभा जंगी झाली; परंतु त्या गर्दीला चेतवून त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यात नेत्यांना अपयश आले. रात्रीची सभा असताना व लोक लवकर आलेले

ठळक मुद्देविरोधी उमेदवारांवर टीका करण्यात हात आखडताइतरांनी मोदी यांच्यावरच टीकेचा भडिमार केला. त्यातही अनेकांनी सोईची भूमिका घेतली.मोदी आणि पवार

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेली प्रचारसभा जंगी झाली; परंतु त्या गर्दीला चेतवून त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यात नेत्यांना अपयश आले. रात्रीची सभा असताना व लोक लवकर आलेले असताना त्याच-त्याच त्याच तब्बल १७ भाषणांची जंत्री सुरू राहिली. त्याचा परिणाम म्हणून शरद पवार बोलायला उभे राहिल्यावर मैदानातून लोक निघून गेले. विशेष म्हणजे विरोधी उमेदवारांवरही मोजक्याच नेत्यांनी टीका केली.राष्ट्रवादीचा अखेरचा टोला म्हणून या सभेकडे पाहिले गेले. मुळात या सभेला काँग्रेसचाही किमान राज्यस्तरीय एखादा नेता आणण्याचे प्रयत्न होते; परंतु ते घडले नाही; कारण काँग्रेसचे नेते आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. भाजप-शिवसेनेने त्यांच्या राज्यातील प्रचाराचा नारळ तपोवन मैदानावर विराट सभा घेऊन फोडला. त्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठीच या सभेचे आयोजन करण्यात आले.

माणसे सभेला खेचून आणण्यात पक्ष व स्वतंत्र महाडिक यांची यंत्रणा यशस्वी झाली. त्यामुळे मैदान चौफेर भरले होते. एवढ्या मोठ्या समुदायासमोर भाषणांचा क्रम हा कार्यकर्त्यांना चेतवणारा हवा होता; परंतु सगळ्यांना बोलण्याची संधी देण्याच्या नादात रटाळ भाषणे लांबली. पवार यांनीही जास्तीत जास्त तीनच भाषणे ठेवावीत, अशा सूचना केल्या होत्या; परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांना बोलायला दिले आणि पी. एन. पाटील यांना संधी दिली नाही तर त्यातून चुकीचा संदेश जातो अशी कोंडी पक्ष व उमेदवाराची झाली. त्यात काहींनी मी पवारसाहेब व्यासपीठावर आल्यावरच बोलणार, असाही आग्रह धरला. त्यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल १७ भाषणे झाली; परंतु ती रंगली नाहीत. स्वत: उमेदवार खासदार महाडिक हे भावनिक झाले. केलेल्या चांगल्या कामाची उतराई म्हणून पुन्हा एकदा संधी द्या, असे त्यांनी आवाहन केले.

पवार यांचे बुधवारचे भाषण ऐकल्यावर राष्ट्रवादीच्याच अनेक कार्यकर्त्यांना २००४ च्या त्यांच्या बिंदू चौकातील भाषणाची आठवण झाली. ‘राष्ट्रवादी’चे सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शिवसेनेचे धनंजय महाडिक या निकराच्या लढतीत कोल्हापूरची सीट गेली, असे त्यावेळी वातावरण झाले होते. म्हणून पवार यांचा भीमटोला म्हणून बिंदू चौकात सभा झाली. त्या सभेत पवार यांनी याच महाडिक यांना ‘कौन है यह मुन्ना..?’ असा प्रश्न विचारल्यावर सभेत उपस्थित असलेल्या अनेकांच्या अंगावर शहारे उमटले होते. पवार यांचे ते भाषण कार्यकर्त्यांना एवढे चार्ज करून गेले की, लढतीचा निकालच बदलला. इतके आक्रमक बोलणे पवार यांना या वयात शक्य नाही; परंतु तरीही कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी जी ऊर्जा सभेतील भाषणांतून मिळायला हवी, ती फारशी मिळाली नाही. बहुतेक वक्त्यांनी विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फारसा राजकीय हल्ला केलाच नाही. महाडिक, जोगेंद्र कवाडे आणि ‘स्वाभिमानी’चे अजित पोवार व खोत यांनीच मंडलिक यांच्यावर टीका केली. इतरांनी मोदी यांच्यावरच टीकेचा भडिमार केला. त्यातही अनेकांनी सोईची भूमिका घेतली.मंडलिक हा शब्दच विसरले...हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यासाठी हाडाची काडं व रक्ताचे पाणी करण्याची ग्वाही कागल स्टाईलने दिली; परंतु गंमत अशी की, मुश्रीफ यांनी या पूर्ण निवडणुकीत मंडलिक या शब्दाचाही साधा कधी उल्लेख केलेला नाही; तिथे उमेदवारावर टीका करायचे लांबच...!मोदी आणि पवारमहाराष्ट्रात भाजपला पोषक हवा नसल्यानेच पंतप्रधानांसारख्या नेत्याला वारंवार या राज्यात यावे लागते, अशी टीका परवाच पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मग याच न्यायाने पवार हे वारंवार कोल्हापूरला तर आले नसतील का, अशीही विचारणा आता कार्यकर्त्यांतून होऊ लागली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर