शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Lok Sabha Election 2019 घर ते घर प्रचारावरच भर-जाहीर सभांना फाटा देण्याचीच पक्षांची मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:38 IST

टोकाच्या ईर्ष्येमुळे लोकसभा निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीसारखे स्वरूप आले आहे. एकेक मतदार महत्त्वाचा मानून गटांची फोडाफोडी सुरू झाल्याने पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते कमालीचे सावध झाले आहेत.

कोल्हापूर: टोकाच्या ईर्ष्येमुळे लोकसभा निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीसारखे स्वरूप आले आहे. एकेक मतदार महत्त्वाचा मानून गटांची फोडाफोडी सुरू झाल्याने पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते कमालीचे सावध झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणा जाहीर सभांमध्ये गुंतवून ठेवणे धोक्याचे ठरत असल्याने ‘जाहीर सभा नको’ अशीच मानसिकता तयार होऊ लागली आहे. त्यातच मोठ्या सभांचा खर्च परवडण्याच्या पलीकडे गेल्याने याऐवजी घर ते घर प्रचारावर भर देण्याची नेत्यांची भूमिका दिसत आहे. 

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत चारही उमेदवार तगडे असल्याने लढतीला काट्याच्या टकरीचे स्वरूप आले आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी असा पक्षीय सामना वरवर दिसत असला तरी या दोन्ही लढती व्यक्तिगत स्वरूपावर आल्या आहेत. कोल्हापूर मतदारसंघात सेना विरुद्ध राष्ट्रवादीऐवजी ‘मंडलिक विरुद्ध महाडिक’ असा संघर्ष पेटला आहे; तर हातकणंगले मतदारसंघात ‘शेतकरी विरुद्ध बहुजन’ असा संघर्ष पेटला आहे. व्यक्तिगत पातळीवर गेलेल्या या निवडणुकीत प्रश्नांची मांडणीही व्यक्तिगतच होत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यावरच भर दिला असल्याने लोकसभेची निवडणूक असल्याचा विसर पडल्याचेच चित्र आहे.

अशा परिस्थितीत अधिकाधिक मतदारांना आपल्या गोटात ओढण्यासाठी गावपातळीवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जाहीर सभांतून बडे नेते देशपातळीवरील प्रश्नांना हात घालत असले तरी सध्याच्या वातावरणात स्थानिक उखाळ्या-पाखाळ्यांंमध्ये हे प्रश्न विरून चालले आहेत. त्यामुळे सभा घेऊन मोठा खर्च करण्यापेक्षा घर ते घर भेटी देऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय नेते, कार्यकर्त्यांनी जवळ केला आहे. गावनिहाय, वॉर्डनिहाय, मतदारसंघनिहाय मेळावे, पदयात्रा यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांना आपल्या जाळ्यात ओढले जात आहे. जाहीर सभा नकोचजाहीर सभा घ्यायची म्हटली तरी त्याची परवानगी, वाहनांची नोंदणी, बैठकीची व्यवस्था यामध्ये यंत्रणा गुंतून पडते. शिवाय गर्दी जमविण्यासाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागते. मोठ्या सभांचा खर्च किमान दहा लाखांवर जातो. वेळ, श्रम व पैसा वाया जातो, त्या बदल्यात त्यातून फारसा लाभ होत नाही. याउलट गळ्यात पक्षाचे उपरणे घालून हात जोडत पदयात्रा, कोपरा सभा घेतलेल्या बऱ्या अशी मानसिकता दृढ होत आहे. शिवाय निवडणूक आयोगाच्या जाचासह श्रम, वेळ, पैसाही वाचत असल्याने याकडेच कल आहे.निवडणूक खर्चावरून संतापउमेदवारांना ७० लाखांपर्यंतच खर्च करता येतो. जाहीर सभा जास्त घेतल्यातर या रकमेत खर्च बसविणे शक्य होत नाही. त्यातच यावेळी निवडणूक खर्चावरून यंत्रणेने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच घाम फोडला आहे. निवडणूक आयोगाने लावलेला खर्च व उमेदवारांकडून दाखविलेला खर्च यांत तफावत आढळत असल्याने उमेदवारांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. प्रचार करायचा की या नोटिसींना उत्तरे देत बसायची, असा संताप उमेदवारासह कार्यकर्तेही व्यक्त करू लागले आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर